शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

१२,२४९ शेतकऱ्यांनी केली कापूस विक्रीसाठी नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२ हजार २४९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ९ ...

परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२ हजार २४९ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. ९ डिसेंबरपासून किमान आधारभूत खरेदी अंतर्गत पणन फेडरेशनमार्फत खरेदी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २६२ शेतकऱ्यांचा ७ हजार ३१९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू, मानवत व जिंतूर येथे सीसीआयच्या वतीने कापूस खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या परभणी शहरासह तालुक्यात आतापर्यंत कापूस खरेदी सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक चिंतेत होते. त्यानंतर परभणी येथील खरेदी केंद्रावर कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने तालुक्यातील व शहरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या केंद्रावर कापूस विक्रीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे पणन महासंघाकडून बाजार समितीमार्फत ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक केले. त्यानुसार परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील १२ हजार २४९ शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कापूस उत्पादन पणन महासंघाकडून ९ डिसेंबरपासून किमान आधारभूत खरेदी अंतर्गत शहरातील ओंकार कॉटन ॲग्रो इंडस्ट्रीज व राजराजेश्वर, कोटेक्स या ठिकाणी कापूस खरेदी सुरू करण्यात आली. या कापूस खरेदीचे उद्घाटन संचालक पंडितराव चोखट, बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव आवचार, सोपानराव आवचार, गणेशराव घाटगे, रमेशराव देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी ऑनलाईन नोंदणी केलेल्या पहिल्या ५ शेतकऱ्यांना टॉवेल टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी फेडरेशनचे उपव्यवस्थापक आर.ए. वाघ, ग्रेडर जाधव, कार्यालयीन अधीक्षक नखाते, बाजार समितीचे सचिव संजय तळणीकर, सहाय्यक सचिव सुरेश गरुड, प्रभूसिंह परिहार, कमल नारायण मानधने, बालू शर्मा, सुरेश शर्मा, मोतीलाल जैन, पवन पुरोहित यांची उपस्थिती होती.

पहिल्याच दिवशी ५ हजार ७२५ रुपयांचा भाव

शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे पणन फेडरेशनच्या वतीने कापूस खरेदी करण्यात येत आहे. कापसाच्या प्रतवारीनुसार बाजारभाव देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपयांचा भाव देण्यात आला. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणतेवेळी सातबारा, आधारकार्ड, बँक खाते झेरॉक्स सोबत आणावी, एकाच दिवशी एकाच वाहनातून ४० क्विंटल कापूस खरेदी करण्यात येणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर, दिलीप आवचार, संजय तळणीकर यांनी केले आहे.