शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

न वापरातल्या वस्तूचं तुम्ही काय करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:52 IST

गरजेपोटी आपण काही वस्तू घेतो. सायकल किंवा पुस्तकं. ते वापरून झाल्यावर आपण काय करतो? त्या पडून राहतात. त्यापेक्षा त्या वस्तू कुणाला वापरायला दिल्या आणि त्यांनी त्या पुन्हा गरजूंना देऊन टाकल्या तर एक मदतीचं चक्र सुरू होऊ शकेल!

ठळक मुद्देअनेकदा वस्तू आपल्याजवळ धूळ खात पडून असतात. असा वस्तूंचा वापर प्रवास सुरू करता येईल का?

- मुकेश जाधव

मोटारसायकल रस्त्यावरून धावण्यापूर्वी ‘सायकल’ला चारचाकीचा सन्मान होता. ज्यांच्याकडे सायकल असायची त्यांची गणना मध्यमवर्गीय/श्रीमंत गटात व्हायची. म्हणजेच ‘अंगणात सायकल’ हापण परिस्थिती बरी असल्याचा निकष असायचा. आज लोक टू व्हीलर, फोर व्हीलरची जी काळजी घेतात तीच काळजी त्यावेळेस सायकलची घ्यायचे. घरातून बाहेर पडताना सायकल पुसून चकाचक व्हायची. सायकलच्या टायरमधील हवा तसेच सायकलचे ब्रेक तपासले जायचे. आठवडय़ातून एकदा तरी ऑयलिंग आणि सायकलवर पाणी पडायचं. काही छंदींच्या सायकलला तर आरसा अन् रेडियमच्या प्लेट्सची सजावटपण असायची. सायंकाळी रस्त्यावरून अनेक सायकली धावताना दिसायच्या. सायकलीचा एक वेगळाच मिजास होता. पुण्याची तर ‘सायकली’चे शहर अशीही एक ओळख होती. त्याच पुण्यातील एका सायकलीच्या प्रवासाची ही गोष्ट..पुणे विद्यापीठ म्हणजे हुशार, गरीब, होतकरू विद्याथ्र्याचा गोतावळा. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून हे विद्यार्थी कुणाच्या तरी मदतीने आणि  कुणाकडून तरी ऐकिव माहिती घेत शिक्षणाची भूक भागविण्यासाठी, ध्येयप्राप्तीचं स्वप्न घेऊन विद्यापीठात ढेरेदाखल होतात. अशा विद्याथ्र्याना आजही ‘सायकल’ हे वेळ व पैशाची बचत करणारं आनंदाचं एक साधन वाटतं म्हणून अनेक विद्यार्थी विद्यापीठात व कामानिमित्त पुणे शहरात सायकलवरून फिरताना दिसतात.दीपक जाधव हा मूळचा सोलापूरचा. सोलापूरच्या ‘वालचंद कॉलेज’चा विद्यार्थी. घरची परिस्थिती बेताचीच म्हणजे गरिबीची व्याख्या शिकण्याची कधी त्याला गरज पडली नाही,आतार्पयत तो ती अनुभवत आला होता. बी.ए.ला असतानाच प्रा. नीलासरांनी पुणे विद्यापीठाबद्दल बरंच काही सांगितलं होतं. म्हणूनच एम.ए. करायचं ते पुणे विद्यापीठातूनच हे त्याचं त्यानंच ठरवलं. त्यानुसार पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्र विभागात एम.ए.ला त्यानं प्रवेशही घेतला.राज्यशास्त्र विभाग विद्यापीठातील एक नावाजलेला विभाग. विद्वान प्राध्यापक आणि चळवळा विद्यार्थी यामुळे राज्यशास्र  विभागाचं एक वेगळंच वलय विद्यापीठात आहे. सुरुवातीला सारं काही नवीन वाटतं; परंतु लवकरच कमवा-शिका, विभाग, लेक्चर, जयकर लायब्ररी, तात्त्विक चर्चा, अनिकेत, ओपन, आदर्श कॅन्टीन, ऐलीस गार्डन हे पुणे विद्यापीठातील विद्याथ्र्याच अंगात भिनत जातं.विद्यापीठात त्यावेळी वेगवेगळ्या कारणांसाठी विद्यार्थी आंदोलन करत, उपोषणाला बसत. कधी एम.फील - पीएच.डी.च्या विद्यावेतनाबाबत, कधी होस्टेलबाबत, कधी रिफेटरी, कॅन्टीनच्या भाववाढीबाबत तर कधी नेट-सेटच्या प्रश्नाबाबत काहीना काही सुरूच. त्याच्या सोबतीला सिनेटमधील चर्चा, विभागातील विविध विषयांवरील चर्चासत्रं, विद्यापीठात साजर्‍या होणार्‍या जयंती आणि पुण्यतिथी या सर्व घटनांना पत्रकारांच्या माध्यमातून वर्तमानपत्रात, माध्यमात प्रसिद्धी मिळायची. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया, माध्यम, पत्रकारिता, पत्रकार हे शब्द खूप वजनदार वाटायला लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे मीडिया हे एक बदलाचं ‘वलयांकित’ माध्यम आहे याची प्रथमच प्रकर्षाने जाणीव झाली, त्या जणिवेतून दीपकसारखे अनेक मित्र पत्रकारितेकडे वळले.पुणे विद्यापीठाच जर्नालिझम डिपार्टमेंट थेट विद्यापीठाच्या बाहेर एफ.सी.रोडवर, रानडे इन्स्टिटय़ूट. साहजिकच पीएमटीने पुणे विद्यापीठ ते म्हसोबा गेट जायचं आणि  म्हसोबा गेटपासून पायी ‘रूपाली’, ‘वैशाली’ करत करत रानडेला पोहचायचं. पण  पैशांची, म्हणूनच दीपक व त्याच्या मित्रांनी सायकलची व्यवस्था केली. पुणे विद्यापीठ ते रानडे हा नित्य नवीन अनुभव देणारा रोजचाच प्रवास त्यातून सुरू झाला. या मित्रांना जाताना फारसं काही वाटायचं नाही कारण जाताना उताराचा मार्ग; परंतु येताना मात्र त्यांची चांगलीच दमछाक व्हायची. त्यामुळे ते कधी कधी ज्ञानेश्वर पादुका चौकातून वरच्या मार्गाने सेनापती बापट रस्त्याला किंवा सिम्बॉयसिस, गव्हर्नमेंट पोलिटेक्निककडून विद्यापीठ गाठायचे. या प्रवासातून अन् त्यांनी घेतलेल्या कष्टातून त्यांच्या पदरात पत्रकारितेची पदविका पडली. त्या आधारावर ते ‘पत्रकार’ म्हणून कार्यरत झाले.दीपकनं ठरवलं आपली सायकल आपल्यासारख्याच गरीब व होतकरू विद्याथ्र्याला  वापरायला द्यायची; पण ती एका अटीवर, ती म्हणजे त्या विद्याथ्र्यानंसुद्धा सायकलचा वापर झाल्यानंतर दुसर्‍या विद्याथ्र्याला ती वापरायला द्यायची. अशा प्रकारे दीपकच्या सायकलचा प्रवास एका हातून दुसर्‍या हाती सुरू झाला. परंतु दुर्दैवाने जो मित्र ही सायकल वापरत होता त्यानं ‘पत्रकार भवना’जवळ ही  सायकल ठेवली असताना तेथून ती चोरीला गेली. परंतु ही झाली अपवादात्मक गोष्ट. आपल्याजवळसुद्धा  पुस्तकं, रजिस्टर, इलेक्ट्रॉनिक साधनं, कपडे, पादत्राणं, फर्निचर, टेबल लॅम्प, सायकल, बॅग यासारख्या अनेक वस्तू असतात की ज्या आपली गरज संपल्यावर दुसर्‍याच्या उपयोगी येणार्‍या असतात. परंतु अनेकदा या वस्तू आपल्याजवळ धूळ खात पडून असतात. असा वस्तूंचा वापर प्रवास सुरू करता येईल का? ही वापराची सायकल अनेकाना मदतीचा हात बनू शकेल, काय वाटतं?

 

(नबीरा महाविद्यालय, काटोल, जिल्हा नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)