शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

का लिहायचं पण..

By admin | Updated: March 10, 2017 13:09 IST

आज कितीतरी दिवसांनी असं पेनाने कागदावर लिहायला घेतलंय. नाहीतर लॅपटॉप-कीबोर्डचीच सवय झालीय आजकाल. माझंच आहे ना हे अक्षर? किती वेगळं वाटतंय-खूप दिवसांनी पाहतोय म्हणून कदाचित.

प्रसाद सांडभोर
 
आज कितीतरी दिवसांनी असं पेनाने कागदावर लिहायला घेतलंय. नाहीतर लॅपटॉप-कीबोर्डचीच सवय झालीय आजकाल. माझंच आहे ना हे अक्षर? किती वेगळं वाटतंय-खूप दिवसांनी पाहतोय म्हणून कदाचित. पण बरंच बरं झालंय आता. शाळेत असतानाचं अक्षर किती वेगळं होतं-वेळेसोबत, माझ्यासोबत अक्षरदेखील वाढलंय, बदललंय. हो. तरमाडेबाई काय बरं म्हणतील हे अक्षर पाहून? शाळेत असताना दररोज शुद्धलेखन करून घ्यायच्या-‘त’ चा दांडा नीट खालपर्यंत आलाच पाहिजे-‘न’ च्या टोकातला गोल गोल असला पाहिजे- ‘य’ ‘य’सारखा दिसायला हवा-‘प’सारखा नको. ‘प’ वेगळा असतो आणि ‘म’ वेगळा आणि हा ‘स’-असा हवा... अक्षराला नीट वळण लागावं म्हणून रेषांचं कुंपण - आधी चार-मग दोन आणि अखेर एका रेषेचं... रेषेला लागूनच लिहायचं, का बरं असा अट्टाहास? आजकाल तर मला रेषांची प्रचंड चीड येते. मला नाही आवडत दुसऱ्या कुणीतरी आखलेल्या रेषांतून लिहायला-अगदी अडकल्यागत वाटतं-दोन भिंतींमध्ये कोंडल्यासारखं. असा बिनरेषांचा कोरा सपाट कागद छान वाटतो. मोकळा वाटतो. चांगलं अक्षर काढण्याचे नियम नुसत्या अक्षरांपुरतेच मर्यादित नाहीत हं! अक्षरं जोडून बनणार शब्द आणि शब्दांची वाक्य. एका वाक्यातल्या सर्व शब्दांदरम्यान समान अंतर हवं. फार जास्तही नको आणि फार कमीदेखील नको. शब्दांच्या डोक्यावर रेष हवी. ती शब्दाच्या थोडी आधी सुरू व्हावी आणि थोडी नंतर संपावी. सगळं कसं नीटनेटकं हवं. दुसरऱ्या कोणाला वाचता आलं पाहिजे की नाही? का बरं? दुसऱ्यांनी वाचावं म्हणून नाही लिहायचं मला. ठीकय, दुसऱ्यांचा विचार नको करूस. पण उद्या तुझं तुला तर वाचता यायला हवं ना काय लिहिलंयस ते? उद्या वाचायचं म्हणून आज लिहू होय मी? कशाला ते? मला आत्ता लिहायचंय म्हणून लिहितोय मी - उद्याचं उद्या-नंतरचं नंतर-आत्ताचं-आत्ता.