शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

लॉकडाऊन काळातील १२०० गुन्ह्यांना निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी : लॉकडाऊन काळात दाखल झालेले प्रतिबंधात्मक गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी जिल्हा पोलीस प्रशासनाला ...

परभणी : लॉकडाऊन काळात दाखल झालेले प्रतिबंधात्मक गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी जिल्हा पोलीस प्रशासनाला यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने या काळात दाखल झालेल्या १२३५ गुन्ह्यांना निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर राज्य शासनाने जिल्हा सीमाबंदी आणि लॉकडाऊन जाहीर केला. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. सुरुवातीच्या काळात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर नियम मोडून अनेकजण घराबाहेर पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही बाजारपेठेत दुकाने सुरू ठेवली जात होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नियम मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते. पाचपेक्षा अधिक नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असताना घराबाहेर पडून गर्दी करणे, शहरातील रस्त्यांवरून ट्रिपल सीट वाहन चालविणे, विनापरवानगी प्रवास करणे यासारख्या कारणावरून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२३५ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत व्यवहार बंद न करता गर्दी जमा केल्याने काही व्यापाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांमधील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट होऊन न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.

दरम्यान, आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शासनस्तरावर निर्णय झाला असला तरी पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप यासंदर्भात कोणतेच निर्देश नाहीत. त्यामुळे शासन निर्णयानुसार स्थानिक पातळीवर केव्हा निर्णय होतो, याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.

वाहनचालकांविरुद्धही कारवाई

लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना दिवस-रात्र रस्त्यावर थांबून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक घरात बसलेले असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी मात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत होते. याच काळात विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात २३ चारचाकी आणि ८ हजार १६५ दुचाकीचालकांचा समावेश आहे.

चेकपोस्टवरही दाखल होते गुन्हे

संचारबंदीच्या काळात राज्य शासनाने जिल्हा सीमाबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळे परजिल्ह्यातून विनापरवानगी नागरिक जिल्ह्यात दाखल होऊ नयेत, यासाठी जिल्ह्याच्या हद्दीवर चेकपोस्ट उभारण्यात आले होते. बीड, जालना, नांदेड जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर उभारण्यात आलेल्या या चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या ठिकाणीच अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे पालन करताना मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे आदी कारणांवरून पोलीस प्रशासनाने गुन्ह्यांची नोंद केली आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने नागरिकांना निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा लागली आहे.