शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

हम है, के हम नहीं है...?

By admin | Updated: August 18, 2016 16:00 IST

काश्मीरच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणांच्या हाती लॅपटॉप ऐवजी दगड कोणी दिले?

- अमृता कदमबुरहान वानी या दहशतवाद्याच्या हत्त्येनंतर उफाळलेली काश्मीरमधली धगधग अजून विझत नाही.हातात दगड घेऊन रस्त्यांवर उतरलेली तरुण पोरं अजून रस्त्यावरून हटत नाहीत. लष्करी दलांच्या बंदुकांमधून उडणारे छर्रे घुसून डोळे फोडून घेणारा काश्मिरी तारुण्याचा अंगार अजून शांत होत नाही.कोण ही पोरं? हातात दगड घेऊन सारखी रस्त्यावर उतरणारी? त्यांच्या आयुष्यातून दुसरे मार्ग, दुसरे पर्याय पुसून कसे गेले?  कुणी पुसले?पंतप्रधान म्हणाले, ‘‘ज्यांच्या हातात लॅपटॉप असले पाहिजेत, क्रिकेटच्या बॅट्स आणि बॉल असले पाहिजेत, नजरेत भविष्याची स्वप्नं असली पाहिजेत त्या तरुणांच्या हाती दगड यावेत; हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं!’’- व्यवस्थेलाही इतकं हतबल वाटावं,असं काय बिघडलं आहे या नंदनवनात?हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरलेली ही दिशाहीन तरु णाई पाहताना तुम्हाला आठवेल ‘हैदर’ नावाचा सिनेमा... आणि त्यातला हैदर.काश्मीरच्या चौकात उभं राहून प्रश्न विचारणारा हैदर...‘हम है के हम नहीं है?हम है तो हम कहाँ है? हम नहीं है तो कहाँ गये?और किसलिए गये? हम थे भी, या हम थे ही नही?’