शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

पावणेदोन लाख शेतकऱ्यांना ११११ कोटींची कर्जमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:17 IST

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची ...

परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार १५५ शेतकऱ्यांना आतापर्यंत ११११.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळाली असून, ८ हजार २२३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने ते या योजनेपासून वंचित आहेत.

राज्यात राज्य शासनाने २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. या योजनेनुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या ७ याद्या आतापर्यंत प्रशासनाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ जानेवारी अखेरपर्यंत १ लाख ८२ हजार ७१८ लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण केले. त्यापैकी १ लाख ७८ हजार १५५ लाभार्थ्यांच्या खात्यात ११११.२१ कोटी रुपये शासनाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. उर्वरित ४ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणिकरण केले नसल्याने ८ हजार २२३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. पुन्हा एकदा या शेतकऱ्यांना यासाठी प्रशासनाच्यावतीने संधी देण्यात येत आहे. त्यांनी येत्या तीन दिवसांत जवळच्या शासकीय केंद्र, सीएनसी सेंटर किंवा बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, जेणेकरुन कर्जमुक्तीचा लाभ देणे सोपे होईल. तसेच कर्जमुक्त झालेले शेतकरी २०२०-२१ या हंगामातील पीक कर्जासाठी पात्र ठरणार आहेत. आधार प्रमाणिकरण न करून घेतल्यास योजनेचा लाभ, तर मिळणारच नाही, उलट कर्जाची रक्कम व्याजासह बँकेकडून वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे यादीत नाव असलेल्या पात्र खातेदार शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.

सर्वाधिक कर्जमुक्ती एसबीआयकडून

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० बँकांमधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५७७ कोटी १२ लाख ५९ हजार ७१ रुपयांची कर्जमुक्ती भारतीय स्टेट बँकेतील ८१ हजार ४०५ शेतकऱ्यांची झाली आहे. या बँकेने एकूण ९५ हजार ८०४ खाते पोर्टलवर अपलोड केले होते. याशिवाय महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ३४ हजार ४ लाभधारक शेतकऱ्यांची २६३ कोटी ७७ लाख १७ हजार २५७ रुपयांची कर्जमुक्ती केली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ३६ हजार ८९९ शेतकऱ्यांना ९० कोटी ७६ लाख ८७ हजार ७०१ रुपयांची कर्जमुक्ती दिली आहे.