शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

आईवडिलांच्या जिवावर सतत मजा मारणारं तारुण्य, बाहेरच्या जगात लढाईच का हरतं आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:32 IST

स्वतंत्र दिसणारी तरुण मुलं प्रत्यक्षात बांडगूळ होऊ लागली आहेत का?

ठळक मुद्देअवतीभोवती सध्या चित्र असं आहे की, अनेक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची एकतर जाणीव नाही आणि त्याची कदरही नाही.

विकास बांबल 

मी ‘वक्त’ नावाचा एक हिंदी चित्नपट बघितला होता, ज्यामध्ये अक्षय कुमारने मुलाची तर अमिताभ बच्चन यांनी वडिलांची भूमिका निभावली. फार देखणा आणि मार्मिक सिनेमा. तर त्या चित्नपटात वडील खूप कष्टानं श्रीमंत झालेले असतात. आपल्या मुलाला त्रास नको म्हणून ते मुलाचे एवढे लाड करतात की मुलाचे पाय दुखायला नकोत म्हणून प्रसंगी मुलाला पाठीवर घेऊन फिरतात. त्याला अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून स्वतर्‍च अभ्यास करून देतात. त्याचे सगळे लाड पुरवतात. त्याला त्नास होऊ नये, जास्त श्रम पडू नयेत म्हणून प्रत्येक गोष्ट स्वतर्‍ करतात.मग मुलगा जसा जसा पुढे मोठा होतो तसा तो वडिलांच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाही. वडीलसुद्धा आता उतरतीला आलेले असतात, त्यांच्याकडून आधी सारखं त्याला प्रत्येक गोष्टीत मदत करणं जमत नाही.मुलगा खूपच परावलंबी झाला म्हणून वडिलांना राग येतोय. स्वतर्‍चे कामदेखील त्याला स्वतर्‍ला करता येत नाही, लगA करून येतो तर बायकोची आणि कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही. म्हणून वडील चिडतात. आपल्या पश्चात या मुलाचं कसं होणार, कसा हा स्वतर्‍च्या पायावर उभा राहणार असं वाटून छातीवर दगड ठेवून मुलाला घराबाहेर काढतात.त्यातून त्यांच्यात रागलोभ होतात. पण मुलगा स्वतर्‍च्या पायावर उभं राहायला शिकतो. म्हणायला हा सिनेमा असला तरी आपल्या अवतीभोवती हे दृश्य आपण कमीअधिक फरकाने पाहतोच आहोत. वयाची पंचविशी येते तरी मुलं आपल्या पालकांवरच अवलंबून दिसतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,‘मुलगा होतो ठोंब्या-भोपळ्या, अतिलाडाने निकामी !’तेच होतं आहे का अवतीभोवती? पालक मुलांचे इतके लाड करतात, त्यांना त्रास नको म्हणून स्वतर्‍ इतका त्रास करून घेतात, की मुलांना त्याची जाणीवही नसते. मुलांना सर्व आयतं देऊन त्यांची संघर्ष करण्याची शक्ती हिरावली जाते. कुंभार मातीच्या मडक्याला राग येतो म्हणून वरून चापट मारत नाही, किंवा एखादा शिल्पकार वेडा झाला म्हणून दगडाला हातोडय़ाने मारत नाही, तर कुंभाराला टिकाऊ मडके आणि शिल्पकाराला सुंदर शिल्प घडवायचे असते.अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आलेली होती त्यामध्ये एका रस्त्यावरून एकाच कॉलनीमध्ये राहणारे श्रीमंत व्यापारी आणि त्यांच्याकडे काम करणारा नोकर हे दोघेही घरी लावण्यासाठी रोपवाटिकेतून लहान रोप आणतात.श्रीमंत व्यापार्‍याच्या घरी उत्तम  निगराणी, सर्व मुबलक त्यामुळे बाल्कनीत ठेवलेल्या कुंडय़ामधील झाडांना वेळोवेळी मुबलक विकत आणलेले खत आणि पाणी दिले जात होते.ऊन आले की सावलीत ठेवणं, पाऊस आला की घरात ठेवणं अगदी वातानुकूलित वातावरणात ते झाड वाढत होते.याउलट त्या नोकरांच्या घरी खाली जमिनीत ते झाड लावलं, त्याला विकतचे खत आणणे परवडणारे नव्हते म्हणून शेणखत वापरून त्याची निगराणी ठेवली जात होती.ऊन, वारा, पाऊस यामध्ये ते झाड जगण्याचा प्रयत्न करत होते. एकाच दिवशी आणलेली झाडे; पण व्यापार्‍याचे झाड उत्तम बहरले, दिसायला सुंदर याउलट स्थिती नोकराच्या घरच्या झाडाची होती.वर्ष दोन वर्षे गेली,एके दिवशी सोसाटय़ाचा वारा आला, व्यापार्‍याच्या घरातील झाड कुंडीमधून पूर्णपणे उखडून वार्‍याबरोबर उडून गेले; पण नोकराकडील झाड तग धरून जमिनीत आपली पाळंमुळं रोवून घट्ट उभे होते.हाच फरक मुलांमध्ये असतो, असं म्हणतात. मातीत खेळलं नाही, उन्हात फिरलं नाही, पावसात भिजलं नाही, थंडीत त्रास झाला नाही, स्वतर्‍च्या कष्टानं काही कमावलं नाही तर शेवट काय होणार, एकतरी परावलंबी तरी होणार नाही तर बांडगूळ तरी ! आईवडिलांची साथ असणं वेगळं आणि त्यांच्याच जिवावर तरुणांनी मजा मारणं वेगळं.अवतीभोवती सध्या चित्र असं आहे की, अनेक मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची एकतर जाणीव नाही आणि त्याची कदरही नाही. त्यामुळे बाहेरच्या जगात जेव्हा ते एकटय़ानं काही करू पाहतात, तेव्हा हरतात. किंवा लढण्यापूर्वीच शस्रं टाकून देतात.हे असं होणं किती वाईट आहे.