शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिथे कमी, तिथे आम्ही

By admin | Updated: August 29, 2014 09:47 IST

शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा भागातील श्री विक्रांत गणेश मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ! केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या तत्त्वाने काम करीत आहेत.

श्री विक्रांत गणेश मंडळ
 
खास उपक्रम :
शहरातील नालेगाव, चौपाटी कारंजा भागातील श्री विक्रांत गणेश मंडळाचे नाव सर्वदूर पोहोचले आहे ते त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे ! केवळ दहा दिवसांचा उत्सव नव्हे, तर वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत विक्रांत गणेश मंडळाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या तत्त्वाने काम करीत आहेत. 
पर्यावरण, स्वच्छता, स्त्रीभ्रूणहत्त्या, पाणी वाचवा आदि प्रबोधनात्मक देखाव्यांवर मंडळाने भर दिला आहे. गेल्या वर्षभरात नेत्रदान, देहदान आणि रक्तदानाविषयी जागृती करण्याची मोहीम मंडळाने हाती घेतली. वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाने रक्तदान करावे, यासाठी रक्तदानाचा संदेश पाच हजार तरुणांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचविला. माहितीपत्रक, बॅनर, व्याख्यानं, पथनाट्यं, चित्रं यासारख्या विविध गोष्टींचा वापर करुन मंडळाचे कार्यकर्ते रक्तदान, नेत्रदानाविषयी जनजागृती करताना दिसतात. 
गणेशोत्सवानंतरच किल्लारी येथे झालेल्या भुकंपात उद्ध्वस्त झालेल्या धान्याची मदत करायला या मंडळाचे कार्यकर्ते पहिल्यांदा धावले होते.  तेव्हापासून मंडळाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यावरच भर देत आहेत. 
गेल्यावर्षी त्यांनी एक खास उपक्रम केला.  अनेकांच्या घरात डॉक्टरांनी दिलेली औषधे बरेचदा न घेता नुस्ती पडून राहतात. अशी घरोघर पडून राहिलेली औषधे गोळा करण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं.  जमलेल्या औषधांपैकी उपयुक्त असलेली, एक्सपायर न झालेली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजूंना देण्यात आली. 
याशिवाय गेल्या वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीत जेवढा कचरा रस्त्यावर साचला होता, तो उचलण्यासाठी महापालिकेच्या कामगारांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली.  प्रसादाचे द्रोण, पत्रावळी वेचण्याचे काम मंडळाने केले. मंडळाचे अध्यक्ष योगेश पाठक, ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत कलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ वर्षभर उपक्रमशील असते.यंदा हे मंडळ ३५व्या वर्षांत पदार्पण करीत आहे आणि कार्यकर्ते आपल्या परीनं सामाजिक उपक्रम राबवण्याचाही प्रयत्न करत मंडळाचं काम पुढे नेत आहेत.
- सुदाम देशमुख