शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपलं माणूस कायमचं जाण्यापूर्वी.

By admin | Updated: April 10, 2015 13:40 IST

फक्त एकदाच. आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना.. प्लीज!

 
फक्त एकदाच. 
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी
हाक मारा त्यांना..
प्लीज!
***
आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
मीच का एसएमएस करू,
आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी निघून जातं,
जिथे नेटवर्क पोहचत नाही,
आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी,
एक फोन कराल त्यांना.
प्लीज.!
**
आपण असतो फार बिझी,
वेळच नाही,
कुठं जायला फुरसत नाही,
जिवाभावाची माणसं आठवतसद्धा नाहीत,
आपण कधी पत्र लिहित नाही,
ख्यालीखुशाली विचारत नाही,
त्यांचे बर्थडे आपल्याला आवडत नाही,
त्यांच्या आठवांनी मन काहूर करत नाही.
आणि मग एकदिवस येतो निरोप,
ते ‘नसल्याचा’.
आणि जातो फक्त दारावर,
कधीही न होणा:या भेटीसाठी.
असं होण्यापेक्षा
कधीतरी पाच मिण्टं वेळ काढता नाही का येणार,
थोडावेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार.
प्लीज.
त्या गप्पांना वेळ द्याच.
प्लीज.
***
हे सारं कळतं आपल्याला,
पटतंही.
मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात
बांधलेले,
आपले दोर काचलेले.
त्या काचल्या दोरांपायी
कुणाशी शेवटची भेट झाली नाही
असं होऊ नये.
आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये,
म्हणून एकदाच.
मनापासून हाक माराल प्लीज.
आपल्या माणसांना.