शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण , नोकरी , पैसा  हा  क्रम एक तरुण  तोडतो  तेव्हा ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:46 IST

घरची परिस्थिती जेमतेमच होती, त्यामुळे लहानपणापासून डोक्यात एकच होतं, शिकायचं, नोकरी करायची, पैसा कमवायचा. पण मग कळलं की, हेच म्हणजे जगणं नव्हे, आणि मग जगण्याच्या शोधात निघालो.

प्रवीण डोनगावे, निर्माण 7

माझा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एका छोटय़ा गावात झालं. नंतर पुण्यात आलो तिथं बारावीर्पयतचं शिक्षण हे एकदम साचेबद्ध पद्धतीने झालं. त्यात काहीही वेगळेपण नव्हतं. नियमित शाळा, अभ्यास, खेळ एवढा मोजकाच दिनक्र म असायचा. वडील आणि आई दोघेपण स्थानिक मार्केटमध्ये भाजी विक्र ी करून कुटुंबाचा सांभाळ करायचे. कधी घरभाडे वेळेत दिले नाही तर मालक वडिलांना बोलायचा, कधी योग्य पैसे भाजीतून मिळाले नाहीत तर वडील-आई नाराज दिसायचे. त्यामुळे जगण्यासाठी (आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी) पैसे खूप महत्त्वाचे असतात हे आधीपासून डोक्यात बसलं होतं. यामुळेच खूप अभ्यास करून चांगली नोकरी शोधणं आणि पैसे कमावणं हे खूप लहान वयात लक्षात आलं होतं. दहावी आणि बारावीला चांगली टक्केवारी मिळाल्यावर जेव्हा कुठे अॅडमिशन घ्यायचं यावर चर्चा सुरू झाली तेव्हा इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला एका शिकलेल्या नातेवाइकाने आई-वडिलांना दिला, जेणोकरून चांगली नोकरी मिळेल. भविष्य सुखात जाईल.

मी स्वत:देखील इंजिनिअरिंग निवडताना ‘नोकरी मिळवण्यासाठीच डिग्री’ यापलीकडे जाऊन कधी विचार केला नव्हता. दरम्यानच्या काळात अवांतर वाचन वाढलं होतं, वेगवेगळ्या गोष्टी बघायला - ऐकायला लागलो होतो. दोन वर्षे इंजिनिअरिंग झाल्यानंतर जे करतोय ते काही मनाला पटत नव्हतं. फक्त पैसा कमावणं आणि चैन करण्यात आयुष्य घालवणं हे विचार खटकू लागले होते. आपण स्वत:साठी न जगता समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं खूप वाटू लागलं; पण करायचं काय हे कळत नव्हतं.एका मित्रने एमपीएससीचा अभ्यास करून अधिकारी होऊन लोकांसाठी काम करू शकतो असे सुचवले. मला हा पर्याय खूप आवडला, वाटलं हे किती चांगलं आहे की आपण लोकांसाठी शासन जे धोरणं आखतं, योजना राबवतं त्या यंत्रणोचा भाग बनून समाजासाठी आपलं योगदान देऊ. स्पर्धा परीक्षेची जोरात तयारी लास्ट इअरला असताना सुरू केली. डिग्री झाली; पण नोकरी बघायचं नाही असं ठरवलं होतं, अभ्यास पूर्णवेळ सुरू होताच.एकदा सहज पेपर वाचत असताना ‘लोकमत ऑक्सिजन’मधील निर्माणबद्दलचे लेख वाचण्यात आले, त्यातील विचार वाचून असं वाटलं की आपल्यालापण असंच काहीतरी करायचं आहे. उत्सुकता वाढल्याने निर्माणबद्दल आणखी माहिती काढली, फॉर्म भरला आणि इंटरव्ह्यू देऊन निवडदेखील झाली. सगळचं माङयासाठी नवीन होत, पहिल्यांदा मी वेगळं काहीतरी करतोय हे जाणवत होतं. निर्माणचा फॉर्म भरल्यापासून ते गडचिरोलीला जाण्यार्पयत सगळचं माङयासाठी कन्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यासारखे होतं.निर्माण कॅम्पमध्ये मी आयुष्यात पहिल्यांदा स्वत:बद्दल खोलात जाऊन विचार केला - मी म्हणजे नक्की कोण आहे, स्वत:ला ओळखण्यापासून ते समाजासाठी व्यापक योगदान आपण कसे देऊ शकतो, याचा विचार करायला मी शिकलो. जगत असताना आपण आपली इच्छा आणि गरज काय यातील फरक करायलाच विसरून जातो, निर्माणमुळे मला तो विचार करता आला. प्रत्येक बाबतीत आपण फक्त कन्ङयुमर न बनता, प्रोडय़ूसर बनलो पाहिजे हे कळलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही गोष्ट करून बघितल्याशिवाय, त्यात उतरल्याशिवाय त्यातला आनंद कळत नाही हे कळलं. सामाजिक क्षेत्रत आपापल्या परीने योगदान देणा:या समविचारी मित्रंशी परिचय झाला, लोकांना भेटता आलं. नायनांचं (डॉ. अभय बंग) एक वाक्य मनाला खूप लागलं, की आपल्याला मिळणार आयुष्य एकच आहे आणि जगात पैसा भरपूर आहे, तर जे कमी आहे ते अमूल्य असते अर्थात आयुष्य! आपल्या जगण्याला हेतू देता येणं महत्त्वाचं.कॅम्प झाल्यानंतर तारु ण्याचा महत्त्वपूर्ण कालावधी फक्त अभ्यास करत घालवायचा की प्रत्यक्ष कामाला सुरु वात करायची यामधील निवड करणो सोपे झालं.प्रत्यक्ष कामात पडून, आपल्याला ते जमतंय का नाही हे बघण्याचं ठरवलं आणि पानी फाउण्डेशनला अर्ज केला. निवड होण्याआधी गावाकडचं जीवन समजून घेण्यासाठी व पाणलोटाचा अभ्यास समजण्यासाठी काकडदरा या छोटय़ाशा पूर्णपणो आदिवासी लोकसंख्या असणा:या गावात एक महिनाभर जाऊन राहिलो. तिथल्या लोकांची जीवनशैली समजून घेण्याचा प्रयत्न केला. विविध यंत्रणांचा परिचय झाला.वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेअंतर्गत तालुका समन्वयक म्हणून नेमणूक झाल्यानंतर आपल्याला हे जमेल की नाही हे प्रश्न मनात होतेच; परंतु गावपातळीवर आधीपासूनच काम करत असलेल्या मंदार देशपांडे, कुणाल परदेशी तसेच निखिल जोशी व प्रफुल्ल शशिकांत या निर्माणीमित्रंनी खूप गोष्टी शिकवल्या. तालुका समन्वयक म्हणून गावक:यांर्पयत जलसंधारणाचे महत्त्व ग्रामसभेच्या माध्यमातून पोहोचवणो, गावक:यांना पाणलोट क्षेत्र विकासाचं ट्रेनिंग देणं, जलसंधारणसोबतच मनसंधारणाची चळवळ गावोगावी रुजवणं, सरकारी योजना - जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजना यांचे लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय करत राहाणं, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, व्यक्ती यांच्याकडून गावांना मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहाणं अशा विविधांगी जबाबदा:या पार पाडल्या. ‘निसर्गाची धमाल शाळा’सारख्या उपक्रमातून शालेय विद्याथ्र्यामध्ये निसर्गाप्रति प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला.दुस:या वर्षी हेच काम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात केलं. हे सर्व करत असताना फील्डवर काम करण्याचा, लोकांशी बोलून त्यांना समजून घेण्याचा आणि प्रश्नांना वेगवेगळ्या दृष्टीने बघण्याचा उत्तम अनुभव आणि शिक्षण मिळालं. काम करण्यासाठी कुठलेतरी सरकारी अधिकारी पद असावेच लागतं या विचाराला फारकत मिळाली. ब:याच वेळा चुका झाल्या, गंडलो; पण त्यातूनही अनुभव मिळत गेले. एकटं एकटं राहायला आवडण्यापासून ते सगळ्या गावक:यांपुढे उभा राहून सहजपणो ग्रामसभा घेण्यार्पयतचा हा प्रवास भन्नाटच होता.सध्या मी पुण्यातील आय टीच स्कूल्स नावाच्या संस्थेत, जी समाजातील वंचित घटकांच्या मुलांना मोफत इंग्लिश माध्यमातून माध्यमिक शिक्षण देते तिथे कम्युनिटी रिलेशन असोसिएट या पदावर काम करत आहे. इथे आम्ही महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत काम करत आहोत. महानगरपालिका इयत्ता सातवीर्पयतच मोफत इंग्लिश माध्यमातून शिक्षण पुरवते. त्यापुढे मुलांना खासगी शाळेचा पर्याय असतो जे त्यांना न परवडणारे असते, कारण बहुतांश मुले ही आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकात मोडतात किंवा ते मराठी माध्यमाकडे वळतात; पण सातवीर्पयत इंग्रजी शिकून पुन्हा मराठी माध्यमात शिकणो त्यांना अवघड जाते आणि पर्यायाने ते शाळा सोडतात. ही गरज ओळखून आठवी ते दहावी मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आय टीच संस्था देते. कामाचं स्वरूप जरी बदललं असलं तरी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची, त्यांच्या गरजा आणि आपली क्षमता यांचा मेळ बसवण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ही प्रक्रिया आणि त्यातून मिळणारं समाधान मला मोलाचं आहे.

****

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.org या संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.