शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंढरीत दुपारपर्यंत कडकडीत बंद

By admin | Updated: June 13, 2014 01:24 IST

दुपारी दुकाने उघडली; शहरातील व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद

पंढरपूर : एकापाठोपाठ दोन रविवारी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या महापुरुषांच्या छायाचित्रांमध्ये बदल करून आक्षेपार्ह छायाचित्र सोशल नेटवर्क साईटवर अपलोड केल्याने पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, काही लोकांनी दुकानांवर दगडफेक करून लाखो रुपयांचे नुकसान केले. यामुळे पंढरपूर व्यापारी महासंघाने गुरुवारी बंद पुकारला होता. दुपारपर्यंत सर्व व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन कडकडीत बंद पाळला. दुपारनंतर व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले.१ जून रोजी सोशल नेटवर्क साईटवर महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. यामुळे शिवभक्तांसह विविध संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात आला. या बंदला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तरीही समाजकंटकांनी व्यापाऱ्यांच्या बंद दुकानांवर दगडफेक करून लाखो रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर दुसऱ्या रविवारी पुन्हा असाच प्रकार झाल्याची वार्ता समजताच भीमसैनिकांनी पंढरीत बंद पुकारला. या बंदलाही व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असतानाही काही जणांनी दुकानाच्या बाहेर असलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस करून त्याचे नुकसान केले. यामुळे पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष संजय भिंगे, दीपक शेटे, रा. पां. कटेकर, सत्यविजय मोहोळकर, कौस्तुभ गुंडेवार, नंदकुमार कटप, पद्मकुमार गांधी, इकबाल बागवान, राजेंद्र नवाळे, संतोष कंबीरे, सोमनाथ डोंबे, शैलेश बडवे यांनी गुरुवारी पंढरपूर बंद पुकारला होता. याला पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारी चार वाजल्यानंतर सर्वांनी आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली. यामध्ये विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने, स्टेशन रोडवरील दुकाने, संत रोहिदास मार्गावरील दुकाने उघडण्यात आली होती. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, नगरसेवक नामदेव भुईटे उपस्थित होते. ----------------------------------व्यापारी संघात दोन गटव्यापारी संघाने कोणत्याही राजकीय नेत्याला सोबत घेऊन बंद करायचा नाही, असे ठरविले होते. परंतु माजी आ. सुधाकरपंत परिचारक, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी भाषण केले. ८ जून रोजी आ. भारत भालके यांना व्यापाऱ्यांनी बोलू दिले नव्हते. यावरुन राजकीय नेत्यांना बोलवायचे नाही, असे ठरले असताना परिचारक आल्याने व्यापारी संघातील व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे यात दोन गट पडले आणि काहींनी दुकाने चालू ठेवण्याचे आवाहन करून दुकाने सुरूच ठेवली.