शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

.है तुङो भी इजाजत

By admin | Updated: October 23, 2014 15:27 IST

आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.

हल्ली मी काही बोलतच नाही,
काय बोलणार?
आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.
यार, आपण म्हणजे ना आपापलं आडनाव बदलून सदारडे किंवा कुढे असं ठेवून घ्यायला पाहिजे असंही मला वाटतं.
बघा ना, आत्ता हेच बघा.मी हे असं सांगायला सुरूवात केल्याबरोबर तुम्ही इरीटेट झाला असाल, नो रोनाधोना प्लीज असा एक भाव तुमच्या चेह:यावर नकळत उमटून गेला असणार.
 
******
खरंय पण मी काय करू यार,
या ताईच्या बांगडय़ा टाईप आयुष्याचं.
जबाबदा:याच इतक्या अंगावर पडलेल्या आहेत की, जवानी दिवानी तुफानी करण्याचा काही चान्सच मला मिळाला नाही.
कॉलेजात असताना वाटायचं की, केलंच कुणी प्रपोज तर म्हणावं ‘हो’. त्याच्या बाईकवर बसून यावं मस्त फिरुन.
बरं, आम्ही संधीपासून वंचित असंही काही नाही.
म्हणजे विचारलंही एकादोघांनी पण माङो संस्कार आणि घरच्यांचा धाक दोन्हीही आडवे आले आणि इच्छा असूनही  मी ‘नाही’ म्हणाले.
कारण तेच, आपण शिकायला हवं. ते कशासाठी तर नोकरीसाठी? नोकरी कशासाठी? तर वडिलांनी मुलगी असूनही आपल्याला पोटाला टाचे देऊन शिकवलं, आपण नाठाळपणा करुन कसं चालेल.
तो विश्वासघात करणं अवघड होतं कारण मीच असं उठवळ वागले असते तर माङया पाठीवरच्या दोन बहिणींचंही शिक्षण खोळंबलं असतं, नव्हे बंदच झालं असतं.
मग काय वागा ‘शहाण्यासारखं’.
वागले.
ठरल्यावेळी कॉलेजात जायचं. नाकासमोर वर्गात शिरायचं. सगळी लेर कितीही बोअर झालं तरी मुकाट करायची. मग पुन्हा नाकासमोर वाट धरुन घरीच यायचं.
आलं की करा घरकाम.
त्यात कायम तू मोठी, तू समंजस हे पालूपद चिकटलेलंच.
धाकटय़ा भावंडांना वांडपणा करायची मुभा होती.
पण मी तसं करुन चाललं नसतं.
हे सतत ‘मोठेपणाचं’, ‘समंजसपणाचं’ आणि समजून घ्यायचं ओझंच मी वाहवत बसले.
 
******
आता मात्र मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, हे असं स्वत:लाच जबाबदा:यांत गुंडाळून हात बांधून घेणं खरंच गरजेचं होतं का?
म्हणजे वर्गात बसल्यानं, लेर केल्यानं, प्रेमात न पडल्यानं काही बिघडलं नाही. उलट फायदाच झाला.
नोकरी चांगली मिळण्याची शक्यता निर्माण झाली. आईबाबांनाही माझा अभिमानच वाटतो.
पण मग तरी मनातल्या मनात मला काय खातंय?
का मी कुढतेय?
आपण काय मिस केलं असं मला वाटतंय?
आणि ते मिस करण्याचा, कॉलेज लाईफ भरपूर न जगण्याचा, वयाप्रमाणो न वागण्याचा दोष मी कुणाला देतेय.?
घरच्यांना? परिस्थितीला? नशिबाला? की स्वत:ला?
 
******
खरंतर हा दोष मी स्वत:लाच द्यायला हवा असं नाही वाटतं?
म्हणजे आता मागे वळून पाहिल्यावर मला वाटतं दोष माझाच आहे, माङया विचार करण्याच्या पद्धतीचा आहे.
मीच स्वत:वर बंधन घातली.
माङया वयाप्रमाणो वागता मलाही आलं असतं.
मित्रमैत्रिणींबरोबर इतरजण करतात तशी माफक मजा करता आली असती.
खूप वाचता आलं असतं.
आवडीचं काम करता आलं असतं.
घरच्यांना सांगून, अभ्यास करुनही अनेक गोष्टी करत मला स्वत:ला मोकळं सोडता आलं असतं.
 
******
तसं मी केलं नाही.
मीच माङयाभोवती कुंपण घातलं आणि न झालेल्या वाढीचा दोष इतरांना माङयाही नकळत दिला.
 
******
एनीवे, आजवर जे झालं ते झालं.
आता मात्र मी ठरवलंय हसायचं खळखळून, बोलायचं.
कुढायचं नाही,
जे जमत नाही, जमणार नाही ते मन मारुन करण्यापेक्षा त्याला ‘नाही’ म्हणून बघायचं.
आणि स्वच्छंदी, मनापासून जगायचं.
 
******
हो, मनापासूनच जगायचं.
छान हसरं आयुष्य हवंय मला.
याचा अर्थ असा नाही की, माङयावरच्या जबाबदा:या कमी होती, ताण सरतील, अपेक्षा कमी होतील.
याचा अर्थ एवढाच की,
त्या सगळ्याचं ओझं घेऊन मी जगणार नाही.
माझं जगणं माङयासाठी भार होणार नाही.
जिंदगी का साथ निभाते चलेंगे यार.
जो भी मिले.खुशी से लेंगे.
-खुशी से जियेंगे भी.!
मेट्रोतले ते गाणं म्हणून मला फार आवडतं,
जे सांगतं,
है तुङो भी इजाजत
तू ख्वाब सजा.
तू जी ले जीरा.