शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना ...

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने प्रारंभी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर दहावीपाठोपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बारावीनंतर पदवी व इतर अभ्यासक्रमाची प्रक्रिया कशी राहणार आहे, याबाबत अद्याप शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात सापडले आहेत. बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे अनेक विद्यार्थी विदेशातही शिक्षणासाठी जातात. त्यामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांना शासन परीक्षेचे गुणांकन कसे देणार? पुढील पदवी व अन्य अभ्यासक्रमास प्रवेश कोणत्या निकषाच्या आधारे देणार, याची प्रतीक्षा लागली आहे.

बारावीनंतरच्या संधी

बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीपीटीएच आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन, रेडिओथेरपी, न्युरॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्यूजन टेक्निशियन अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

तसेच बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, कृषी, फॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.