शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

आत्महत्येच्या टोकावर नेणारं नैराश्य येतं कुठून?

By admin | Updated: April 4, 2017 18:38 IST

वयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी?

नाशिक, प्रतिनिधीवयाची पंचविशीही न गाठलेल्या तरुण मुलांना फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन नेमकं कुठं गाठतं की त्यांची जगण्याची इच्छाच मरुन जावी? आणि मग अत्यंत निष्ठूर होत त्यांनी स्वत:लाच संपवावं? याला पळवाट म्हणायची का? असे किती प्रश्न २३ वर्षाच्या एक मुलाच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा उपस्थित केले आहेत. आपण मरण्यापूर्वी इतरांना आत्महत्येचे धडे देण्याइतपत फेसबूक लाईव्ह करुन ते व्हिडीओ करुन ठेवण्यापर्यंत असं काय डाचत असेल त्याला?२३ वर्षाच्या अनुज भारद्वाज नावाच्या तरुण मुलानं फाईव्हस्टार हॉटेलमध्ये खोली बूक केली आणि थेट १९व्या मजल्यावर जावून त्यानं आत्महत्याच केली. तो डिप्रेशनमध्येच होता असं आता पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यानिमित्तानं भारतातली आत्महत्यांची आकडेवारी जरी नुस्ती डोळ्याखालून घातली तरी वास्तवाचं भयाण चित्र दिसेल. जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी ८ लाख लोक आत्महत्या करतात. त्यातले १ लाख ३५ हजार भारतात राहतात. १९८७ ते २००७ या काळात भारतातल्या आत्महत्येचा दर वेगानं वाढला. विशेषत: दक्षिण आणि पुर्वोत्तर काळात होणाऱ्या तरुणांच्या आत्महत्या या काळात अधिक होत्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०१० साली भारतात १ लाख ३४ हजार ६०० लोकांनी आत्महत्या केल्या. २०११ मध्ये १,३५, ५८५, तर २०१२ मध्ये १ लाख ३५ हजार ४४५ आणि २०१३ मध्ये म लाख ३४ हजार ७९९ जणांनी आत्महत्या केल्या?आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ८० टक्के लोक हे शिक्षित होते त्यांनी उच्च माध्यमिक टप्प्यापर्यंत तरी सरासरी शिक्षण घेतलेलं होतं. पण मग त्यांनी का आत्महत्या केल्या?ं आत्महत्येची काही कारण ठळकपणे दिसतात. नकोसं आजारपण, हुंडा, त्यानं छळ, ड्रग्ज, परीक्षेत आलेलं अपयश, घरघुती कलह, प्रेमभंग किंवा प्रेमात फसवणूक, गरीबी, बेरोजगारी, जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू, सामाजिक अप्रतिष्ठा, दिवाळखोरी.साधारण या कारणांमुळे आत्महत्या होते असं पोलिसांचं रेर्कार्ड सांगतं.आता या साऱ्या कारणांतून वाट काढणं, त्यातून तोडगे शोधणं, मदत मागणं हे सारं अशक्य आहे का? जगात कितीतरी लोक या कारणांशी दोन हात करतच असतात..पण निराशेच्या टोकावर जावून अनेकजण स्वत:ला संपवतात कारण ते मदत मागत नाही..मदत शोधा.. मदत मागा..आणि जगा.. मनापासून!