शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
4
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
5
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
6
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
7
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
8
World Cup FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
9
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
10
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
11
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
12
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
13
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
14
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
15
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
16
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
17
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
18
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
19
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
20
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना

आपलं डोकं आहेच सुपरफास्ट !

By admin | Updated: September 4, 2014 17:28 IST

अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं!

कल्पेश रानडे, नाशिक

हातात फक्त एक स्मार्टफोन आणि एक ‘विशेष’ बूट!
-बस, एवढय़ा दोन गोष्टी असल्या तरी जगात तुम्ही कुठेही जाऊ शकता, काहीही करू शकता!
त्यासाठी रस्ता माहीत असण्याची गरज नाही, कोणाला पत्ता विचारण्याची गरज नाही, एवढंच काय, तुम्हाला दृष्टी, डोळे असण्याचीही गरज नाही. व्वा! काय अफलातून कल्पना आहे!
8 ऑगस्टच्या ‘ऑक्सिजन’मधली ‘लेचल’ ही स्टोरी वाचली, फार आवडली, पण त्यापेक्षाही एका गोष्टीनं मनात घर केलं, ती म्हणजे त्यामागची आयडिया आणि त्यामागे असलेलं एका कोवळ्या तरुण भारतीयाचं डोकं! आता यापूर्वी काय कोणाकडे स्मार्टफोन नव्हते, बूट काय कोणी पहिल्यांदाच घातले?
अनिरुद्ध शर्मा नावाचा एक साधा तरुण. बॅकबेंचर. शाळेत, वर्गात पहिलं-दुसरं येणं, खूप मार्कस् मिळवणं, रॅटरेसमध्ये धावत धापा टाकणं. यातलं या मुलानं काहीही केलं नाही, पण तरीही त्याला जे सुचलं ते किती अफलातून होतं! भारतीय तरुणांच्या संदर्भात ही फार मोठी गोष्ट सध्या घडताना दिसते आहे. आंतरराष्ट्रीय क्षीतिजावर धडक देण्याची धमक त्यांच्यात आहे.
असे कितीतरी तरुण आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांची स्वप्न आहेत, त्यांच्याकडे आयडिया आहेत, काहींना त्यांच्या आयडिया प्रत्यक्षात उतरवता आल्या, तर काहींना नाही!
पण वेगळ्या दिशेनं विचार करण्याची आणि स्वत:बरोबर इतरांनाही पुढे घेऊन जाण्याची या तरुणांची मानसिकता हेच आपलं भविष्यकाळातलं भांडवल आहे. आपल्याकडची आयआयटीची तरुण पोरं बघा, प्रत्येक जण काहीना काही तरी करतो आहे, आपल्या आयडियाज वापरून सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटतं आहे.
कोणी स्वस्तातील स्वस्त आणि तरीही टिकाऊ घरं कशी तयार होतील यासाठी प्रय} करतो आहे, कोणी ग्रामीण भागातही प्रत्येक घरात वीज कशी पोहोचेल यासाठी झगडतो आहे, कोणी खेडय़ापाडय़ातल्या लोकांना स्वच्छ पाण्याचे पर्याय देतो आहे, कोणी दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करतं आहे, कोणी प्रदुषणावर पर्याय म्हणून हायड्रोजनचाच इंधन म्हणून वापरायचा प्रय} करतो आहे, कोणी अपंगांसाठी उपयुक्त साधनं बनवतं आहे, तर कोणी कचरा कमी करण्यासाठी आणि उचलण्यासाठी पर्यावरणस्नेही स्वस्त सायकल!
सर्वसामान्य समाजाविषयी भारतीय तरुणांना वाटणारी आत्मियता आणि त्यासाठी ‘समाजसेवेचं’ कुठलंही पांघरून स्वत:भोवती न गुंडाळता त्यांचं सुरू असलेलं काम हा आजच्या भारतीय तरुणाईचा ‘यूएसपी’ आहे, असं मला वाटतं.
-----------------
कौन कहता है, आसमां मे सुराग नहीं होता, एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो. अशी धमक तुमच्यामधे असताना निराशेचं वादळ का घेरतं? काहीच चांगलं घडत नाही, असं कसं म्हणता? अगदी टोकाचं उदाहरण घ्या, बंद घडय़ाळदेखील दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवतंच. हा इतका पॉङिाटिव्ह अॅप्रोच ठेवा, बदल नक्की घडेल..
- राजेंद्र दर्डा

www.facebook.com/social.teamaurangabad