शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आपला कपिल शर्मा होतोय का?

By admin | Updated: April 5, 2017 18:01 IST

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?

यशाच्या उत्तुंग शिखरावरुन कोसळण्याचा प्रवास नक्की का सुरु होतो?महिनाभरापूर्वी कुणी म्हटलं असतं की, तुझा कपिल शर्मा होतोय..तर आपण किती आनंदानं बेभान झालो असतो..कपिल शर्मा इतकी लोकप्रियता, त्याचं ग्लॅमर, त्याचा पैसा, त्याचं यश, बड्या वर्तुळातली त्याच्याच नावाचे चर्चे, त्याच्या शोमध्ये येण्यासाठी आतुरलेले बडे सेलिब्रिटी..हे असं काही आपल्याला मिळालं तर कुणाला नको होतं?पण आज काय चित्र आहे?सोशल मीडीयात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजमध्ये यासंदर्भात अत्यंत उद्बोधक चर्चा पहायला मिळते आहे. ती रंजक तर आहेच, पण अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे..आजच्या इन्स्टण्ट जगात लोकप्रियता आणि लोकांचं वेडं प्रेम हे किती क्षणिक असतं याचं ते एक उदाहरणही आहे..म्हणूनच आपण जेव्हा आपलं करिअर करतो, यश मिळावं म्हणून मेहनत करतो तेव्हा अवतीभोवतीच्या या गोष्टीतूनही बरंच काही शिकण्यासारखं असतं..म्हणूनच तर निनावी फॉरवर्ड होत असलेला एक इंग्रजी मेसेज ७ पॉईण्टसमध्ये कपिलच्या निमित्तानं काही लाईफस्किल्स, सॉफ्ट स्किल्स सांगताना दिसतो..त्याचा हा काहीसा भावानुवाद..१)उगवलेला सूर्य मावळतोच, त्यामुळे आपण खूप वेगानं उंच जातोय तर आपण खालीही येवू कधी ना कधी याचं भान ठेवायला हवं.२) सतत आपल्या टीम मेट्सचा, सहकाऱ्यांचा, सोबत्यांचा अपमान करुन तुम्ही यश नाही कमावू शकत आणि कमावलं तरी ते टिकवून नाही ठेवू शकत३) ज्या टीमबरोबर आपण यश कमावलं ती टीम मोडूतोडू नये.४)लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतात, हे कायम लक्षात ठेवावं.५) दारू आणि इगो हे दोन्हीही तब्येतीसाठी वाईटच, हे कायम लक्षात ठेवलेलं बरं..६) आपली रेप्युटेशन, प्रतिष्ठा आणि नाव कमावण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागते, पण गमवायला एक क्षण पुरेसा असतो.७) आणि तुम्ही तुमची प्रतिष्ठा गमावली तर त्यामागोमाग तुम्ही बाकी सारंच गमावून बसता?