शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तुमचं पटतं का लोकांशी?

By admin | Updated: August 7, 2014 21:24 IST

जेव्हा तुम्ही एखाद्या जागी काम करता, तेव्हा तुम्ही फक्त एकटेच नसता, तुमच्यासारखे बरेच जण तिथं नोकर्‍या करतात.

जेव्हा तुम्ही एखाद्या जागी काम करता, तेव्हा तुम्ही फक्त एकटेच नसता, तुमच्यासारखे बरेच जण  तिथं नोकर्‍या करतात. आपापल्या कामात मग्न असतात. या सर्व लोकांसोबत तुम्हाला जुळवून घ्यावं लागतं. तुमचं काम तुमच्या सहकार्‍यांवरसुद्धा अवलंबून असू शकतं. त्यात कंपनीतलं वातावरण वेगळं असतं. स्पर्धा असते. प्रत्येकाला प्रगती करायची असते, पगार वाढवून घ्यायचा असतो, प्रमोशन हवं असतं. प्रत्येकाचं ध्येयच स्वत:ची प्रगती हेच असतं.  अशावेळेस काही कारणांमुळे बरीचशी मंडळी इतरांना सहकार्य करत नाहीत. काहींच्या मनात भीती असते, काही लोकांना स्वत:चं नॉलेज फक्त बॉससमोर दाखवायचं असतं.  आणि इथंच खरे प्रश्न निर्माण होतात.
 दक्षिण आफ्रिकेतल्या जंगलातल्या वाघ आणि हरणाच्या कथेसारखं असतं हे सारं. म्हणजे काय तर रोज भल्या पहाटे वाघ आणि हरीण उठत आणि पळायला लागत. पण दोघांची ध्येयं वेगवेगळी, पळत दोघंही, जिवाच्या आकांतानं पळत, पण ध्येय वेगळं. वाघाला आपल्या पोटासाठी हरणाची शिकार करायची म्हणून तर हरणाला आपला जीव वाचविण्यासाठी पळावं लागायचं.
नोकरदार माणसांचं आयुष्यही असंच  असतं. कोणीतरी वाघ असतो, कोणीतरी हरीण असतं. पळापळ मात्र अटळच. 
अशा वातावरणात तुम्ही हे सर्व कसं हँडल करता यावर तुमचं यश अवलंबून असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांसोबत काम करताना थोडं कठीण जाऊ शकतं. प्रत्येकाची वागण्याची तर्‍हा वेगवेगळी असते. काही जण स्वत:चं स्वत:चं बघतात, काही जण सहकार्य करतात, काही जण सहकार्य करण्याचं नाटक करतात. काही जण तुम्हाला उभंही करत नाहीत. अशा एकंदरीत जंगलात तुम्ही तुमचं काम कसं करून घेता अथवा दुसर्‍याकडून कसं करून घेता हे महत्त्वाचं ठरतं. नव्या काळात तर हे सूत्र फारच महत्त्वाचं ठरत चाललं आहे.
मात्र हे लक्षात न घेता, बरेच विद्यार्थी, उमेदवार आपल्या बायोडाटावर बिनधास्त लिहितात.
ह्ल¬ िकल्ल३ी१स्री१२ल्लं’ र‘्र’’२. त्याचा अर्थ त्यांना माहितीच नसतो. कुठून तरी कॉपी-पेस्ट करून बायोडाटात लिहून टाकतात. 
आणि प्रत्यक्ष प्रश्नात मात्र फसतात. 
‘वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, वेगवेगळी ध्येयं असणार्‍या लोकांसोबत राहून, त्यांचा विश्‍वास संपादन करून, कधीतर त्यांना प्रभावित करून तुम्ही तुमचं काम करू शकता का?’ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा मात्र उमेदवारांकडे त्यांचं उत्तर नसतं. कारण अनेकांनी या सार्‍याचा काही विचारच केलेला नसतो.
तो करायला हवा. पाण्यात पडल्यावर पोहायला येईल, असं म्हणून नाही चालणार, ते आधीपासूनच शिकायला हवं, तसा निदान विचार तरी करायला हवा.
ऑफिसातलं वातावरण म्हणजे तरी काय मानवी संबंधांचंच जाळं असतं. आयुष्यामध्ये मानवी संबंध कसे प्रस्थापित करता आणि जोपासता, हे खूप फायद्याचं ठरू शकतं. हे मानवी संबंध तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठेपणा सिद्ध करत असतात. 
तेव्हा लक्षात ठेवा, मुलाखतीच्या वेळेस कम्युनिकेशन स्किल यासंदर्भात काही प्रश्न विचारून मुलाखतकर्ता हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही माणसांशी नक्की कसं वागाल? 
तुम्ही जे उत्तर द्याल त्यातून त्याला कळायला हवं की, तुमचा मानवी स्वभावाचा अभ्यास कसा आहे? इतरांचा स्वभाव समजल्यावर तुम्ही कसे वागाल, तुमच्या वागण्यानं समोरच्याला कसं प्रभावित कराल? समोरच्या व्यक्तीच्या स्वभावानुसार तुमचं वर्तन तुम्ही कसं ट्यून कराल?
वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींसोबत आत्मविश्‍वासानं कसं वागता? स्वत:ची प्रतिमा कशी तयार/निर्माण कराल?
कशा पद्धतीनं आणि किती वेगानं मिक्स अप होऊ शकाल?
आणि मुख्य म्हणजे इतर व्यक्तींशी तुम्ही कसे संबंध जोपासाल?
अर्थात असं समजू नका की, सर्व मुलाखतकर्ता हे सर्व तुम्हाला असे डायरेक्ट प्रश्न विचारेल आणि मग तुम्ही उत्तर द्याल. तो प्रश्न भलताच विचारेल आणि तुमच्या उत्तरावरून तुमच्या या क्षमतेचा अंदाज बांधेल.  मुलाखतीत तुम्ही जी उत्तरं द्याल त्यावरून तुमच्या कम्युनिकेशन स्किलचाच नाही तर माणसं जोडण्याच्या कलेचाही अंदाज येईल, नुस्तं बायोडाटात गुड इण्टरपर्सनल स्किल्स असं लिहिलं की काम भागत नसतंच.
- विनोद बिडवाईक