शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

By admin | Updated: January 8, 2015 20:34 IST

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर,

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर, अनोळखी, पुन्हा नव्यानं समजून घेऊ स्वत:ला, हा ‘अतीओळखीचा’ बोजा उतरवून ठेवता येईल का आपल्याला?’
-असं मी कितीदा विचारतो तिला ; खरंतर तर तिलाही तसंच वाटतं! पण ती म्हणते, ‘बरं झालं ना, आपल्याला एकमेकांचा खरा चेहरा तरी दाखवला या मोबाईलनं, या रोमॅण्टिसिझमपेक्षा मी हे वास्तव स्वीकारीन की नाहीयोत आपण एकमेकांना साजेसे.’
मला प्रश्न पडतो की, मग असं आमच्यात काय होतं की आम्ही एकमेकांना इतके आवडलो होतो की, गेले दोन वर्षे आम्ही एकमेकांशी रात्रंदिवस बोलतच सुटलो होतो, आणि आता शब्दांसह भावनांचा एकदम दुष्काळ पडला.’
अजिंक्या नावाच्या एका मित्रानं पाठवलेली ही ईमेल.
खरंतर अजिंक्यानं सांगितलं त्याहून वेगळं अनेक पत्रात काहीच नव्हतं. कळकळून लिहिलेल्या अनेक कहाण्या, वाचताना अस्वस्थ करणार्‍या. अनेक पत्रं वाचताना वाटलं की, आपण एखाद्या सुंदर लव्हस्टोरीची काही पानं वाचतो आहोत आणि मग एकदम व्हिलनची एण्ट्री व्हावी आणि त्यानं त्या लव्हबडर्सला एकदम शत्रू बनवावं तशी कहाणी टर्न मारते.
पण व्हिलन तरी कसं म्हणणार मोबाईलला, कारण त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, ती वाढ एकदम कॅन्सरस झाली, त्याचा दोष त्याला द्यायचा?
पण ही बहुतांश पत्रं मात्र आपल्या मोबाईलला म्हणजेच पर्यायानं आपल्या मोबाईलवरच्या बोलण्याला आणि त्या मोबाईलमुळे झालेल्या विश्‍वासघातालाच सारा दोष देतात.
त्या दोषांच्या कारणांवरची पुटं जरा  खरवडून काढली की दिसतात, या तरुण जोडप्यांनीच सांगितलेली ब्रेकपची खरी कारणं, आणि झालेला घोळ.
१)अनेकांना एकमेकांशी बोलण्याची ‘सवय’ लागते. व्यसनी माणसाचं होतं तसंच, मोबाईल अँडिक्शन, आपण एकटे नाही, कुणीतरी सोबत आहे, ‘आपलं’ आहे, या भावनेनं ते बोलत राहतात.भांडणं झाली तरी बोलतात, कारण ती भांडणसुद्धा आपण ‘एकाकी’ नाही, आपल्या जगण्यात काहीतरी मोठं आहे ही भावना पुरवतात. पण एकाचंच असं होत असेल तर दुसरा त्या नात्याला विटतो.
२) अनेकांना वाटतं, भेटायचं कशाला? आपण तासंतास फोनवर बोलतो, मेसेज, व्हॉट्सअँप करतो, भेटून आणि वेगळं काय बोलणार? आणि भेटलं की, फोनवर बोलणार्‍या व्यक्तीपेक्षा प्रत्यक्षातला माणूस वेगळा वाटतो, काही बोलणंच होत नाही, परस्परांविषयी आकर्षण वाटत नाही.असलेली ओढ कमी होते.
३)इतर मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी असलेली जवळीक, कुणातरी एका मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी असलेली ओढ आपल्या नात्यात अडसर दोघांपैकी एकाला ( प्रसंगी दोघांना) वाटू लागतो. ती नाती तोडण्यासाठी दबाव टाकला जातो, इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं, त्यातून भांडणं, अबोले, स्वातंत्र्यावर आक्रमण ही भावना आणि मग नको होतं नातं.
४) चोवीस तास कनेक्टेड असल्यानं अनेकजण खूप पझेसिव्ह होतात. इतके की दुसर्‍यानं श्‍वासही घेतला तर आपल्याला सांगावं असा विचार करतात. त्या पझेसिव्हनेसचा आणि चोवीत तास आपल्यावर वॉच आहे, या भावनेचा त्रास होऊ लागतो.
५) आता तर अनेकजण रोज काय घालायचं, सिनेमाला जाताना काय, स्वयंपाक काय केला इथपासून ते आपल्या इंटिमेट क्षणांपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो किंवा क्लिप काढून एकमेकांबरोबर शेअर करतात, भांडणं वाढली की ते सारं घरच्यांना दाखवीन किंवा व्हायरल करीन म्हणून धमक्याही देतात. न उरलेलं नातं खेचत राहतात.