शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना ...

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने प्रारंभी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर दहावीपाठोपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बारावीनंतर पदवी व इतर अभ्यासक्रमाची प्रक्रिया कशी राहणार आहे, याबाबत अद्याप शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात सापडले आहेत. बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे अनेक विद्यार्थी विदेशातही शिक्षणासाठी जातात. त्यामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांना शासन परीक्षेचे गुणांकन कसे देणार? पुढील पदवी व अन्य अभ्यासक्रमास प्रवेश कोणत्या निकषाच्या आधारे देणार, याची प्रतीक्षा लागली आहे.

बारावीनंतरच्या संधी

बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीपीटीएच आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन, रेडिओथेरपी, न्युरॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्यूजन टेक्निशियन अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

तसेच बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, कृषी, फॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.