शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

यंदाच्या आयपीएल 2020कडून तुम्ही काय शिकलात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 08:00 IST

आयपीएल मुंबई इंडियन्सने जिंकली; पण त्या जिंकण्या-हरण्यापलीकडे यावर्षी जे स्पष्ट दिसलं, ते नक्की काय होतं?

- अभिजित पानसे

एप्रिल-मेच्या सुमारास रोहित शर्माची एक जाहिरात टीव्हीवर सतत झळकली होती. त्यात गमतीने म्हटलं होतं की मुंबई इंडियन्स फक्त विषम क्रमांक वर्षातच जिंकते त्यामुळे २०२० वर्षांत मुंबई इंडियन्स जिंकणार नाही. पण मग रोहित शर्मा म्हणायचा की हे आयपीएलचं १३ वे वर्ष म्हणजे विषम संख्या, मग तर आयपीएल मुंबई इंडियन्सच जिंकणार. उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नई विरुद्ध सपशेल हरल्यावर मुंबई इंडियन्सवर शेरेबाजी झाली; पण पुढे मुंबई इंडियन्स संघाने आपला खेळ उंचावला. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात रोहित शर्मा जखमी झाला. त्याच्या अनुपस्थितीमध्ये पोलार्डने कप्तानी केली; पण शेवटी रुबाबात अंतिम सामन्यात धडक देऊन अनुभवी मुंबई इंडियन्सने तोऱ्यात आयपीएल चषक जिंकला. पहिला सामना हरून शेवटचा निर्णायक सामना जिंकलाच; पण या दूरदेशी झालेल्या आयपीएलने काय काय आपल्या समोर ठेवलं?

१. तुम्ही धोनी असलात तरी लोक तुमच्या वर्तमान खेळावर टीका करतातच. कालचा परफॉर्मन्स आजचं भांडवल होत नाही. या स्पर्धेत धोनी कधीच ‘इन’ वाटला नाही. खेळाडूचा खेळ कमी-जास्त होऊ शकतो; पण त्याची देहबोली महत्त्वाची असते. महेंद्रसिंह धोनीची देहबोलीच यावेळी उत्साहित करणारी नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरील भाव व देहबोली ही कॅप्टनची नसून ‘प्रशिक्षकाची’ वाटत होती. त्यामुळे पिवळ्या जर्सीतील धोनीचा मिडास गोल्डन टच गेला असं वाटलंच. मात्र तो धोनी आहे, तो हेच शिकवतो की, बॅड पॅच येतोच. अपयश येतंच, पण म्हणून आपण हार मानायची नसते. शेवटचे सलग तीन सामने चेन्नई संघ जिंकला तेव्हा त्याला मुलाखतीत विचारण्यात आलंच की, पिवळ्या जर्सीतील तुझा हा शेवटचा सामना आहे का? तो स्पष्टपणे म्हणाला, ‘डेफिनेटली नॉट’. जिंकण्याची ही जिद्द म्हणजे धोनी हे कुणी विसरू नये.

२. श्रेयस अय्यर. हा तरुण मुलगा खणखणीत नाणं वाजवून येईल असं वाटलं तरी होतं का? तेही एक कर्णधार म्हणून. दिल्लीच्या संघात विदेशी जायंट्स व देशी समवयस्क मोठे खेळाडू असताना त्यांना नीट सांभाळत स्वतःच्या बॅटिंगनेही विलक्षण कामगिरी करण्याचं मोठं काम श्रेयस अय्यरने केलं आहे. आयपीएलच्या तेरा वर्षांत दिल्ली कॅपिटल्सने आजवर प्ले ऑफचा उंबरठा ओलांडून फायनलमध्ये प्रवेश केला नव्हता. तो यावर्षी श्रेयस अय्यरच्या कप्तानीमध्ये करून दाखवला. अंतिम सामन्यात श्रेयस अय्यरची खेळीही लक्षात राहील. श्रेयस अय्यरला भारताचा भावी कर्णधार म्हणून बघितलं जातंय ते उगीच नव्हे.

३. २०१९ मध्ये करण जोहरसोबत कॉफी पिताना भावनेच्या भरात बरंच काही ओघात बोलल्यावर के. एल. राहुलवर सडकून चौफेर टीका झाली; पण त्यानंतर राहुलने जणू कात टाकली. तो परिपक्व बॅट्समन खेळाडू झाला. या आयपीएलमध्ये के.एल. राहुल लीग टप्प्यातीलच १४ सामने खेळून सर्वाधिक रन करणारा बॅट्समन ठरला. याशिवाय त्याने विकेट किपिंग करताना किंग्स इलेव्हन पंजाब संघाची धुरा सांभाळली. या आयपीएलमधून के. एल. राहुल आता एक संपूर्णपणे भरीव खेळाडू म्हणून समोर आला हे सत्य. स्वत:वर कठोर मेहनत करणं आणि झाल्या चुका मागे टाकणं हाच राहुलचा धडा.

४. यावर्षीच्या आयपीएलने टी. नटराजन या लो प्रोफाइल बॉलरचे हाय क्वाॅलिटी यॉर्कर्स जगाने बघितले. भारतीय गोलंदाजाच्या ताफ्यात सर्व अस्त्र असतात; पण अचूक यॉर्कर्सचा मात्र कायमच तुटवडा असतो हा आजवरील इतिहास आहे. टी. नटराजन मात्र ती उणीव भरून काढू शकतो. संपूर्ण आयपीएलमध्ये त्याने अचूक यॉर्कर बॉल टाकलेत. प्ले ऑफमध्ये रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध खेळताना नटराजनने ए.बी. डिव्हिलयर्सचा यॉर्करने मिडल स्टंप उडवल्याचं नयनरम्य दृश्य हे या आयपीएलचं सिग्नेचर क्षणांपैकी एक आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे नटराजनचा समावेश ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ट्वेन्टी-ट्वेन्टी मालिकेसाठी आता झाला आहे. तिथे तो आपल्या यॉर्कर्सने कांगारूंची भंबेरी उडवेल अशी आशा आहे. संधीचं सोनं करणं काय असतं ते या मुलानं दाखवून दिलं.

५. तुम्ही विराट कोहली असलात तरी सदैव जिंकता येत नाहीच. आता तर कोहलीवर अपयशाचं आणि टीकेचं प्रेशर आहेच. मुख्य म्हणजे आपण प्रेशर असताना कसं वागतो यावर अनेक गोष्टी ठरतात. कोहली चुकलाच या काळात. सूर्यकुमार यादवसोबत विराट कोहलीच्या अपरिपक्व वागण्यानं त्यावर टीका झालीच. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माला कसोटी संघात संधी मिळाली आहे. विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर भारतात परतणार आहे. सोपं नाही कोहली असूनही आपलं स्थान टिकवून ठेवणं.

( अभिजित ब्लॉगर आहे.)