शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

आपलं डोकं आहेच सुपरफास्ट !

By admin | Updated: September 4, 2014 17:28 IST

अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं!

कल्पेश रानडे, नाशिक

हातात फक्त एक स्मार्टफोन आणि एक ‘विशेष’ बूट!
-बस, एवढय़ा दोन गोष्टी असल्या तरी जगात तुम्ही कुठेही जाऊ शकता, काहीही करू शकता!
त्यासाठी रस्ता माहीत असण्याची गरज नाही, कोणाला पत्ता विचारण्याची गरज नाही, एवढंच काय, तुम्हाला दृष्टी, डोळे असण्याचीही गरज नाही. व्वा! काय अफलातून कल्पना आहे!
8 ऑगस्टच्या ‘ऑक्सिजन’मधली ‘लेचल’ ही स्टोरी वाचली, फार आवडली, पण त्यापेक्षाही एका गोष्टीनं मनात घर केलं, ती म्हणजे त्यामागची आयडिया आणि त्यामागे असलेलं एका कोवळ्या तरुण भारतीयाचं डोकं! आता यापूर्वी काय कोणाकडे स्मार्टफोन नव्हते, बूट काय कोणी पहिल्यांदाच घातले?
अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं! भारतीय तरुणांच्या संदर्भात ही फार मोठी गोष्ट सध्या घडताना दिसते आहे. आंतरराष्ट्रीय क्षीतिजावर धडक देण्याची धमक त्यांच्यात आहे.
असे कितीतरी तरुण आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांची स्वप्न आहेत, त्यांच्याकडे आयडिया आहेत, काहींना त्यांच्या आयडिया प्रत्यक्षात उतरवता आल्या, तर काहींना नाही!
पण वेगळ्या दिशेनं विचार करण्याची आणि स्वत:बरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची या तरुणांची मानसिकता हेच आपलं भविष्यकाळातलं भांडवल आहे. आपल्याकडची आयआयटीची तरुण पोरं बघा, प्रत्येक जण काहीना काही तरी करतो आहे, आपल्या आयडियाज वापरून सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटतं आहे.
कोणी स्वस्तातील स्वस्त आणि तरीही टिकाऊ घरं कशी तयार होतील यासाठी प्रय} करतो आहे, कोणी ग्रामीण भागातही प्रत्येक घरात वीज कशी पोहोचेल यासाठी झगडतो आहे, कोणी खेडय़ापाडय़ातल्या लोकांना स्वच्छ पाण्याचे पर्याय देतो आहे, कोणी दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतं आहे, कोणी प्रदुषणावर पर्याय म्हणून हायड्रोजनचाच इंधन म्हणून वापरायचा प्रय} करतो आहे, कोणी अपंगांसाठी उपयुक्त साधनं बनवतं आहे, तर कोणी कचरा कमी करण्यासाठी आणि उचलण्यासाठी पर्यावरणस्नेही स्वस्त सायकल!
सर्वसामान्य समाजाविषयी भारतीय तरुणांना वाटणारी आत्मियता आणि त्यासाठी ‘समाजसेवेचं’ कुठलंही पांघरून स्वत:भोवती न गुंडाळता त्यांचं सुरू असलेलं काम हा आजच्या भारतीय तरुणाईचा ‘यूएसपी’ आहे, असं मला वाटतं.
-----------------
कौन कहता है, आसमां मे सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो. अशी धमक तुमच्यामधे असताना निराशेचं वादळ का घेरतं? काहीच चांगलं घडत नाही, असं कसं म्हणता? अगदी टोकाचं उदाहरण घ्या, बंद घडय़ाळदेखील दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवतंच. हा इतका पॉङिाटिव्ह अॅप्रोच ठेवा, बदल नक्की घडेल..
- राजेंद्र दर्डा

www.facebook.com/social.teamaurangabad