शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

वजन किती हवे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 08:33 IST

आपल्याला वाटते, वाढत्या वयानुसार आपले वजन योग्य आहे, पण खरे तर विसाव्या वर्षीचे वजन हेच आपले योग्य वजन!

-डॉ. यशपाल गोगटे

लहानपणापासून शरीराचा विकास व वाढ होत असतांना उंची व वजन वाढणे हा नैसर्गिक नियम आहे, पण एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ज्यावेळेस वजन वाढते त्यावेळेस ते नुकसानकारक ठरत असते. यावरून जाडी किंवा लठ्ठपणा ठरत असतो. पण आपण जाड आहोत का नाही हे कसे ओळखावे? व्यक्ती तितक्या प्रकृती प्रमाणेच प्रत्येकाची अंगकाठी व वजन वेगवेगळे असते. त्यामुळे लठ्ठपणा ठरवतांना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी ‘बीएमआय’ हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्मुला उपयोगात आला.

बीएमआय = वजन / उंचीचा वर्गउदाहरणार्थ.. ५ फूट ७ इंच (१.७ मीटर) उंचीच्या व ७५ किलो वजनाच्या माणसाचा बीएमआय= ७५/ (१.७)२ = २५.९आशिया खंडातील विशेषत: भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हंटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते ज्याला एॅडीपो- सायटोकाईन्स असे म्हणतात. हे एॅडीपो- सायटोकाईन्स स्थूलतेमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक आजारांना आमंत्रण देतात. याउलट युरोपीय वंशातील लोकांमध्ये खांदा व मानेच्या अवतीभवती विसावलेली चरबी ही शांत व निष्क्रिय असल्यामुळे एकूणच कमी धोकादायक असते.

बीएमआयच्या व्यतिरिक्त पोटाचा घेरसुद्धा लठ्ठपणाचा एक चांगला मापदंड म्हंटला जातो. स्त्रियांमध्ये हा ३१ इंच (८० सेमी) वा त्यापेक्षा अधिक तर पुरुषांमध्ये ३५ इंच (९० सेमी) च्या वर असल्यास स्थूलतेत मोडतो.वजनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम दोन प्रकारात मोडतात- एक चयापचयाशी संबंधित आजार जसे डायबेटीस, कोलेस्टेरॉल, उच्च- रक्तदाब इ. व दुसºया प्रकारातील आजार स्थूलतेमुळे हाडं व स्नायूंचे आजार- पाठदुखीपासून गुडघे दुखीपर्यंत. या दोन्ही धोक्यांमध्ये तुलना केल्यास चयापचयाशी संबंधित आजार हे थोडेही वजन वाढले तरी आपले डोके वर काढतात, तर हाडांच्या व स्नायूंचे आजार वजनातील लक्षणीय वाढीनंतरच होतात. आपल्या शरीराचे वजन वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे येऊ शकते. त्यामध्ये अक्षरश: किलो-दीड किलोचाही फरक पडू शकतो. त्यामुळे शक्यतो वजन मॉनिटर करतांना एकाच वेळी ऐकाच काट्यावर वजन करावे.

१८ ते २० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते (जर ते ‘अति’ प्रमाणात नसेल तर) ते आपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यत: एक समज आहे कि वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीराला सहजपणे पेलवता येते, पण या वाढणाºया वजनालाही ५ किलोपर्यंतची मर्यादा असते. म्हणजेच तुमच्या अठरा ते विसाव्या वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलोपेक्षा अधिक असेल आणि जरी ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते.उदाहरणादाखल एखाद्या अतिशय काटक स्त्रीचे अठरा ते विसाव्या वर्षीचे वजन ४५ किलो आहे व दहा वर्षानंतर ते ६० झाले, तर ती लठ्ठपणातच मोडते. तिच्या उंचीनुसार योग्य वाटणारे हे वजन तिच्याकरता धोकादायक असू शकते. त्यामुळे बारीक माणसाने आयुष्यभर बारीकच राहावे व जाड माणसाने आयुष्यभर बारीक होण्याचा प्रयत्न करावा.माणसाच्या वजनवाढीचीही काही कारणे आहेत. ते पाहूया पुढील लेखात..

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)