शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जगप्रवासाला निघालेला विष्णूदास चापके म्हणतो, घुमने में क्या जाता है ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:15 IST

फिरायला पैसा नाही, इच्छा लागते. जग पहायची ऊर्मी ही आपली ताकद बनते. मला वाटतं, माणसाचं आयुष्य हीच एक संधी आहे, त्याचं सोनं करायला पाहिजे.

ठळक मुद्दे प्रवास करून, जग पहायची ऊर्मी जपली पाहिजे. माणसाचं आयुष्य हीच एक संधी आहे त्याचं सोनं करायला पाहिजे..

विष्णुदास चापके

एवढं जग फिरतो आहेस तू, किती देश पाहिले, किती माणसं भेटली.काय सांगशील तुझ्या दोस्तांना.?असं विचारतं कुणी तेव्हा मी एकच वाक्य सांगेन, ‘फिरायला लागा!’ घुमने में क्या जाता है!- पण फिरायचं म्हणजे मनात पहिला प्रश्न येतो की, पैसा कुठून आणायचा? त्याविषयी मी नंतर बोलतो; पण मी आधी काहीतरी वेगळं शेअर करीन म्हणतो.मी  मूळचा  कातनेश्वर गावचा. (जिल्हा परभणी) आता प्रवासात आहे; पण गावातले दोस्त, व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्कात आहे. अनेक ग्रुपवरच्या चर्चाही वाचत असतो. अलीकडेच एक फोटो मला दिसला. गावातले गॉगल लावलेले तरुण त्यात. आपण कसे ‘रॉयल’ वगैरे अशी त्यावर कॅप्शन. ते पाहून मी जरा विचारात पडलो. वाटलं, आमच्या गावाकडे आईवडील शेतात राबतात. पिकं गेली, पावसानं दगा दिला तर ते कष्ट वाया जातात. आणि तरुण मुलं घरबसल्या फोटो काढून स्वतर्‍ला रॉयल म्हणतात, हे कसं काय? अनेक पालक तर शेतमजूर. आईवडिलांनी एखादा आठवडा जरी शेतात मजुरी केली नाही तरी घरात चूल पेटणार नाही. पण तरी त्यांनी मुलांना शिकवलं, जेमतेम दहावीर्पयत जाऊन काहींनी शाळा सोडल्या. आता कुठल्या तरी राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्यात ते पुढे सरसावतात. त्यावरून वादावादी, भांडणं, मारामारी होते. हे चित्र मला अस्वस्थ वाटतं, त्या माझ्या दोस्तांना सांगावंसं वाटतं की, जग खूप मोठं आहे. ते पहा.त्यासाठी प्रवास करा, आपलं गाव सोडून पहा तरी बाहेरचं जग कसं चाललंय, माणसं कशी जगत आहेत?जगात किंवा देशात शक्य नसेल तर किमान राज्यात तरी फिरा.  आपल्या पंचक्रोशीपासून सुरुवात करा. पालकांनाही विनंती की, या मुलांना घरात बसून ठेवण्यापेक्षा स्वतर्‍ची रोजीरोटी शोधायला जाऊ द्या घरातून बाहेर. त्यासाठी प्रोत्साहन द्या. एकदा मी माझ्या काकांना असंच सांगितलं की, त्यांच्या मुलाला जाऊ द्या गावाबाहेर नोकरी शोधायला. जाऊ द्या शहरात. पण काकांना मुलाचं शहरात काही बरंवाईट होईल का अशी भीती वाटत होती. त्यांची ही निराधार भीती काढताना मी म्हणालो, बरंवाईट काही व्हायचंच असेल तर ते खेडय़ातही होऊ शकतं. ते टाळणं शक्य नाही; परंतु तेवढय़ासाठी त्यानं गावातच राहावं हे काही बरोबर नाही.खरं सांगायचं तर या गावातल्या जगण्याचा मीही कधीकाळी भाग होतो. कॅनॉलच्या कडेला मारामारीत मी एकाच्या डोक्यात फावडं मारलं होतं. त्याला रक्तबंबाळ केलं होतं. तो पोलिसांत गेला असता तर माझं भवितव्य वेगळ्या वाटेनं गेलं असतं. एक मात्न बरं झालं त्या गोष्टीला घाबरून मी गाव सोडून आलो आणि जग प्रवासाच्या वाटेवर पोहचलो. म्हणून माझ्या दोस्तांना मी एकच सांगतो, नवीन जग अनुभवा. प्रवास करा. माणसांना भेटा. तर आपल्या अनुभवाच्या खिडक्या उघडतील. नजर बदलेल. समज वाढेल.आता प्रश्न पैशांचा. प्रवासाला पैसा लागतो का, तर लागतो. पण आज इतका प्रवास केल्यावर मला जाणवतंय की इतरांना मदत करायला चांगल्या लोकांची जगात कमी नाही. मात्र जेव्हा तुम्ही प्रवास सुरू करता  तेव्हा धर्म, पंथ, गर्व हे मागेच ठेवा. समजून घ्यायला शिकलं तर गोष्टी सोप्या होतात. त्याला आता तंत्रज्ञानाचीही मदत मिळते आहे.मला वाटतं घरातील कमीत कमी एका व्यक्तीने गावची वेस ओलांडून शहरात गेलं पाहिजे. प्रवास करून, जग पहायची ऊर्मी जपली पाहिजे. माणसाचं आयुष्य हीच एक संधी आहे त्याचं सोनं करायला पाहिजे..

(जग प्रवासाला निघालेल्या विष्णुदासने लिस्बन, पोर्तुगाल येथून लिहिलेला हा लेख. हा लेख लिहिला तो त्याच्या जग प्रवासाचा 915वा दिवस होता.)(शब्दांकन : अमोल जाधव)