शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले हा प्रश्न का छळतो ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 17:14 IST

इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणींचे सांगाडे आहेत. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच रुजता येत नाही. ही तुझी अडचण आहे.

ठळक मुद्देदिवाळीचे चार दिवस गावाला जाऊन शहरात परतलं की आपण नक्की कुठले असा छळणारा प्रश्न सांगणारं एक स्वगत.

- अरु ण तीनगोटे

गाव बदलत नाही.  गाव पुढं सरकत नाही.  गाव धूळभरल्या रस्त्यांची साथ सोडत नाही.  माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं कुणाची वाट पाहतात समजत नाही.. दारातला प्राजक्त आता बहरत नाही. गावात आता पूर्वीची रया नाही. नुसता फुफाटा आणि धुराळा आहे. गावातल्या म्हातार्‍या दिवसेंदिवस अधिक जख्ख म्हातार्‍या होत जात आहेत. भुवयांचे आणि पापण्यांचे केस पांढरे झालेल्या म्हातार्‍या आपल्या चेहर्‍याकडे निरखून पाहतात; पण तरी ताळमेळ लागत नाही. आपण आपली ओळख करून दिली तरी ती त्यांना पटतेच असं नाही. म्हातारी चेहर्‍याकडे असं पाहते जणू ती तिचाच तरुण भूतकाळ आपल्यात शोधते आहे. कुबडय़ा घेऊन चालत राहणार्‍या आजीला सांग की,   तू आमक्याचा तमका आहेस. तुमच्या शेजारी राहायचो. तिच्या पाया पड. ती तुला आशीर्वाद देईन. तिला विचार, तू कशी आहेस? अजून तरी बरी आहे, असं ती म्हणेन.   त्याचा अर्थ लावू नको. त्याचा अर्थ शोधू नको. तिला काही देऊ नको. तिच्याकडे काही मागू नको. तुझा भूतकाळ शोधू नको. नवं नातं बांधू नको. गाव तुला तसंच दिसत असलं तरी आतल्या उलथापालथी तुला समजतीलच असं नाही. तू गावाला तुटला आहेस. आणि गावही तुला दुरावलं आहे. तू जेव्हा इथे होतास तेव्हा मनानं इथं नव्हतास आणि आता शरीरानं शहरात आहेस पण मनानं गावात आहेस. तुला कुठंच जाता येत नाही. ही तुझी अडचण आहे. आणि  गावात किंवा शहरात असलेल्या कुठल्याही अडचणीपेक्षा ही मोठी अडचण आहे. गाव वाढत चाललं आहे. सर्वत्न जंगी घरं बांधली जात आहे. गावच्या मातीचा वास सीमेंटच्या वासात हरवून जात आहे. तुझं जुनं घर इथं शोधू नकोस. इथं आता फक्त तुझ्या जुन्या आठवणीचे सांगाडे आहेत. आणि तसंही तुझं मन अधांतरीच होतं आणि आहे. पोपडे आलेल्या भिंतींना पोतेरं मारणार्‍या आईचं थकलेलं शरीर, संध्याकाळी घरी येणार्‍या बापाचा आराम शोधणारा देह, दारातलं मोठं गुलमोहराचं झाड, त्याच्या वाळलेल्या शेंगा, त्याला उन्हाळ्यात  येणारी लालबुंद फुलं किंवा त्याची नाजूक हिरवी पानं, त्या गुलमोहरावर फक्त कावळ्यांचीच वस्ती का असायची.? शेजारच्या घरातील मांजरीचं  पिल्लू, बकरीच्या दुधात गुळाचा चहा बनवणारी शेजारची मावशी, त्यांनी झाडावर पाळलेलं माकड, संध्याकाळी थकून आल्यांनतर गणित  शिकवण्याचा प्रयत्न करणारा बाप.. ही अशी वाढत जाणारी रांग थांबणार नाही. पण तू थांब. परत मागे फिर. शहराकडे चालायला लाग. हे गाव तुला पुन्हा कुशीत घेणार नाही आणि तू मेला तरी शहराचा होणार नाहीस. तुझी मुळं शोधणं कठीण आहे..