शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

By admin | Updated: April 4, 2017 18:38 IST

वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी?

नाशिक, प्रतिनिधीवयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी? आणि मग अत्यंत निष्ठूर होत त्यांनी स्वत:लाच संपवावं? याला पळवाट म्हणायची का? असे किती प्रश्न २३ वर्षाच्या एक मुलाच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. आपण मरण्यापूर्वी इतरांना आत्महत्येचे धडे देण्याइतपत फेसबूक लाईव्ह करुन ते व्हिडीओ करुन ठेवण्यापर्यंत असं काय डाचत असेल त्याला?२३ वर्षाच्या अनुज भारद्वाज नावाच्या तरुण मुलानं फाईव्हस्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली आणि थेट १९व्या मजल्यावर जावून त्यानं आत्महत्याच केली. तो डिप्रेशनमध्येच होता असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यानिमित्तानं भारतातली आत्महत्यांची आकडेवारी जरी नुस्ती डोळ्याखालून घातली तरी वास्तवाचं भयाण चित्र दिसेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले १ लाख ३५ हजार भारतात राहतात. १९८७ ते २००७ या काळात भारतातल्या आत्महत्येचा दर वेगानं वाढला. विशेषत: दक्षिण आणि पुर्वोत्तर काळात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या या काळात अधिक होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१० साली भारतात १ लाख ३४ हजार ६०० लोकांनी आत्महत्या केल्या. २०११ मध्ये १,३५, ५८५, तर २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५ आणि २०१३ मध्ये म लाख ३४ हजार ७९९ जणांनी आत्महत्या केल्या?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के लोक हे शिक्षित होते त्यांनी उच्च माध्यमिक टप्प्यापर्यंत तरी सरासरी शिक्षण घेतलेलं होतं. पण मग त्यांनी का आत्महत्या केल्या?ं आत्महत्येची काही कारण ठळकपणे दिसतात. नकोसं आजारपण, हुंडा, त्यानं छळ, ड्रग्ज, परीक्षेत आलेलं अपयश, घरघुती कलह, प्रेमभंग किंवा प्रेमात फसवणूक, गरीबी, बेरोजगारी, जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू, सामाजिक अप्रतिष्ठा, दिवाळखोरी.साधारण या कारणांमुळे आत्महत्या होते असं पोलिसांचं रेर्कार्ड सांगतं.आता या साऱ्या कारणांतून वाट काढणं, त्यातून तोडगे शोधणं, मदत मागणं हे सारं अशक्य आहे का? जगात कितीतरी लोक या कारणांशी दोन हात करतच असतात..पण निराशेच्या टोकावर जावून अनेकजण स्वत:ला संपवतात कारण ते मदत मागत नाही..मदत शोधा.. मदत मागा..आणि जगा.. मनापासून!