शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:14 IST

इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणींचे सांगाडे आहेत. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच रुजता येत नाही. ही तुझी अडचण आहे.

ठळक मुद्देदिवाळीचे चार दिवस गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले असा छळणारा प्रश्न सांगणारं एक स्वगत.

- अरु ण तीनगोटे

गाव बदलत नाही.  गाव पुढं सरकत नाही.  गाव धूळभरल्या रस्त्यांची साथ सोडत नाही.  माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं कुणाची वाट पाहतात समजत नाही.. दारातला प्राजक्त आता बहरत नाही. गावात आता पूर्वीची रया नाही. नुसता फुफाटा आणि धुराळा आहे. गावातल्या म्हातार्‍या दिवसेंदिवस अधिक जख्ख म्हातार्‍या होत जात आहेत. भुवयांचे आणि पापण्यांचे केस पांढरे झालेल्या म्हातार्‍या आपल्या चेहर्‍याकडे निरखून पाहतात; पण तरी ताळमेळ लागत नाही. आपण आपली ओळख करून दिली तरी ती त्यांना पटतेच असं नाही. म्हातारी चेहर्‍याकडे असं पाहते जणू ती तिचाच तरुण भूतकाळ आपल्यात शोधते आहे. कुबडय़ा घेऊन चालत राहणार्‍या आजीला सांग की,   तू आमक्याचा तमका आहेस. तुमच्या शेजारी राहायचो. तिच्या पाया पड. ती तुला आशीर्वाद देईन. तिला विचार, तू कशी आहेस? अजून तरी बरी आहे, असं ती म्हणेन.   त्याचा अर्थ लावू नको. त्याचा अर्थ शोधू नको. तिला काही देऊ नको. तिच्याकडे काही मागू नको. तुझा भूतकाळ शोधू नको. नवं नातं बांधू नको. गाव तुला तसंच दिसत असलं तरी आतल्या उलथापालथी तुला समजतीलच असं नाही. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच जाता येत नाही. ही तुझी अडचण आहे. आणि  गावात किंवा शहरात असलेल्या कुठल्याही अडचणीपेक्षा ही मोठी अडचण आहे. गाव वाढत चाललं आहे. सर्वत्न जंगी घरं बांधली जात आहे. गावच्या मातीचा वास सीमेंटच्या वासात हरवून जात आहे. तुझं जुनं घर इथं शोधू नकोस. इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणीचे सांगाडे आहेत. आणि तसंही तुझं मन अधांतरीच होतं आणि आहे. पोपडे आलेल्या भिंतींना पोतेरं मारणार्‍या आईचं थकलेलं शरीर, संध्याकाळी घरी येणार्‍या बापाचा आराम शोधणारा देह, दारातलं मोठं गुलमोहराचं झाड, त्याच्या वाळलेल्या शेंगा, त्याला उन्हाळ्यात  येणारी लालबुंद फुलं किंवा त्याची नाजूक हिरवी पानं, त्या गुलमोहरावर फक्त कावळ्यांचीच वस्ती का असायची.? शेजारच्या घरातील मांजरीचं  पिल्लू, बकरीच्या दुधात गुळाचा चहा बनवणारी शेजारची मावशी, त्यांनी झाडावर पाळलेलं माकड, संध्याकाळी थकून आल्यांनतर गणित  शिकवण्याचा प्रयत्न करणारा बाप.. ही अशी वाढत जाणारी रांग थांबणार नाही. पण तू थांब. परत मागे फिर. शहराकडे चालायला लाग. हे गाव तुला पुन्हा कुशीत घेणार नाही आणि तू मेला तरी शहराचा होणार नाहीस. तुझी मुळं शोधणं कठीण आहे..