शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
6
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
7
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
8
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
9
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
10
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
11
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
12
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
13
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
14
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
15
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
16
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
17
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
18
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
19
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
20
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

By admin | Updated: April 27, 2017 17:17 IST

काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो

 -ऑक्सिजन टीम

 
 
उन्हाळा आला की नको होतो जीव, तगमग नुस्ती. घाम पुसून अर्धमेली होती त्वचा.  त्यात कोरडी किंवा तेलकट असेल त्वचा तर मग झालंच काम तमाम. त्यात आपल्या चूका. काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो आणि हातपाय तर असे जसे वाळकी लाकडेच!
यावर उपाय काय?
काही गोष्टी केल्या आणि काही टाळल्या तर उन्हाळ्यातही आपली त्वचा रसरशीत आंब्यासारखी मस्त दिसू शकेल.
 
1) भजीवडेसमोसे
उन्हाळ्यात भाजीपोळी नकोच होते. त्यात आपण सुटी म्हणून अरबट चरबट खातो. तेलकट, समोसे, वडे, आणि रस्त्यावरचं चमचमीत काय वाट्टेल ते भरतो. परिणाम म्हणून त्वचा तेलकट होते. जीव पाणी पाणी करतो पण ते ही कमीच पडतं. म्हणून कितीही इच्छा झाली तरी तेलकट पदार्थ टाळा. किंवा कमीत कमी खा.
 
2) कोल्डड्रिंक 
ते तर काय पितोच आपण. पण त्यातल्या अ‍ॅडेड शूगरचं काय? रंगांचं काय? सोडय़ाचं काय? तो एरिएटेड ड्रिंक्स धड पचत तर नाहीच. पण त्यानं कंबरेभोवतीची चरबी हमखास वाढते. त्यात हे पेय सतत प्याल्यानं भूक मरते, अनेकांना अजीर्ण होतं, अपचन होतं. पोट साफ होत नाही. त्यानं चेहर्‍यावर पिंपल्स वाढतात. म्हणूनच शितपेयं, अमूकतमूक मिल्क, तमूक मिल्कशेक, पॅक्ड ज्यूस हे सारं टाळा. फळं खा, ताजे रस प्या फळांचे ते ही वरुन साखर आणि बर्फ न घालता.
 
3) मेकअप
उन्हाळ्यात मेकअप करुन जाणार असाल तर किती करायचा याचं भान ठेवा. होतं काय, त्या मेकअपचे थर आणि घामांच्या धारा हे वाईट दिसंतच. पण त्यातून चेहर्‍याची त्वचा खराब होते ती वेगळीच!
 
 4) जागरण
हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. सुटी आहे म्हणून भरपूर जागरणं केली जातात. आणि त्यानं बॉडी क्लॉक बिघडतं, चहाकॉफीचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनही चेहर्‍याचा नूर पार बदलून जातो.