शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रोबोट पोलिसांच्या भरतीमुळे नोकऱ्या जातील कि येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 17:56 IST

तरुणाईमध्ये पोलीस अधिकारी बनण्याची क्रेझ खूपच मोठी आहे, पण केरळमध्ये नुकत्याच झालेल्या देशातल्या पहिल्या रोबोट पोलीस अधिकाऱ्याच्या भरतीमुळे तरुणांपुढे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचं याबाबतचं मत आहे, की यामुळे तरुणांनी हवालदिल होण्याचं कारण नाही. तंत्रज्ञान येतं, तसं ते आणखी नोकऱ्या घेऊन येतं. प्रशिक्षित तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी त्यामुळे वाढतेच.

- सोहम गायकवाडपोलीस, त्यातही पोलीस अधिकारी होण्यासाठी तरुणांमध्ये मोठीच क्रेझ आहे. त्यामुळे त्यासंबंधीत स्पर्धा परीक्षेला बसणाºया तरुणांची संख्याही खूप मोठी आहे.मात्र आता पोलिस खात्यात थेट रोबोट्सची ‘भरती’ होऊ लागल्याने आपल्या या इच्छेचं काय होणार अशी शंकेची पालही तरुणांच्या मनात चुकचुकते आहे.याचं कारण आहे, केरळ पालिसांत नुकत्याच भरती झालेल्या एका रोबोट पोलिसाचं. देशातला हा पहिलाच रोबोट पोलीस आहे.केपी-बॉट असं या रोबोट पोलिसाचं नाव असून थेट पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर या रोबोटची भरती करण्यात आली आहे.आपले कर्तव्य बजावत असाताना पोलिसांना तर तो मदत करीलच, पण सर्वसामान्य नागरिकांना सहाय्य करण्यासाठीही त्याची मदत होईल.सध्या तरी केरळ पोलीस हेडक्वॉर्टरच्या फ्रंट आॅफिसमध्ये या पोलीस सबइन्स्पेक्टरची ड्यूटी असेल.विविध तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचं स्वागत करणं आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना वेगवेगळ्या विभागात पाठवणं, पोलिसांना त्यांच्या कामात सहाय्य करणं हे सध्या या पोलिसाचं काम आहे.पोलीस दलातल्या या पहिल्या रोबोटचं मुख्यमंत्री विजयन यांनी सॅल्यूट ठोकून स्वागत करताच या रोबोटनंही त्यांना तितकाच कडक सॅल्यूट ठोकला.या रोबोटचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या अधिकाºयांनाही तो ओळखू शकतो आणि ते समोर आल्यानंतर त्यांना तो सॅल्यूटही ठोकतो.मुख्य म्हणजे हा पोलीस सब इन्स्पेक्टर एक महिला रोबोट आहे.रोबोट पोेलिसांच्या भरतीमुळे पोलिसांत जाण्याची इच्छा असणाºया असंख्य तरुणांना मात्र एक शंकाही आता भेडसावते आहे.या क्षेत्रातही रोबोट्सचा शिरकाव झाल्यावर आमच्या नोकºयांचं काय, पोलीस क्षेत्रातल्या आमच्या नोकºया कमी होतील की काय, अशी शंका अनेक तरुणांनी बोलून दाखवली आहे.तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचं मात्र याबाबतचं मत आहे, की यामुळे तरुणांनी हवालदिल होण्याचं कारण नाही. तंत्रज्ञान येतं, तसं ते आणखी नोकºया घेऊन येतं. प्रशिक्षित तरुणांसाठी नोकºयांची संधी त्यामुळे वाढतेच. यापूर्वीही ज्या ज्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आलं, त्यावेळी नोकºयांची संधी वाढलीच. या तंत्रज्ञानाशी तरुणांनी आपली जवळीक वाढवली पाहिजे इतकंच. भारतात संगणक आले, त्यावेळीही हीच शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त केली गेली होती, पण नंतर ती निराधार ठरली. शिवाय पोलिसांत भरती केला गेलेला रोबोट हा प्रतिकात्मक आहे, सगळ्या पोलीस खात्यांत नंतर रोबोट्सच दिसतील असं कदापि होणार नाही.पोलिसांत भरती झालेल्या भारतातल्या पहिल्या रोबोटमुळे एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट झाली आहे, की तंत्रज्ञानाशी तरुण जेवढं जुळवून घेतील, त्या संदर्भातील क्षेत्राचा जेवढा अभ्यास करतील, त्यात नैपुण्य मिळवतील, त्यामुळे त्यांच्यासाठी संधींची आणखी अनेक दारं खुली होतील.काही तरुणांनी यासंदर्भात काही मजेशीर शंकाही व्यक्त केल्या आहेत.पोलीस आणि चिरीमिरी यांचं नातं अतूट आहे असं समजलं जातं. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. आता हा रोबोट अधिकारी पोलीस खात्यातील चिरीमिरीला आळा घालील की तोही चिरीमिरी घ्यायला शिकेल, हे बघायला हवं, असं या तरुणांचं म्हणणं आहे. शिवाय गुन्हेगारी रोखणं, समाजाला शिस्त लावणं, चोरांना हुडकून काढणं, हे पोलिसांचं मुख्य काम, पण या रोबोटलाच जर चोरांनी पळवून नेलं तर?.. अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे!..(छायाचित्र आंतरजालावरुन साभार.)