शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

शिकायचं काय?, कुठे?

By admin | Updated: May 21, 2015 20:10 IST

ग्रामीण भागात उद्योग करायचाय ना, त्याच्यासाठी कशाला हवं प्रशिक्षण, असं काही तुमच्या डोक्यात चुकूनही आलं असेल, तर ते पटकन काढून टाका!

ग्रामीण भागात उद्योग करायचाय ना, त्याच्यासाठी कशाला हवं प्रशिक्षण, असं काही तुमच्या डोक्यात चुकूनही आलं असेल, तर ते पटकन काढून टाका!
कारण ग्रामीण उद्योजकतेला वाव देताना ती पूर्णत: प्रोफेशनल असावी, त्या उद्योगांना बाजारपेठ मिळावी आणि शहरी उद्योगांइतके ग्रामीण उद्योगही भरभराटीस यावे, अशी ही नवीन कल्पना आहे!
सोपं करून सांगायचं तर, ग्रामीण उद्योजकता हे नवं अत्यंत स्मार्ट आणि तितकंच पोटेन्शियल असलेलं एक भराभराटीस येणारं क्षेत्र आहे. असं क्षेत्र ज्या क्षेत्रत संधी अपार असतील पण त्यासाठी लागेल प्रशिक्षण. कच्च माल-प्रक्रिया-उत्पादन ते बाजारपेठ हा प्रवास शिकवून पूर्णत: प्रशिक्षित मनुष्यबळानंच ग्रामीण उद्योग करावेत, असा हा नवीन विचार आहे.
जसे लोक एमबीए करतात आणि बिझनेस मॅनेजमेण्टचं प्रशिक्षण घेतात, एका कार्पोरेट जगात शिरकाव करण्यासाठी एमबीए नावाचा एण्ट्री पास घेतात तसंच हे नवीन क्षेत्र आहे.
नुस्त्या व्यवहार ज्ञानावर न जाता, ग्रामीण भागात उद्योग कसा करायचा, त्यासाठी काय आवश्यक आहे याचं प्रशिक्षण आता देशभरातील अनेक संस्था देत आहेत. नवनवीन संस्थात हे कोर्सेस सुरू होत आहेत.
आज देशातील काही नामांकित संस्था ग्रामीण उद्योजकता आणि ग्रामीण विकास यांचे र्कोसेस चालवत आहेत.
अर्थात तिथं प्रवेश मिळणं सोपं नाही, त्यांची स्वत:ची प्रवेश परीक्षा असते, ती उत्तीर्ण झाली तरच पुढे प्रवेश मिळतो!
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातलीच नाही तर शहरी, सामाजिक जाणीव असलेली आणि ग्रामीण भारतात संधींची कवाडं शोधणारी काही मुलंही आता या कोर्सेसकडे वळू लागली आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, इंजिनिअर, बीटेक झालेली, विविध विषयांतल्या मास्टर्स डिग्य्रा असलेली मुलं या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत.
त्यामुळे आपल्याला काहीच जमलं नाही, म्हणजे हे तरी जमेल, असा विचार असेल तर या वाटेनं न गेलेलंच बरं!
मात्र ज्यांना खरंच एक नवीन वाट हवी आहे, त्यांच्यासाठी ग्रामीण उद्योजकता शिकवणा:या काही प्रमुख संस्थांची ही एक ओळख.
 
 
टाटा समाज विज्ञान संस्था
(http://campus.tiss.edu/)
 
 
टाटा समाज विज्ञान संस्थेच्या शाखा मुंबईसह हैद्राबाद, गुवाहाटी येथेही आहेत. या संस्थेत एमएची पदवी देणारा रुरल डेव्हलपमेण्ट अॅण्ड गव्हर्नन्स हा कोर्स चालवला जातो. 
कुठल्याही शाखेचा पदवीधर या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. हा फुल टाइम कोर्स आहे. शेवटच्या वर्षाला असलेले आणि बीएची परीक्षा दिलेलीही प्रवेशासाठी अर्ज करू शकतात;
मात्र त्यासाठी प्रवेश परीक्षा देणं आवश्यक असतं.
ग्रमीण भागाची योग्य माहिती, त्याविषयीची समज आणि विकासासाठी आवश्यक सरकारी मदतीसह काम करता यावं म्हणून या अभ्यासक्रमात अनेक गोष्टी शिकवल्या जातात. 
मे महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात त्यासाठी प्रवेश परीक्षा असते.
 
इडीआय
(http://www.ediindia.org)
 
 इडीआय म्हणजेच  Entrepreneurship Development Institute of India. उद्योजकता शिकवणारी ही देशातली अत्यंत अग्रगण्य संस्था आहे. अहमदाबाद स्थित या संस्थेत सामाजिक क्षेत्रत काम करण्यासाठी अनेक कोर्सेस शिकवले जातात. देशभरात प्रशिक्षित उद्योजक तयार व्हावेत, म्हणून ही संस्था अत्यंत प्रोफेशनल कोर्सेस शिकवते. 
या संस्थेत प्रवेश मिळणं हेच एक मोठं मानाचं यश! 
ग्रामीण उद्योजकतेसाठी तिथं एक स्पेशल कोर्स चालवला जातो. त्याचं नाव आहे रुरल आंत्रप्य्रुनरशिप डेव्हलपमेण्ट प्रोग्रॅम्स. ग्रामीण भागात कसे उद्योग उभारावेत याचं प्रशिक्षण तर इथं मिळतंच, पण उद्योग सुरू करायला बीजभांडवलही बिनाभांडवल दिलं जातं! तसंच संस्थेत शिकलेल्या तरुणांना विविध स्वयंसेवी संस्थात कामाचा अनुभवही दिला जातो.
कुठल्याही विषयाची पदवी ही इथं प्रवेशाची अट. 
प्रवेश परीक्षा अत्यंत कठोर असते. आणि निवडप्रक्रियाही जटील. देशभरातून मुलं इथं शिकायला येतात.
 
किट स्कूल ऑफ रुरल मॅनेजमेण्ट 
(http://www.ksrm.ac.in) 
 
ही संस्था भुवनेश्वरला आहे, ओडिशामध्ये!
या संस्थेत ग्रामीण भागासाठी आवश्यक विविध प्रोफेशनल कोर्सेस शिकवले जातात.
एमबीए इन रुरल मॅनेजमेण्टही करता येतं. ग्रामीण उद्योजकता शिकवणाराही कोर्स इथे करता येऊ शकतो.
ज्यांना ग्रामीण उद्योजकता या विषयाची आवड आहे, त्यांनी या संस्थेच्या वेबसाइटवरची माहिती जरूर पहावी. 
पदवी हिच इथल्याही प्रवेशाची पूर्वअट आहे.
एमबीएसाठीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
 
 
इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल मॅनेजमेण्ट
http;//www.irma.ac.in
 
गुजरातमधल्या आणंदमध्ये ही संस्था आहे. प्रमाणपत्र, पदवी ैआणि पदव्युत्तर अभ्यासक्रम या संस्थेत शिकवले जातात. सूत्र एकच ग्रामीण व्यवस्थापन. याच अंतर्गत ग्रामीण उद्योजकतेचेही धडे दिले जातात.
ग्रामीण व्यवस्थापन आणि उद्योजकता याचं उत्तम प्रशिक्षण या संस्थेत दिलं जातं.