शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची ...

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असून, ८ हजार २२३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत.

राज्यात राज्य शासनाने २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या ७ याद्या आतापर्यंत प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ जानेवारी अखेरपर्यंत १ लाख ८२ हजार ७१८ लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केले. त्यापैकी १ लाख ७८ हजार १५५ लाभार्थ्यांच्या खात्यात ११११.२१ कोटी रुपये शासनाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणिकरण केले नसल्याने ८ हजार २२३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना यासाठी प्रशासनाच्यावतीने संधी देण्यात येत आहे. त्यांनी येत्या तीन दिवसांत जवळच्या शासकीय केंद्र, सीएनसी सेंटर किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ देणे सोपे होईल. तसेच कर्जमुक्त झालेले शेतकरी २०२०-२१ या हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. आधार प्रमाणिकरण न करून घेतल्यास योजनेचा लाभ, तर मिळणारच नाही, उलट कर्जाची रक्कम व्याजासह बँकेकडून वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

सर्वाधिक कर्जमुक्ती एसबीआयकडून

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० बँकांमधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५७७ कोटी १२ लाख ५९ हजार ७१ रुपयांची कर्जमुक्ती भारतीय स्टेट बँकेतील ८१ हजार ४०५ शेतकऱ्यांची झाली आहे. या बँकेने एकूण ९५ हजार ८०४ खाते पोर्टलवर अपलोड केले होते. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४ हजार ४ लाभधारक शेतकऱ्यांची २६३ कोटी ७७ लाख १७ हजार २५७ रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ३६ हजार ८९९ शेतकऱ्यांना ९० कोटी ७६ लाख ८७ हजार ७०१ रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे.