शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
"एका मिनिटात खटला संपला, ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाचे मुद्दे मांडलेच नाही"; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
3
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
4
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
5
नेपाळमध्ये पुन्हा भडकलं Gen Z आंदोलन, युवक रस्त्यावर उतरले; कर्फ्यू लागू, एअरपोर्ट सेवा बंद
6
Mumbai: जोडीदाराकडून आत्महत्येची वारंवार धमकी ही क्रूरताच: मुंबई उच्च न्यायालय
7
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; Nifty २६,१०० च्या जवळ, मेटल-ऑटो शेअर्समध्ये खरेदी
8
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
9
लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत घुसून मारू; हल्ल्यात पाकिस्तान सहभागी असल्याची PoKची कबुली
10
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
11
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
12
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
13
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
14
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
15
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
16
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
17
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
18
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
19
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
20
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १४ आरोग्य केंद्रे धोक्याची, ना अग्निशमनची, ना विजेची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:20 IST

परभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १४ आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. शिवाय या केंद्रांमध्ये अग्निशमनची आणि विजेच्या ...

परभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १४ आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. शिवाय या केंद्रांमध्ये अग्निशमनची आणि विजेच्या अनुषंगाने केव्हाच तपासणी झाली नाही. त्यामुळे आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारतीबरोबरच अग्निशमन, विजेची तपासणी केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

मागील आठवड्यात भंडारा येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवानंतर राज्यातील आरोग्य संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिथे जिल्हा स्तरावरच कधी अग्निशमनची तपासणी झाली नाही, तिथे ग्रामीण भागाचा काय प्रश्न. जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्यसेवा पुरविली जाते. मागच्या एक-दोन वर्षांपासून आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधकामांना सुरुवात झाली आहे. मात्र, बरीच आरोग्य केंद्रे सध्या जुन्याच इमारतीतून चालतात. परभणी तालुक्यातील दैठणा, पाथरी तालुक्यातील बाभळगाव, हदगाव, सेलू तालुक्यातील वालूर, जिंतूर तालुक्यातील आडगाव, आसेगाव, येलदरी, कौसडी पालम तालुक्यातील चाटोरी या आरोग्य केंद्रांच्या इमारती जुन्या आहेत. पावसाळ्यात इमारत गळत असल्याने शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. तसेच पाणी मुरून भिंती पडण्याची भीती कायम असते. जिल्ह्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आतापर्यंत विजेची आणि अग्निशमनची तपासणी (फायर, इलेक्ट्रिक ऑडिट) झाली नाही. त्यामुळे आता या दृष्टीने केव्हा तपासण्या होणार? हा कळीचा मुद्दा आहे.

कोरोनाच्या संकट काळात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरावर अद्ययावत साहित्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात केंद्राची इमारत गळत असल्याने महागडी वैद्यकीय यंत्रसामग्री अक्षरश: झाकून ठेवण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रात विजेच्या वायरिंगचेही असेच हाल आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रांची अग्निशमन, विजेची तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी दिले आदेश

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अग्निशमन आणि विजेची तपासणी करून घेण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केव्हा होणार, याची प्रतीक्षा लागली आहे. सध्या तरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र धोकादायकच आहेत.