शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

तरूण मुलं आज सुखी समाधानी का नाहीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 06:25 IST

तरुण मुलांकडे आज साधनं आहेत;पण स्वास्थ्य नाही. ते कनेक्टेड आहेत; पण स्वत:पासून तुटलेत, असं का?

-प्रा. मधुकर चुटे

आजच्या प्रचंड वेगवान युगामध्ये जेवढी भौतिक सुखं प्राप्त होतात, तशाच अनेक समस्याही वेगाने तयार होतात. त्यातलाच एक भाग म्हणजे आजच्या तरुणाईचा असा समज झाला आहे, की विज्ञान-तंत्नज्ञान हीच आपल्या सुखाची किल्ली आणि दु:खावर मात्रा आहे.  हे अगदीच खरं आहे की, तंत्रज्ञानामुळे आज तरुणाईचे कष्ट कमी झालेत. किंवा कमी कष्टात भरपूर पैसा आणि सुविधांचं सुख मिळू लागलं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आज तरुण अनेक संकटांवर मात करू शकतात. सगळं जगच खूप जवळ आलं आहे. एकाच ठिकाणी बसून आपली अनेक कामं करणं सहज शक्य झालं आहे. पण मग असं असूनही ही तरुण मुलं मनापासून सुखी किंवा समाधानी का वाटत नाहीत? करिअर, उत्तम पगार एकीकडे कमावणारे अनेकजण आहेत; पण त्यापायी त्यांची जीवनशैलीसुद्धा बदलते आहे. पैसे आहेत, अनेक प्रकारची सुखसाधनं आहेत; पण मानसिक समाधान नाही. अनेक लाइफ स्टाइल डिसीज अर्थात आजार तारुण्यातच जवळ येत आहेत, ते का? याचाही तरुणांनी विचार करायला हवा. ताण-तणावाचा आणि धावपळीचा परिणाम आजच्या तरु ण वर्गावर मोठय़ा प्रमाणात होताना दिसतोय. जे आजार किंवा व्याधी साठाव्या वर्षी येऊ शकतात त्या तीस ते चाळीसव्या वर्षीच तरुणांवर आक्रमण करीत आहेत. हे असं होण्यामागची कारणं काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. मी माझ्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, अनेक तरुणांना भेटतो, त्यातून मला या काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. 

1) मोठय़ा पगाराच्या नोकरीसाठी वाट्टेल तितका वेळ काम करावं लागते. कोणत्याही व्यक्तींची काम करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता ठरलेली असते. म्हणजे जास्तीत जास्त आठ ते दहा तास काम करणं कोणालाही सहज शक्य होतं; परंतु आज बारा ते सोळा तास एवढं काम अनेकजण करतात. याशिवाय घरी आल्यावरही लॅपटॉपसमोर बसून उरलेली कामं करावी लागतात. ऑफिसच्या कामासाठी करावा लागणा-या प्रवासाची तयारी ठेवावी लागते. 

2. आज बाविसाव्या किंवा तेविसाव्या वर्षी नोकरीला लागलेला तरुण किंवा तरुणी पुढच्या दहा वर्षांमध्ये याच पद्धतीने सोळा-सोळा तास काम सतत करत असतात. म्हणजे वयाच्या तीस-पस्तीसाव्या वर्षी त्यांची शारीरिक आणि  मानसिक क्षमता कमी होऊ लागते. ही मुलं एक्झॉस्ट किंवा बर्न आउट झाल्यासारखी दिसतात. होतातही. 

3. नैराश्य किंवा एकटेपणा हीदेखील एक मोठी समस्या ठरत आहे. कारण आजच्या सगळ्या या आधुनिक जीवनशैलीमुळे  तरुणवर्ग सतत इंटरनेट किंवा मोबाइलच्या संपर्कात असतो. चोवीस तासांपैकी त्याचे सहा ते आठ तास हे मोबाइल किंवा इंटरनेटमध्येच खर्च होत असतात. याचा परिणाम असा होतो की आजच्या  तरुणाईकडे स्वत:साठी कोणताही वेळ उरत नाही. कारण या दोन्ही गोष्टींमुळे ते आपल्या मित्रांशी बोलत राहतात. सोशल नेटवर्किंगमुळे काही ना काही चर्चा करत राहतात. परंतु आपल्या मनाला किंवा मेंदूलासुद्धा थोडावेळ ते विश्रांती देऊ शकत नाही. इतरांशी मोबाइलवरून गप्पा मारण्यातच त्यांचा वेळ जात असतो. मग त्यांच्याकडे स्वत:साठी कोणताच वेळ उरत नाही. या सगळ्या आकर्षणामुळे तरुणवर्ग त्यांच्या घरातील लोकांशीसुद्धा संपर्कात राहत नाही, संवादही होत नाही. मग रिकामं मन त्यांना सतत अस्वस्थ करत राहते. 

4. हायपर टेन्शन , डिप्रेशन किंवा हृदयरोग यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचे दिसते. देशातील तरुणाई तरु ण वयात जर अशा अकाली आजारांना बळी पडली तर ते देशासाठी मोठंच नुकसान म्हणावं लागेल. हे सारं  गंभीर आहे. तेव्हा तरुण मुलांनी जरा स्वत:च्या स्वास्थ्याचा विचार केलेला बरा. 

( लेखक नागपूरस्थित महाविद्यालयात व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख आहेत.)