शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील ऋतुराज देशमुख वयाच्या २१ व्या वर्षी त्यानं स्वत:सह गावात पॅनल निवडून आणलं.तो विचारतो, हातावर हात ठेवून किती दिवस बसायचं?

-समीर इनामदार

तरुण पोरांनी नुसतंच किती दिवस सतरंज्या उचलायच्या? नुसतं फेसबुक, व्हॉट्‌स ॲपवर लिहून उपयोग होत नसतो, थेट मैदानात उतरून सत्ता मिळवायला हवी.. विकास आपल्याला पाहिजे तर आपण कष्ट करू, आपण पुढं होऊन काम करू..

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाचा ऋतुराज रवींद्र देशमुख सांगत असतो. वय २१ वर्षे.

त्याच्या गावात गेल्यावर लक्षात येतं की तो जे काही गावच्या विकासाचं स्वप्न, त्याच्या दोस्तांना सोबत घेऊन पाहतोय ते बोलण्याइतकं सोपं काम नाही. त्याच्या गावाला ना रस्ता आहे ना प्यायला पाणी. नदी गावाजवळून गेली असली तरी आयाबाया डोक्यावर हंडा घेऊन पाण्याला जातात.

ऋतुराज म्हणतो, या साऱ्याची मला चीड आली. इलेक्शन लागलं तसं ठरवलं की, आपण लढायचं. किती दिवस नुसतं हातावर हात ठेवून बसून राहायाचं? वारंवार सांगूनही काही होत नसेल तर ही सिस्टिम बदलली पाहिजे. त्यासाठी आपण निवडणूक लढविली पाहिजे.

मग त्यानं त्यानं नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनेते बाबुराव पाटील पॅनल उभं केलं. सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य निवडून आले आहेत. आता सत्ता त्यांचीच. या तरुण मुलानं आपला प्रचार प्रत्यक्ष केला तसा सोशल मीडियाचा वापर करूनही केला. वचननामा तयार केला तो गावकऱ्यांना दिला. गावच्या लोकांनीही या तरुण पोरांवर विश्वास टाकत, त्यांना निवडून दिलं.

ऋतुराजला तर म्हटलं तू निवडून तर आलास, तुझं पॅनलही जिंकलं, आता पुढं काय?

तो सांगतो, ‘आता गाव बदलायचं. एकदम पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडीसारखं. गावात दुधाचा मुख्य व्यवसाय. शेतीसोबत लोक दुधाचा धंदा करतात. गावात ४५०० लीटर दूध तयार होतं. हे सारं गृहित धरून गावाला मुख्य प्रवाहात आणायचंय. गावाला चांगले रस्ते असले पाहिजेत, वृद्ध, महिलांना डोक्यावर पाणी आणायाला नको यासाठी पाण्याची टाकी बांधायची, गावात कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे, पाण्याचा ऑडिट झालं पाहिजे.’

बी.एस्सी. केल्यानंतर पुण्यात विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या ऋतुराजला आता सरपंच होण्याची इच्छा आहे. २७ जानेवारीला सरपंचपदाचं आरक्षण जाहीर होईल, तेव्हा कळेल तो सरपंच होतो किंवा नाही.

मात्र निवडून येण्याइतपत विश्वास त्यानं कमावला. तो सांगतोच,

एखादी गोष्ट आवडली नाही तर ती बदलण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. दुसरं कुणी येईल आणि आपलं भवितव्य बदलेल असं असणार नाही. त्यासाठी स्वत:च व्यवस्थेत उतरु, व्यवस्था बदलू, काम करू!

 

( समीर लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहे.)

joyasam@gmail.com