शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

आळंदीकरांचा रिंगरोडला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:53 IST

तीर्थक्षेत्र आळंदी, च-होली खुर्द व केळगाव लोकवस्तीतून पीएमआरडीएंतर्गत जाणाºया नवीन प्रस्तावित ११० मीटर रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे.

दिघी : तीर्थक्षेत्र आळंदी, च-होली खुर्द व केळगाव लोकवस्तीतून पीएमआरडीएंतर्गत जाणाºया नवीन प्रस्तावित ११० मीटर रिंगरोडला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. तो स्थलांतरित करावा, या मागणीसाठी सोमवारी (दि. ३१) बाधित शेतकरी, वारकरी यांनी मिळून औंध येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्रधिकरण (पीएमआरडीए) उपायुक्त कार्यालयावर टाळाचा गजर करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आळंदी शहर रिंगरोड हटाव कृती समिती व पदाधिकाºयांनी एकजूट दाखवून हे आंदोलन केले. पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व अर्धा तास सविस्तर चर्चा केली.श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या तीर्थक्षेत्र भूमीतून हा प्रस्तावित रिंगरोड जाणार असल्याने पवित्र तीर्थक्षेत्राचे दोन भाग पडणार आहेत. ज्या जागेतून रस्ता जाणार आहे, त्या ठिकाणी योगी चांगदेव महाराजांचे विश्रांतीस्थान, पद्मावती माता मंदिर, देवस्थानांच्या जमिनी, विविध वारकरी शिक्षण संस्था, मठ, मंदिरे, धर्मशाळा व कष्टकरी रहिवाशांची घरे येत आहेत. अनेकांना रिंगरोड प्रकल्पामुळे बेघर व भूमिहीन व्हावे लागणार आहे.मागील सात-आठ वर्षात आळंदी शहराचे कार्यक्षेत्र वाढले आहे. आळंदी नगरपालिका हद्दीबाहेर दीड ते तीन किलोमीटरच्या पुढे आळंदीचा विस्तार झालेला आहे. आजही तो विस्तारीत होत आहे. आषाढी व कार्तिकी यात्रेनिमित्त राज्यातून आलेले असंख्य वारकरी विस्तारीत भागात वास्तव्य करून वारीचा आनंद लुटत असतात. अशा सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा शासनाने जाणीवपूर्वक विचार करून ११० मीटरचा प्रस्तावित रिंगरोड रोड हा किमान पाच किलोमीटर दूर अंतरावरून करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.या वेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुºहाडे, सचिन पांचुंदे, पांडुरंग वहिले, सागर बोरूंदिया, आदित्यराजे घुंडरे, अशोक कांबळे, पाटीलबुवा गवारी, कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी भोसले, काळुराम घोरपडे, ह.भ.प. हरिदास रक्ताटे, चेतन घुंडरे, संतोष भोसले, गणेश काळे, सुनील घुंडरे, सदाशिव कांबळे आदींसह वारकरी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. आळंदी नगरपालिकेतही निवेदन देण्यात आले.