शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

स्कोपच नाही तर इंजिनिअर्स करतील काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 17:02 IST

स्पर्धा परीक्षाच द्यायच्या होत्या तर मग इंजिनिअर का झालात? या प्रश्नाचं उत्तर ग्रामीण-शहरी वादात नाही तर व्यवस्थेत आहे.

ठळक मुद्दे... तरच व्यावसायिक शिक्षण घेतलेले त्या क्षेत्नाकडे आकर्षित होतील . 

जयप्रकाश संचेती 

स्पर्धा परीक्षाच द्यायच्या होत्या तर मग इंजिनिअर का झालात? हा प्रवीण घोडेस्वार यांचा लेख (लोकमत ऑक्सिजन, 25 जून 2क्2क्) वाचला.अभियंते प्रशासकीय सेवेकडे का वळत आहेत याचं उत्तर प्रशासकीय सेवेच्या तुलनेत अभियांत्निकी सेवेची जी अवहेलना सरकारकडून होतेय त्यात आहे.पदवीधर अभियंत्यांची एमपीएससीद्वारे सहायक अभियंता (श्रेणी 2), सहायक अभियंता (श्रेणी 1) आणि सहायक कार्यकारी अभियंता अशी त्रिस्तरीय नेमणूक होते. सहायक अभियंता (श्रेणी 2)  या पदाचं वेतन नायब तहसीलदार समकक्ष आहे. शिवाय 25/30 र्वष पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.सहायक अभियंता (श्रेणी 1) या पदाचे वेतन उपजिल्हाधिकारी समकक्ष असते आणि एक पदोन्नती घेऊन ते कार्यकारी अभियंता पदावर निवृत्त होतात. या उलट सरळसेवा भरतीतील उपजिल्हाधिकारी 15 वर्षाच्या सेवेनंतर आयएएसमध्ये नॉमिनेट होतात.अशा परिस्थितीमध्ये चांगल्या उन्नतीसाठी (बेटर प्रॉस्पेक्ट)साठी अभियंत्यांनी  प्रशासकीय सेवेकडे का वळू नये? सहायक कार्यकारी अभियंतापदावर नियुक्ती  होते, यातील बहुतांश अभियंते एक पदोन्नती घेऊन अधीक्षक अभियंतापदावर रिटायर होतात.1973 मध्ये स्व. वसंतराव दादा मुख्यमंत्नी असताना जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील सचिवपदी अभियंता नियुक्त करण्यात आले; परंतु स्वत: अभियंता असलेल्या मुख्यमंत्र्यांनी 2क्12/13 मध्ये या विभागातील अभियंता सचिव हटवून आयएएस सचिव आणले. अधीक्षक अभियंता हे एकेकाळी आयुक्ताच्या समकक्ष पद होते आज ते कलेक्टरच्या जवळपास आणले आहे. अभियांत्निकीच नव्हे तर आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, प.दु.म, कृषी, विधि व न्याय, वनीकरण, शिक्षण, पोलीस, सहकार, ऊर्जा  ही तज्ज्ञ सेवा असलेले विभाग आहेत; परंतु या विभागातसुद्धा आयएएस सचिव आहेत. व्यावसायिक शिक्षण घेऊन त्या विभागातील सर्वोच्च पदांपासून वंचित राहावे लागत असेल, नेहमी प्रशासकीय सेवा ही ‘बेस्ट अमंग इक्वल्स’  हे सुनावले जात असेल, प्रशासकीय सेवेसारखी कालबद्ध पदोन्नती नसेल तर अभियंतेच नव्हे तर इतर व्यावसायिक शिक्षण घेणारे चांगल्या उन्नती  (बेटर प्रॉस्पेक्ट)साठी प्रशासकीय सेवेकडे वळले तर त्यामध्ये त्यांचा काय दोष? आयआयटी किंवा अशाच प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेतलेले अभियंते मोठय़ा प्रमाणावर प्रशासकीय सेवेकडे, संशोधनासाठी परदेशाकडे वळत आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामध्ये देशाचे नुकसान आहे हेही खरंच.हे नको असेल तर व्यावसायिक  खाते   /संशोधन संस्था / महामंडळाचे  सचिव/ अध्यक्ष / व्यवस्थापकीय संचालक  त्याच  विषयातील  तज्ज्ञ  असावेत. विद्यापीठाचे कुलगुरु नियुक्तीप्रमाणो त्यांची नियुक्ती करण्यात  यावी. व्यावसायिक सेवेचा दर्जा, वेतन, सन्मान यामध्ये आकर्षक सुधारणा करणारे निर्णय शासनाने घेतले तरच व्यावसायिक शिक्षण घेतलेले त्या क्षेत्नाकडे आकर्षित होतील . 

ग्रामीण विरुद्ध शहरी आणि इतर वाद निर्माण करणं अयोग्यच कारण अभियांत्निकी आणि इतर सर्व व्यावसायिक शिक्षणांमध्ये आरक्षणाची सोय आहे. विशेष म्हणजे माङया पिढीतील बहुतांश अभियंते /डॉक्टर्स आणि उच्चशिक्षित हे दुष्काळी भागातून आलेले आहेत आणि त्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश आहे. 

कार्यकारी अभियंता ( नि) जलसंपदा, अहमदनगर