शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तरुणांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 08:00 IST

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील ऋतुराज देशमुख वयाच्या २१ व्या वर्षी त्यानं स्वत:सह गावात पॅनल निवडून आणलं.तो विचारतो, हातावर हात ठेवून किती दिवस बसायचं?

-समीर इनामदार

तरुण पोरांनी नुसतंच किती दिवस सतरंज्या उचलायच्या? नुसतं फेसबुक, व्हॉट्‌स ॲपवर लिहून उपयोग होत नसतो, थेट मैदानात उतरून सत्ता मिळवायला हवी.. विकास आपल्याला पाहिजे तर आपण कष्ट करू, आपण पुढं होऊन काम करू..

- सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील घाटणे गावाचा ऋतुराज रवींद्र देशमुख सांगत असतो. वय २१ वर्षे.

त्याच्या गावात गेल्यावर लक्षात येतं की तो जे काही गावच्या विकासाचं स्वप्न, त्याच्या दोस्तांना सोबत घेऊन पाहतोय ते बोलण्याइतकं सोपं काम नाही. त्याच्या गावाला ना रस्ता आहे ना प्यायला पाणी. नदी गावाजवळून गेली असली तरी आयाबाया डोक्यावर हंडा घेऊन पाण्याला जातात.

ऋतुराज म्हणतो, या साऱ्याची मला चीड आली. इलेक्शन लागलं तसं ठरवलं की, आपण लढायचं. किती दिवस नुसतं हातावर हात ठेवून बसून राहायाचं? वारंवार सांगूनही काही होत नसेल तर ही सिस्टिम बदलली पाहिजे. त्यासाठी आपण निवडणूक लढविली पाहिजे.

मग त्यानं त्यानं नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनेते बाबुराव पाटील पॅनल उभं केलं. सात सदस्यीय ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य निवडून आले आहेत. आता सत्ता त्यांचीच. या तरुण मुलानं आपला प्रचार प्रत्यक्ष केला तसा सोशल मीडियाचा वापर करूनही केला. वचननामा तयार केला तो गावकऱ्यांना दिला. गावच्या लोकांनीही या तरुण पोरांवर विश्वास टाकत, त्यांना निवडून दिलं.

ऋतुराजला तर म्हटलं तू निवडून तर आलास, तुझं पॅनलही जिंकलं, आता पुढं काय?

तो सांगतो, ‘आता गाव बदलायचं. एकदम पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडीसारखं. गावात दुधाचा मुख्य व्यवसाय. शेतीसोबत लोक दुधाचा धंदा करतात. गावात ४५०० लीटर दूध तयार होतं. हे सारं गृहित धरून गावाला मुख्य प्रवाहात आणायचंय. गावाला चांगले रस्ते असले पाहिजेत, वृद्ध, महिलांना डोक्यावर पाणी आणायाला नको यासाठी पाण्याची टाकी बांधायची, गावात कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे, पाण्याचा ऑडिट झालं पाहिजे.’

बी.एस्सी. केल्यानंतर पुण्यात विधी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या ऋतुराजला आता सरपंच होण्याची इच्छा आहे. २७ जानेवारीला सरपंचपदाचं आरक्षण जाहीर होईल, तेव्हा कळेल तो सरपंच होतो किंवा नाही.

मात्र निवडून येण्याइतपत विश्वास त्यानं कमावला. तो सांगतोच,

एखादी गोष्ट आवडली नाही तर ती बदलण्यासाठी स्वत: पुढे आले पाहिजे. दुसरं कुणी येईल आणि आपलं भवितव्य बदलेल असं असणार नाही. त्यासाठी स्वत:च व्यवस्थेत उतरु, व्यवस्था बदलू, काम करू!

 

( समीर लोकमतच्या सोलापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहे.)

joyasam@gmail.com