शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

.है तुङो भी इजाजत

By admin | Updated: October 23, 2014 15:27 IST

आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.

हल्ली मी काही बोलतच नाही,
काय बोलणार?
आपण म्हणजे या जगातली असून, नसल्यासारखी, न दिसणारी, मिस्टर अॅण्ड मिस इंडिया गायब जमात आहोत असं मला आता वाटायला लागलं आहे.
यार, आपण म्हणजे ना आपापलं आडनाव बदलून सदारडे किंवा कुढे असं ठेवून घ्यायला पाहिजे असंही मला वाटतं.
बघा ना, आत्ता हेच बघा.मी हे असं सांगायला सुरूवात केल्याबरोबर तुम्ही इरीटेट झाला असाल, नो रोनाधोना प्लीज असा एक भाव तुमच्या चेह:यावर नकळत उमटून गेला असणार.
 
******
खरंय पण मी काय करू यार,
या ताईच्या बांगडय़ा टाईप आयुष्याचं.
जबाबदा:याच इतक्या अंगावर पडलेल्या आहेत की, जवानी दिवानी तुफानी करण्याचा काही चान्सच मला मिळाला नाही.
कॉलेजात असताना वाटायचं की, केलंच कुणी प्रपोज तर म्हणावं ‘हो’. त्याच्या बाईकवर बसून यावं मस्त फिरुन.
बरं, आम्ही संधीपासून वंचित असंही काही नाही.
म्हणजे विचारलंही एकादोघांनी पण माङो संस्कार आणि घरच्यांचा धाक दोन्हीही आडवे आले आणि इच्छा असूनही  मी ‘नाही’ म्हणाले.
कारण तेच, आपण शिकायला हवं. ते कशासाठी तर नोकरीसाठी? नोकरी कशासाठी? तर वडिलांनी मुलगी असूनही आपल्याला पोटाला टाचे देऊन शिकवलं, आपण नाठाळपणा करुन कसं चालेल.
तो विश्वासघात करणं अवघड होतं कारण मीच असं उठवळ वागले असते तर माङया पाठीवरच्या दोन बहिणींचंही शिक्षण खोळंबलं असतं, नव्हे बंदच झालं असतं.
मग काय वागा ‘शहाण्यासारखं’.
वागले.
ठरल्यावेळी कॉलेजात जायचं. नाकासमोर वर्गात शिरायचं. सगळी लेर कितीही बोअर झालं तरी मुकाट करायची. मग पुन्हा नाकासमोर वाट धरुन घरीच यायचं.
आलं की करा घरकाम.
त्यात कायम तू मोठी, तू समंजस हे पालूपद चिकटलेलंच.
धाकटय़ा भावंडांना वांडपणा करायची मुभा होती.
पण मी तसं करुन चाललं नसतं.
हे सतत ‘मोठेपणाचं’, ‘समंजसपणाचं’ आणि समजून घ्यायचं ओझंच मी वाहवत बसले.
 
******
आता मात्र मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की, हे असं स्वत:लाच जबाबदा:यांत गुंडाळून हात बांधून घेणं खरंच गरजेचं होतं का?
म्हणजे वर्गात बसल्यानं, लेर केल्यानं, प्रेमात न पडल्यानं काही बिघडलं नाही. उलट फायदाच झाला.
नोकरी चांगली मिळण्याची शक्यता निर्माण झाली. आईबाबांनाही माझा अभिमानच वाटतो.
पण मग तरी मनातल्या मनात मला काय खातंय?
का मी कुढतेय?
आपण काय मिस केलं असं मला वाटतंय?
आणि ते मिस करण्याचा, कॉलेज लाईफ भरपूर न जगण्याचा, वयाप्रमाणो न वागण्याचा दोष मी कुणाला देतेय.?
घरच्यांना? परिस्थितीला? नशिबाला? की स्वत:ला?
 
******
खरंतर हा दोष मी स्वत:लाच द्यायला हवा असं नाही वाटतं?
म्हणजे आता मागे वळून पाहिल्यावर मला वाटतं दोष माझाच आहे, माङया विचार करण्याच्या पद्धतीचा आहे.
मीच स्वत:वर बंधन घातली.
माङया वयाप्रमाणो वागता मलाही आलं असतं.
मित्रमैत्रिणींबरोबर इतरजण करतात तशी माफक मजा करता आली असती.
खूप वाचता आलं असतं.
आवडीचं काम करता आलं असतं.
घरच्यांना सांगून, अभ्यास करुनही अनेक गोष्टी करत मला स्वत:ला मोकळं सोडता आलं असतं.
 
******
तसं मी केलं नाही.
मीच माङयाभोवती कुंपण घातलं आणि न झालेल्या वाढीचा दोष इतरांना माङयाही नकळत दिला.
 
******
एनीवे, आजवर जे झालं ते झालं.
आता मात्र मी ठरवलंय हसायचं खळखळून, बोलायचं.
कुढायचं नाही,
जे जमत नाही, जमणार नाही ते मन मारुन करण्यापेक्षा त्याला ‘नाही’ म्हणून बघायचं.
आणि स्वच्छंदी, मनापासून जगायचं.
 
******
हो, मनापासूनच जगायचं.
छान हसरं आयुष्य हवंय मला.
याचा अर्थ असा नाही की, माङयावरच्या जबाबदा:या कमी होती, ताण सरतील, अपेक्षा कमी होतील.
याचा अर्थ एवढाच की,
त्या सगळ्याचं ओझं घेऊन मी जगणार नाही.
माझं जगणं माङयासाठी भार होणार नाही.
जिंदगी का साथ निभाते चलेंगे यार.
जो भी मिले.खुशी से लेंगे.
-खुशी से जियेंगे भी.!
मेट्रोतले ते गाणं म्हणून मला फार आवडतं,
जे सांगतं,
है तुङो भी इजाजत
तू ख्वाब सजा.
तू जी ले जीरा.