शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा का घ्यावा लागतो?

By admin | Updated: February 25, 2016 21:51 IST

एक साधा प्रश्न. एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नात

एक साधा प्रश्न.एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नातमुलीकडून हुंडा का घेतात?‘आॅक्सिजन’ला आलेलीपत्रं आणि ई-मेल्समध्ये बारीक नजरेनं शोधून पाहिलं,तर सापडतातचक्रावून टाकणारीकाही उत्तरंमुलीकडच्यांना शहरातलाच पोरगा हवा,तोही शक्यतो सरकारी नोकरीवाला.त्यातही पोलिसांत, महसूल खात्यात,एरिगेशनवाला असेल तर सोन्याहून पिवळं.नाहीतर बॅँक/एलआयसी त्यातल्या त्यात बरं,अशी पोरं गाठायची म्हणून मुलींचे वडीलपैशाच्या पोत्यांची तोंडं उघडतातआणि जास्त हुंडे देऊन का होईनासुपारी फोडतात.शहरी/नोकरीवाला मुलगाच पाहिजे,हा आग्रह हुंड्याच्या रकमा वाढवतो आहे.हुंडा नको असं म्हणणाऱ्या मुलालाखेड्यापाड्यात कुणी मुलगी देत नाहीत,असाही अनुभव येतो म्हणतात.कारण ‘अशा’ मुलाबद्दल शंका येतात.याचं आधी लग्न झालेलं असलं पाहिजे,काहीतरी शारीरिक दोष असणार,काहीतरी कमी असणार असं म्हणतमुलींचे वडील हुंडा नको म्हणणाऱ्यांनाबाहेरचा रस्ता दाखवतात.‘शिक्षण संस्था, बॅँका,खासगी कंपन्यांमध्ये मुलालापर्मनण्ट नोकरी मिळेल, त्यासाठीफक्त काही लाख द्या,पगार तर काय मरेपर्यंत तुमची मुलगीच खाणार,’असं म्हणत मुलीच्या वडिलांकडूनकाही लाख घेतले जातात.ते दिलेही जातात,पुन्हा कारण तेच, शहरी-नोकरीवाला मुलगा हवा.आपण किती हुंडा घेतला,हे सांगणंच नव्हे तरआपण किती हुंडा दिला हे सांगणंही समाजातसध्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे.थेट रोख रकमेचा हुंडा आता मागितला जात नाही,त्याऐवजी आलिशान लग्न, दागिने, गाड्या, घर,नोकरीसाठी पैसा ते देश-विदेशातील हनिमून पॅकेजया स्वरूपात देवाणघेवाण होते आहे.घरच्या मुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करून हुंडा दिलेला असतोच, त्याची भरपाई म्हणूनमुलांच्या लग्नात हुंडा घेणं हे जनमान्य!‘दिला, मग घ्यायचा का नाही?’- हे तर्कट सांगून नव्या विचारांच्यामुलांना हुंड्यासाठी तयार करूनइमोशनल ब्लॅकमेल करण्याचंही प्रमाण बरंच मोठं असावं, असं ही पत्रं सांगतात.अनेक मुलांना हुंडा ही आपल्या गुणवत्तेची सामाजिक पत आहे असं वाटतं.जितका हुंडा जास्त,तितका आपल्याला समाजात मान जास्त,असं त्यांचं मत बनतं आहे.हुंड्यापायी होणारा छळ पाहून मुलींचा हुंड्याला विरोध असतो,पण तो विरोध व्यक्त केला तर आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती मोठी असते.घरच्यांचा धाक आणि हुंडा देऊन,लग्नाचा खर्च करण्याची अपरिहार्यता.कर्ज काढून, शेती विकून लग्नासाठी पैसा उभा करणारे हतबल वडील पाहूनअनेकींना मनस्वी त्रास होतो.त्याउलट वडिलांनी आपलं लग्न थाटामाटात करून द्यायला हवं,सगळा संसार, दागदागिने, हवी ती वस्तू द्यायलाच हवी,तो आपला हक्कच आहे, असं वाटणाऱ्याही काही मुलीया पत्रांमध्ये भेटतात.हुंडा घेऊ नये,हुंडा ही अत्यंत वाईट परंपरा आहे, यावरवैचारिक एकमत म्हणावं इतकी सहमती आहे.मात्र तो ‘नाईलाज’ म्हणून घ्यावा लागतो,असा बहुसंख्य तरुण मुलांचा सूर!