शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील १२०० गुन्ह्यांना निर्णयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST

परभणी : लॉकडाऊन काळात दाखल झालेले प्रतिबंधात्मक गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी जिल्हा पोलीस प्रशासनाला ...

परभणी : लॉकडाऊन काळात दाखल झालेले प्रतिबंधात्मक गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी जिल्हा पोलीस प्रशासनाला यासंदर्भात कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याने या काळात दाखल झालेल्या १२३५ गुन्ह्यांना निर्णयाची प्रतीक्षा लागली आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यानंतर राज्य शासनाने जिल्हा सीमाबंदी आणि लॉकडाऊन जाहीर केला. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. सुरुवातीच्या काळात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र त्यानंतर नियम मोडून अनेकजण घराबाहेर पडत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीनंतरही बाजारपेठेत दुकाने सुरू ठेवली जात होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाने नियम मोडणाऱ्या नागरिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करीत गुन्हे दाखल केले होते. पाचपेक्षा अधिक नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव असताना घराबाहेर पडून गर्दी करणे, शहरातील रस्त्यांवरून ट्रिपल सीट वाहन चालविणे, विनापरवानगी प्रवास करणे यासारख्या कारणावरून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२३५ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या मुदतीच्या आत व्यवहार बंद न करता गर्दी जमा केल्याने काही व्यापाऱ्यांविरुद्धही गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांमधील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट होऊन न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे.

दरम्यान, आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे हे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शासनस्तरावर निर्णय झाला असला तरी पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप यासंदर्भात कोणतेच निर्देश नाहीत. त्यामुळे शासन निर्णयानुसार स्थानिक पातळीवर केव्हा निर्णय होतो, याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.

वाहनचालकांविरुद्धही कारवाई

लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना दिवस-रात्र रस्त्यावर थांबून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक घरात बसलेले असताना पोलीस अधिकारी, कर्मचारी मात्र रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत होते. याच काळात विनापरवानगी घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यात २३ चारचाकी आणि ८ हजार १६५ दुचाकीचालकांचा समावेश आहे.

चेकपोस्टवरही दाखल होते गुन्हे

संचारबंदीच्या काळात राज्य शासनाने जिल्हा सीमाबंदीचे आदेश लागू केले होते. त्यामुळे परजिल्ह्यातून विनापरवानगी नागरिक जिल्ह्यात दाखल होऊ नयेत, यासाठी जिल्ह्याच्या हद्दीवर चेकपोस्ट उभारण्यात आले होते. बीड, जालना, नांदेड जिल्ह्याच्या सीमा हद्दीवर उभारण्यात आलेल्या या चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या ठिकाणीच अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या नियमांचे पालन करताना मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणे आदी कारणांवरून पोलीस प्रशासनाने गुन्ह्यांची नोंद केली आहे. राष्ट्रीय आपत्ती कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. आता हे गुन्हे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याने नागरिकांना निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा लागली आहे.