आहाराबद्दल फार जागरूकता नव्हती; पण सर्वच जण आपल्या स्वतर्च्या खाद्यपरंपरेला अनुसरून आहार घेत होते, त्या पिढीच्या आहेत डॉ.मालती कारवारकर. तो काळ ‘सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टस’चा नव्हता. भारतात आर्थिक बदल होत होते, एकत्न कुटुंबपद्धती कमी होत होती, महिला कामासाठी बाहेर पडू लागल्या होत्या. तंत्नज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यावर अधिराज्य करायला सुरुवात झाली होती. टीव्ही घराघरांत पोहचत होता. या सर्वामुळे अर्थातच आपल्या खाद्य संस्कृतीवरही त्याचा परिणाम होत होता. तेव्हा आपल्या गरजा ओळखून माणसानं काय खावं, कसं खावं याबद्दल अभ्यासू लेखन करणार्या आहारतज्ज्ञ म्हणजे डॉ. मालती कारवारकर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वच पुस्तकं ‘बायकांनी हे करावं’ असं अजिबात सांगत नाही, ते सर्वासाठी आहे. वेगवेगळ्या प्रकारची कामं करणार्या लोकांना कोणत्या प्रकारच्या आहाराची कशी गरज आहे याबद्दल त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यांचं सर्वात नवीन पुस्तक म्हणजे ‘अन्नजिज्ञासा’. या पुस्तकामध्ये मालती कारवारकर यांनी फूड सायन्स, म्हणजे स्वयंपाक क्षेत्नातलं शास्त्न याबद्दल लिहिलं आहे. या पुस्तकात, त्यांनी आपल्या बदलत्या गरजांनुसार आहाराचा कसा विचार करायला हवा याबद्दल लिहिले आहे.यामध्ये नास्ता करण्याचं महत्त्व, जेवणाचा डबा कसा असावा, संध्याकाळी करायच्या साध्या सोप्या गोष्टी, या सगळ्यामध्ये पोषकतत्त्वांचा विचार सांगितला आहे. पुस्तकात त्यांनी कोणत्याही प्रकारच्या ‘डायटिंग’ला कडाडून विरोध केला आहे. डाएटपेक्षा न्यूट्रिशनचा विचार व्हावा, असंही म्हंटलं आहे. ज्यांना खायला लागतं अशा सर्वासाठी हे पुस्तक वाचणं मस्ट आहे !याबरोबरच Food In नावाची डॉक्युमेंटरीदेखील नक्कीच बघा. यामध्ये आपलं अन्न, ऑटोमेशन आणि त्यानं आपल्या शरीरावर आणि इतरही सृष्टीवर होणारे परिणाम यावर भाष्य केलं आहे. रॉबर्ट केनर या डॉक्युमेंटरी फिल्ममेकरच्या या कामाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ही डॉक्युमेंटरी यू टय़ूबवर बघता येईल.
आपण काय खातो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे माहितीये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 03:00 IST
जग बदललं तसा आपला आहारही; पण त्या आहाराचा आपल्यावर काय परिणाम होतो?
आपण काय खातो, त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे माहितीये?
ठळक मुद्देआपल्या बदलत्या गरजांनुसार आहाराचा कसा विचार करायला हवा