शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

By admin | Updated: January 8, 2015 20:34 IST

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर,

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर, अनोळखी, पुन्हा नव्यानं समजून घेऊ स्वत:ला, हा ‘अतीओळखीचा’ बोजा उतरवून ठेवता येईल का आपल्याला?’
-असं मी कितीदा विचारतो तिला ; खरंतर तर तिलाही तसंच वाटतं! पण ती म्हणते, ‘बरं झालं ना, आपल्याला एकमेकांचा खरा चेहरा तरी दाखवला या मोबाईलनं, या रोमॅण्टिसिझमपेक्षा मी हे वास्तव स्वीकारीन की नाहीयोत आपण एकमेकांना साजेसे.’
मला प्रश्न पडतो की, मग असं आमच्यात काय होतं की आम्ही एकमेकांना इतके आवडलो होतो की, गेले दोन वर्षे आम्ही एकमेकांशी रात्रंदिवस बोलतच सुटलो होतो, आणि आता शब्दांसह भावनांचा एकदम दुष्काळ पडला.’
अजिंक्या नावाच्या एका मित्रानं पाठवलेली ही ईमेल.
खरंतर अजिंक्यानं सांगितलं त्याहून वेगळं अनेक पत्रात काहीच नव्हतं. कळकळून लिहिलेल्या अनेक कहाण्या, वाचताना अस्वस्थ करणार्‍या. अनेक पत्रं वाचताना वाटलं की, आपण एखाद्या सुंदर लव्हस्टोरीची काही पानं वाचतो आहोत आणि मग एकदम व्हिलनची एण्ट्री व्हावी आणि त्यानं त्या लव्हबडर्सला एकदम शत्रू बनवावं तशी कहाणी टर्न मारते.
पण व्हिलन तरी कसं म्हणणार मोबाईलला, कारण त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, ती वाढ एकदम कॅन्सरस झाली, त्याचा दोष त्याला द्यायचा?
पण ही बहुतांश पत्रं मात्र आपल्या मोबाईलला म्हणजेच पर्यायानं आपल्या मोबाईलवरच्या बोलण्याला आणि त्या मोबाईलमुळे झालेल्या विश्‍वासघातालाच सारा दोष देतात.
त्या दोषांच्या कारणांवरची पुटं जरा  खरवडून काढली की दिसतात, या तरुण जोडप्यांनीच सांगितलेली ब्रेकपची खरी कारणं, आणि झालेला घोळ.
१)अनेकांना एकमेकांशी बोलण्याची ‘सवय’ लागते. व्यसनी माणसाचं होतं तसंच, मोबाईल अँडिक्शन, आपण एकटे नाही, कुणीतरी सोबत आहे, ‘आपलं’ आहे, या भावनेनं ते बोलत राहतात.भांडणं झाली तरी बोलतात, कारण ती भांडणसुद्धा आपण ‘एकाकी’ नाही, आपल्या जगण्यात काहीतरी मोठं आहे ही भावना पुरवतात. पण एकाचंच असं होत असेल तर दुसरा त्या नात्याला विटतो.
२) अनेकांना वाटतं, भेटायचं कशाला? आपण तासंतास फोनवर बोलतो, मेसेज, व्हॉट्सअँप करतो, भेटून आणि वेगळं काय बोलणार? आणि भेटलं की, फोनवर बोलणार्‍या व्यक्तीपेक्षा प्रत्यक्षातला माणूस वेगळा वाटतो, काही बोलणंच होत नाही, परस्परांविषयी आकर्षण वाटत नाही.असलेली ओढ कमी होते.
३)इतर मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी असलेली जवळीक, कुणातरी एका मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी असलेली ओढ आपल्या नात्यात अडसर दोघांपैकी एकाला ( प्रसंगी दोघांना) वाटू लागतो. ती नाती तोडण्यासाठी दबाव टाकला जातो, इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं, त्यातून भांडणं, अबोले, स्वातंत्र्यावर आक्रमण ही भावना आणि मग नको होतं नातं.
४) चोवीस तास कनेक्टेड असल्यानं अनेकजण खूप पझेसिव्ह होतात. इतके की दुसर्‍यानं श्‍वासही घेतला तर आपल्याला सांगावं असा विचार करतात. त्या पझेसिव्हनेसचा आणि चोवीत तास आपल्यावर वॉच आहे, या भावनेचा त्रास होऊ लागतो.
५) आता तर अनेकजण रोज काय घालायचं, सिनेमाला जाताना काय, स्वयंपाक काय केला इथपासून ते आपल्या इंटिमेट क्षणांपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो किंवा क्लिप काढून एकमेकांबरोबर शेअर करतात, भांडणं वाढली की ते सारं घरच्यांना दाखवीन किंवा व्हायरल करीन म्हणून धमक्याही देतात. न उरलेलं नातं खेचत राहतात.