शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आता आम्ही कायतरी करणारच असं म्हणता? मग म्हटलं ह्ये सांगून जावं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:48 IST

सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो-तो खायच्या मागे असतो, असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं!

- मिलिंद थत्ते

 जिंदगी वसूल सदर लिहिता लिहिता अनेक ई-मेल्स आल्या. वाचून उत्साह आला. आता आम्ही कायतरी करणारच - असं काहीजण म्हणाले, तर काहींनी लिहिले - आम्ही सुरुवात केलीय, पण कधीमधी अडखळतोय. माहिती अधिकाराबाबत प्रश्न आले, ग्रामपंचायतीबाबतच्या तक्रारी आल्या - असे विषय चर्चेत आले. एक अधूनमधून डोकावणारा प्रश्न होता - हे सगळं कुटं शिकाया भेटतं? आज या सदराचा शेवट करताना म्हटलं ह्ये सांगून जावं.. हे सगळं शिकवणारा एकच शिक्षक आहे. ‘अनुभव’ त्याचं नाव. हा विचित्न शिक्षक आहे. आधी परीक्षा घेतो आणि मग शिकवतो. आम्ही जेव्हा वयम् या चळवळीची सुरुवात केली, तेव्हा आम्हालाही यातलं काही कळत नव्हतं. लोकशाही नेमकी चालते कशी? आणि  आपण साध्यासुध्या लोकांनी कुठलीही सत्ता हातात नसताना ही लोकशाही चालवायची कशी? हे आम्हालाही सुधरत नव्हतं; पण प्रयोग करत करत चुकत-माकत आम्ही शिकलो. काय शिकलो?* हेच की, आपल्याला बोचणारा, भेडसावणारा एक छोटासा प्रश्न घ्यायचा, अन्  तो सोडवण्यासाठी मिळेल त्या कायदेशीर मार्गाने झगडत राहायचं. जो प्रश्न किंवा जी समस्या आपल्याला अस्वस्थ करत नाही, त्यावर आपण लढू शकत नाही. * हेच की - प्रत्येकालाच अभिमान / अहंकार असतो. आपल्याला आहे तसा समोरच्यालाही आहे. म्हणून सरकारी कर्मचारी / अधिकारी यांच्याशी बोलताना राग आला तरी त्यांचा वैयक्तिक अपमान करायचा नाही. आपण सभ्य आहोत, सभ्यपणे शांतपणे बोलायचं. आपला मुद्दा, आपले हक्क सोडायचे नाहीत; पण भाषा सभ्यतेचीच हवी.* हेच की - वैयक्तिक लाभासाठी भांडण्यात सामथ्र्य नसतं. गावाच्या फायद्यासाठी, अनेकांच्या लाभासाठी लढण्यात ताकद असते. एकत्न येण्याची सवय लागणं हा लोकशाही लढय़ाचा पहिला फायदा आहे.* हेच की - जसे आपण तसेच शासन! सामान्य नागरिकांत जसे चांगले-वाईट लोक असतात, तसेच शासनात असतात. सगळेच भ्रष्ट आहेत, जो तो खायच्या मागे असतो,  - असली सरसकट विधाने करू नयेत. कारण ‘सगळंच वाईट’ असं कधीच नसतं!* वयम् चळवळीत किती जातीतले युवक-युवती सहभागी आहेत सांगता येणार नाही, कारण ते आम्ही कधीच पाहिलेलं नाही. अनेकांची आडनावं माहीत नसतात आम्हाला, कारण त्याच्याशी घेणंदेणंच नाही आपल्याला! भारतीय नागरिक म्हणूनच आम्ही एकमेकांची साथ देतो. आम्ही कायदा शिकण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतो. त्यातच नागरिकत्व म्हणजे काय, ‘शिका-संघटित व्हा-संघर्ष करा’ म्हणजे नेमकं काय, गाव हा स्वराज्याचा पाया कसा? हेही सारे शिकतो आणि प्रत्यक्षातही आणतो. पालघर जिल्ह्यातील जव्हार-मोखाडा व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील दोनशेहून अधिक गावांत वयम् चळवळीचे युवक गट कार्यरत आहेत. रोजगार हमी कायदा वापरून 13000 मजुरांना त्यांच्याच गावातल्या युवकांनी काम मिळवून दिले. स्थलांतर थांबवले. 500 छोटय़ा शेतकर्‍यांना पाण्याची सोय करून दिली. 1600हून अधिक आदिवासी शेतकर्‍यांना वनहक्क मिळवून दिले. 47 गावांच्या ग्रामसभांनी आपापला निधी मिळवला व अडलेली शासकीय कामे मार्गी लावून दाखवली. 12 गावांत सामूहिक निर्णय आणि श्रमदानाची रीत पडली. शासन आणि नागरिक यांच्यात समानतेचं नातं रूळतं आहे.असं घडू शकतं आणि हे घडवण्याची ताकद आपल्यासारख्या सामान्य माणसात असतेच हा वयम् चळवळीचा विश्वास आहे.