शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

मुलांना आत्महत्येच्या टोकावर पोहचवतं कोण?

By admin | Updated: April 4, 2017 18:39 IST

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही

- किरण पवार

खरं तर आपल्या देशात विद्यार्थी आत्महत्या हा विषय फार महत्वाचा आहे. पण तो तितक्या गांभीर्याने आपण विचारातच घेत नाही. आणि घेतला तरी आपल्याला त्याच्या मुळाशी जाता येत नाही. या विषयावर चित्रपट तयार झाले पण त्यामध्ये मुळ कारणं बाजुलाच राहिली.विद्यार्थी का आत्महत्या करतात याची कारणं मी मांडू शकत नाही पण एक महत्वाचं कारण मला यामागे दिसतं. ते म्हणजे विद्यार्थ्यांची निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते. निर्णय घेता येत नाहीत किंवा घेतलेच जात नाही. त्यात मानसिक शिण बराच येतो. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण कराल तर अशी मुलं नेहमी दडपणात जगत असतात. सतत त्यांच्या मनात काही ना काही विचार सुरूच असतात. अशा मुलांना पालकांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेवू द्यायला हवेत. त्यांच्यावर आपला निर्णय लादण्याची घाई करू नये. किंवा त्यांना सतत दुसऱ्या मोठ्या, यशस्वी मुलांची उदाहरणं दिली जातात ती थांबवली पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की ते यशस्वी झालेले असतात कारण त्यांनी त्यांच्या करिअरचे निर्णय स्वत: घेतलेले असतात. पालक सतत तुलनाच करत राहिले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग ते डिप्रेशनच्या गर्तेत फेकले जातात.