शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

By admin | Updated: April 4, 2017 18:38 IST

वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी?

नाशिक, प्रतिनिधीवयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी? आणि मग अत्यंत निष्ठूर होत त्यांनी स्वत:लाच संपवावं? याला पळवाट म्हणायची का? असे किती प्रश्न २३ वर्षाच्या एक मुलाच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. आपण मरण्यापूर्वी इतरांना आत्महत्येचे धडे देण्याइतपत फेसबूक लाईव्ह करुन ते व्हिडीओ करुन ठेवण्यापर्यंत असं काय डाचत असेल त्याला?२३ वर्षाच्या अनुज भारद्वाज नावाच्या तरुण मुलानं फाईव्हस्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली आणि थेट १९व्या मजल्यावर जावून त्यानं आत्महत्याच केली. तो डिप्रेशनमध्येच होता असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यानिमित्तानं भारतातली आत्महत्यांची आकडेवारी जरी नुस्ती डोळ्याखालून घातली तरी वास्तवाचं भयाण चित्र दिसेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले १ लाख ३५ हजार भारतात राहतात. १९८७ ते २००७ या काळात भारतातल्या आत्महत्येचा दर वेगानं वाढला. विशेषत: दक्षिण आणि पुर्वोत्तर काळात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या या काळात अधिक होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१० साली भारतात १ लाख ३४ हजार ६०० लोकांनी आत्महत्या केल्या. २०११ मध्ये १,३५, ५८५, तर २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५ आणि २०१३ मध्ये म लाख ३४ हजार ७९९ जणांनी आत्महत्या केल्या?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के लोक हे शिक्षित होते त्यांनी उच्च माध्यमिक टप्प्यापर्यंत तरी सरासरी शिक्षण घेतलेलं होतं. पण मग त्यांनी का आत्महत्या केल्या?ं आत्महत्येची काही कारण ठळकपणे दिसतात. नकोसं आजारपण, हुंडा, त्यानं छळ, ड्रग्ज, परीक्षेत आलेलं अपयश, घरघुती कलह, प्रेमभंग किंवा प्रेमात फसवणूक, गरीबी, बेरोजगारी, जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू, सामाजिक अप्रतिष्ठा, दिवाळखोरी.साधारण या कारणांमुळे आत्महत्या होते असं पोलिसांचं रेर्कार्ड सांगतं.आता या साऱ्या कारणांतून वाट काढणं, त्यातून तोडगे शोधणं, मदत मागणं हे सारं अशक्य आहे का? जगात कितीतरी लोक या कारणांशी दोन हात करतच असतात..पण निराशेच्या टोकावर जावून अनेकजण स्वत:ला संपवतात कारण ते मदत मागत नाही..मदत शोधा.. मदत मागा..आणि जगा.. मनापासून!