शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

बारावी परीक्षा रद्द; पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:13 IST

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना ...

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांच्या नियमित शाळा व महाविद्यालयातील वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमणात नुकसान झाले आहे. कोरोना संसर्ग कमी होत नसल्याने राज्य शासनाने प्रारंभी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर दहावीपाठोपाठ बारावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकीकडे दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे बारावीनंतर पदवी व इतर अभ्यासक्रमाची प्रक्रिया कशी राहणार आहे, याबाबत अद्याप शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकही संभ्रमात सापडले आहेत. बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे अनेक विद्यार्थी विदेशातही शिक्षणासाठी जातात. त्यामुळे अशा गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये शासनाच्या या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांना शासन परीक्षेचे गुणांकन कसे देणार? पुढील पदवी व अन्य अभ्यासक्रमास प्रवेश कोणत्या निकषाच्या आधारे देणार, याची प्रतीक्षा लागली आहे.

बारावीनंतरच्या संधी

बारावीनंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान पदवीसोबतच अन्य विविध अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीपीटीएच आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

पॅरामेडिकलमध्ये लॅबोरेटरी, रेडिओग्राफीक टेक्निशियन, रेडिओथेरपी, न्युरॉलॉजी, ब्लड ट्रान्सफ्यूजन टेक्निशियन अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.

तसेच बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, आर्किटेक्चर, कृषी, फॅशन डिझायनिंग आदी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येतो.