शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वडे-समोसे चहा-कॉफी - उन्हाळ्यात त्वचेचे शत्रू

By admin | Updated: April 27, 2017 17:17 IST

काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो

 -ऑक्सिजन टीम

 
 
उन्हाळा आला की नको होतो जीव, तगमग नुस्ती. घाम पुसून अर्धमेली होती त्वचा.  त्यात कोरडी किंवा तेलकट असेल त्वचा तर मग झालंच काम तमाम. त्यात आपल्या चूका. काही चूका आपण हमखास करतो उन्हाळ्यात आणि मग उष्णतेत जळून खाकच होतो आपल्या चेहर्‍याचा ग्लो आणि हातपाय तर असे जसे वाळकी लाकडेच!
यावर उपाय काय?
काही गोष्टी केल्या आणि काही टाळल्या तर उन्हाळ्यातही आपली त्वचा रसरशीत आंब्यासारखी मस्त दिसू शकेल.
 
1) भजीवडेसमोसे
उन्हाळ्यात भाजीपोळी नकोच होते. त्यात आपण सुटी म्हणून अरबट चरबट खातो. तेलकट, समोसे, वडे, आणि रस्त्यावरचं चमचमीत काय वाट्टेल ते भरतो. परिणाम म्हणून त्वचा तेलकट होते. जीव पाणी पाणी करतो पण ते ही कमीच पडतं. म्हणून कितीही इच्छा झाली तरी तेलकट पदार्थ टाळा. किंवा कमीत कमी खा.
 
2) कोल्डड्रिंक 
ते तर काय पितोच आपण. पण त्यातल्या अ‍ॅडेड शूगरचं काय? रंगांचं काय? सोडय़ाचं काय? तो एरिएटेड ड्रिंक्स धड पचत तर नाहीच. पण त्यानं कंबरेभोवतीची चरबी हमखास वाढते. त्यात हे पेय सतत प्याल्यानं भूक मरते, अनेकांना अजीर्ण होतं, अपचन होतं. पोट साफ होत नाही. त्यानं चेहर्‍यावर पिंपल्स वाढतात. म्हणूनच शितपेयं, अमूकतमूक मिल्क, तमूक मिल्कशेक, पॅक्ड ज्यूस हे सारं टाळा. फळं खा, ताजे रस प्या फळांचे ते ही वरुन साखर आणि बर्फ न घालता.
 
3) मेकअप
उन्हाळ्यात मेकअप करुन जाणार असाल तर किती करायचा याचं भान ठेवा. होतं काय, त्या मेकअपचे थर आणि घामांच्या धारा हे वाईट दिसंतच. पण त्यातून चेहर्‍याची त्वचा खराब होते ती वेगळीच!
 
 4) जागरण
हा आणखी एक महत्वाचा मुद्दा. सुटी आहे म्हणून भरपूर जागरणं केली जातात. आणि त्यानं बॉडी क्लॉक बिघडतं, चहाकॉफीचं प्रमाण वाढतं आणि त्यातूनही चेहर्‍याचा नूर पार बदलून जातो.