शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

हुंडा का घ्यावा लागतो?

By admin | Updated: February 25, 2016 21:51 IST

एक साधा प्रश्न. एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नात

एक साधा प्रश्न.एरवी आधुनिकतेच्या गप्पा मारणारे तरणेताठे मुलगे लग्नातमुलीकडून हुंडा का घेतात?‘आॅक्सिजन’ला आलेलीपत्रं आणि ई-मेल्समध्ये बारीक नजरेनं शोधून पाहिलं,तर सापडतातचक्रावून टाकणारीकाही उत्तरंमुलीकडच्यांना शहरातलाच पोरगा हवा,तोही शक्यतो सरकारी नोकरीवाला.त्यातही पोलिसांत, महसूल खात्यात,एरिगेशनवाला असेल तर सोन्याहून पिवळं.नाहीतर बॅँक/एलआयसी त्यातल्या त्यात बरं,अशी पोरं गाठायची म्हणून मुलींचे वडीलपैशाच्या पोत्यांची तोंडं उघडतातआणि जास्त हुंडे देऊन का होईनासुपारी फोडतात.शहरी/नोकरीवाला मुलगाच पाहिजे,हा आग्रह हुंड्याच्या रकमा वाढवतो आहे.हुंडा नको असं म्हणणाऱ्या मुलालाखेड्यापाड्यात कुणी मुलगी देत नाहीत,असाही अनुभव येतो म्हणतात.कारण ‘अशा’ मुलाबद्दल शंका येतात.याचं आधी लग्न झालेलं असलं पाहिजे,काहीतरी शारीरिक दोष असणार,काहीतरी कमी असणार असं म्हणतमुलींचे वडील हुंडा नको म्हणणाऱ्यांनाबाहेरचा रस्ता दाखवतात.‘शिक्षण संस्था, बॅँका,खासगी कंपन्यांमध्ये मुलालापर्मनण्ट नोकरी मिळेल, त्यासाठीफक्त काही लाख द्या,पगार तर काय मरेपर्यंत तुमची मुलगीच खाणार,’असं म्हणत मुलीच्या वडिलांकडूनकाही लाख घेतले जातात.ते दिलेही जातात,पुन्हा कारण तेच, शहरी-नोकरीवाला मुलगा हवा.आपण किती हुंडा घेतला,हे सांगणंच नव्हे तरआपण किती हुंडा दिला हे सांगणंही समाजातसध्या अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जात आहे.थेट रोख रकमेचा हुंडा आता मागितला जात नाही,त्याऐवजी आलिशान लग्न, दागिने, गाड्या, घर,नोकरीसाठी पैसा ते देश-विदेशातील हनिमून पॅकेजया स्वरूपात देवाणघेवाण होते आहे.घरच्या मुलींच्या लग्नात वारेमाप खर्च करून हुंडा दिलेला असतोच, त्याची भरपाई म्हणूनमुलांच्या लग्नात हुंडा घेणं हे जनमान्य!‘दिला, मग घ्यायचा का नाही?’- हे तर्कट सांगून नव्या विचारांच्यामुलांना हुंड्यासाठी तयार करूनइमोशनल ब्लॅकमेल करण्याचंही प्रमाण बरंच मोठं असावं, असं ही पत्रं सांगतात.अनेक मुलांना हुंडा ही आपल्या गुणवत्तेची सामाजिक पत आहे असं वाटतं.जितका हुंडा जास्त,तितका आपल्याला समाजात मान जास्त,असं त्यांचं मत बनतं आहे.हुंड्यापायी होणारा छळ पाहून मुलींचा हुंड्याला विरोध असतो,पण तो विरोध व्यक्त केला तर आपलं लग्न कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती मोठी असते.घरच्यांचा धाक आणि हुंडा देऊन,लग्नाचा खर्च करण्याची अपरिहार्यता.कर्ज काढून, शेती विकून लग्नासाठी पैसा उभा करणारे हतबल वडील पाहूनअनेकींना मनस्वी त्रास होतो.त्याउलट वडिलांनी आपलं लग्न थाटामाटात करून द्यायला हवं,सगळा संसार, दागदागिने, हवी ती वस्तू द्यायलाच हवी,तो आपला हक्कच आहे, असं वाटणाऱ्याही काही मुलीया पत्रांमध्ये भेटतात.हुंडा घेऊ नये,हुंडा ही अत्यंत वाईट परंपरा आहे, यावरवैचारिक एकमत म्हणावं इतकी सहमती आहे.मात्र तो ‘नाईलाज’ म्हणून घ्यावा लागतो,असा बहुसंख्य तरुण मुलांचा सूर!