शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही

- किरण पवार

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही. आणि घेतला तरी आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येत नाही. या विषयावर चित्रपट तयार झाले पण त्यामध्ये मुळ कारणं बाजुलाच राहिली.विद्यार्थी का आत्महत्या करतात याची कारणं मी मांडू शकत नाही पण एक महत्वाचं कारण मला यामागे दिसतं. ते म्हणजे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. निर्णय घेता येत नाहीत किंवा घेतलेच जात नाही. त्यात मानसिक शिण बराच येतो. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण कराल तर अशी मुलं नेहमी दडपणात जगत असतात. सतत त्यांच्या मनात काही ना काही विचार सुरूच असतात. अशा मुलांना पालकांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेवू द्यायला हवेत. त्यांच्यावर आपला निर्णय लादण्याची घाई करू नये. किंवा त्यांना सतत दुसऱ्या मोठ्या, यशस्वी मुलांची उदाहरणं दिली जातात ती थांबवली पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते यशस्वी झालेले असतात कारण त्यांनी त्यांच्या करिअरचे निर्णय स्वत: घेतलेले असतात. पालक सतत तुलनाच करत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते डिप्रेशनच्या गर्तेत फेकले जातात.