शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

इगो हर्ट झालाय का? होऊ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:31 IST

इगोनं घात केला असं आपण किती सहज म्हणतो, पण हर्ट झालेला इगो अपयशाला कशी प्रतिक्रिया देतो यावर यश-अपयश ठरतं तेव्हा?

ठळक मुद्देआपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार? की आपल्या इगोला देणार आव्हान?

अनन्या भारद्वाज

तरुण मुलं एक प्रश्न हमखास विचारतात. खरंतर ‘कारण’ सांगतात. एक वाक्य ठरलेलं असतं. ‘माझी  लाइफस्टाईलच अशी आहे, घरची परिस्थितीच अशी आहे की, मी नाही काही करु शकत.!’ हे वाक्य खोटं असतं का? तर नाही. खोटं नसतंच. पण ते पूर्ण सत्यही नसतं. कारण आजवरचा जग बदलून टाकणारा इतिहास असं सांगतो की, ज्यांचे हाथ परिस्थितीनं बांधुन टाकलेले होते त्याच माणसांनी ते बंध झुगारुन देत नवं जग घडवलं. सगळं मस्त चाललेलं असताना लोक जग बदलायला जात नाहीत. त्यामुळे माझ्या घरची परिस्थितीच अशी की, त्यामुळं काही जमलं नाही करायला हे वाक्य म्हणजे जे आपल्याला जमलं नाही, त्यावर घातलेलं पांघरुण असतं. -जरा कटूच वाटेल हे वाचताना पण हे खरं आहे. बराक ओबामा काय आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीला माणूस, त्यानं कसं बदलून टाकलं जग अवतीभोवतीचं? स्टिव्ह जॉब्ज, फार सुखी आयुष्य आलं होतं का त्याच्या वाटय़ाला, पण तो रडत बसला की पुढं सरकला? विल्यम्स भगिनी काय परिस्थितीतून जगज्जेत्या बनल्या?अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील, पण त्या यादीपेक्षा आपल्या अवतीभोवतीच्या जगातले आपलेच दोस्त पहा. त्यांचा आणि आपला प्रवास कदाचित एकाचवेळी सुरु झालेला असतो, काहीजण फक्त तक्रार करतात आणि अ‍ॅँग्री यंग मॅन मोडवर असतात. पण करत काहीच नाहीत. काहीजण त्यांच्यासारखेच चिडलेले असतात परिस्थितीवर मात्र तो आग, तो संताप योग्य जागी लावतात आणि त्या ऊर्जेवर पुढं निघतात.हा बदल नक्की कसला?मानसिकतेतला आणि कारणं न सांगता  झगडत राहण्याच्या वृत्तीचा.अलिकडेच प्रसिद्ध झालेला एक अभ्यासही हे सांगतोच. जर्मनीतल्या सारालॅण्ड विद्यापीठानं प्रसिद्ध केलेला अभ्यास जरा चक्रावणारे निष्कर्ष मांडतो आहे. इगो, माणसांचं वर्तन, त्यामुळे होणारं नुकसान किंवा त्यातून होणारे फायदे यासंदर्भातली मनाची आणि प्रसंगी शरीराचीही प्रतिक्रिया यासार्‍याचा तपशिलवार अभ्यास करण्यात आला. आधीच्या अभ्यासातले अनेक दावे या अभ्यासानं मोडीत काढलेले आहेत. म्हणजे आधी असं मानलं जात होतं की, इगोमुळे माणसांचं नुकसानच होतं. त्याच्या प्रतिक्रिया चुकतात आणि इतर लोकांशी त्याचे संबंध बिघडतात. हा अभ्यास म्हणतो योग्य ठिकाणी लावलेला इगो तात्पुरत्या अपयशाचं रुपांतर यशात करु शकतो. अर्थात याविषयी मानसअभ्यास तज्ज्ञांत   अनेक मतभेदही निर्माण झाले आहेत. मात्र त्यातला महत्वाचा भाग म्हणजे माणसाचा इगो आणि त्याची झुंजत प्रतिक्रिया देण्याची वृत्ती कशी बदलते, अपयशाला तो कशी प्रतिक्रिया देतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. अनेकदा वरकरणी जे अपयश वाटतं ते त्याक्षणी अपयश नसतंच, ते एक पाऊल मागे जाणं किंवा खरंतर पुढं न जाणं असतं.मात्र होतं काय, त्याचवेळी माणसाचा इगो आड येतो आणि त्या अपयशाला भयाण अपयश, हार समजण्याची चूक तो इगो करतो. काहीजण तिथंच शसत्र टाकून देतात आणि त्यांची प्रगती खुंटते.काहींचा इगो मात्र त्या अपयशानं भारी हर्ट होतो. ते अपयश अत्यंत पर्सनली घेतात आणि पेटून उठल्यासारखे परत कामाला लागतात. त्यातून होतं असं की, ते अपयश हीच त्यांची शक्ती बनतं. आपण महान माणसांचे अनेक अनुभव ऐकतो, प्रेरणादायी भाषणं ऐकतो ते सांगतात एका अपयशानंतर पालटलेली त्यांच्या आयुष्याची दिशा! त्यावेळी अनेकदा वाटतंही की, नशीबानं साथ केली म्हणून यांना जमलं हे करणं, नसतंच जमलं आणि पुढं सारं चुकतच गेलं असतं, तर त्या अपयशाचं एवढं कौतुक झालं असतं का?हा अलिकडेच प्रसिद्ध झालेला अभ्यास म्हणतो, कौतुक अपयशाचं नसतंच. त्या अपयशाला दिलेल्या प्रतिक्रियेचं असतं, त्यांच्या इगोचं नसतं, त्या इगोनं योग्यवेळी केलेल्या कृतीचं असतं. आणि माणसांच्या यशापयशात ही प्रतिक्रियाच बदल घडवते. आणि कदाचित म्हणूनच आपल्या अवतीभोवती गरीबीतून अत्यंत कष्टानं देदीप्यमान यश मिळवणारी माणसं दिसतात. एखादा धोनी मोठा स्टार झालेला दिसतो, आयपीएलसह अनेक खेळात अनेक खेळाडू मोठं यश संपादन करतात. मोठे उद्योगपती यशाच्या कहाण्या सांगतात आणि जगभरात नवीन राजकीय नेतृत्व करणारेही एकेकाळी आपल्या वंचित आयुष्याविषयी बोलतात.आपण कशाविषयी बोलणार?आपल्या परिस्थितीविषयी? न जमलेल्या गोष्टींविषयी? कारणंच सांगत बसणार?की आपल्या इगोला देणार आव्हान?-उत्तर आपलं आपण द्यायचं आहे.