शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

तंबाखू सोडलेलं गाव

By admin | Updated: June 3, 2016 12:18 IST

शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तंबाखूच्या व्यसनात अडकलेले. सा:यांनी एक दिवस ठरवलं, हे व्यसन सोडायचं.

चंद्रपुरातील कोरपाणी तालुक्यातील थुट्रा हे गाव. महाराष्ट्रातील पहिलं ‘तंबाखूमुक्त’ गाव म्हणून तीन वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं. ग्रामपंचायतीनं एकत्र येऊन घेतलेल्या सकारात्मक निर्णयानं गावात आता एकही तंबाखू विक्रेता नाही. या गावाचा आदर्श घेऊन शेजारच्या राजुटा तालुक्यातील खैरगुडा आणि मंगीबुजुर्ग तसेच जिवती तालुक्यातील महांगुडा, लोलदे या गावांनीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला. 
त्या थुट्रा गावची ही आजवरची गोष्ट. साधारण 75क् लोकसंख्या असलेलं 183 घरांचं गाव. तांदळाची शेती हा प्रमुख व्यवसाय. गाव तसं इतर गावांप्रमाणोच. पण 2क्क्9 साली सलाम बॉम्बे संस्थेनं राज्यातील पहिलं तंबाखूमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानंतर गावाला प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला पुरस्कृत करण्यात आलं. गाव तंबाखूमुक्त होण्याच्या प्रक्रियेला चार ते पाच वर्षे गेली. याआधी गावातील स्त्रिया, शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंबाखू आणि खर्रा खाणा:यांचं प्रमाण जास्त होतं.
 पण एका घटनेने गावाचा तंबाखूजन्य पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2क्क्7 च्या दरम्यान अरुण तानाजी जाधव हा गावकरी कॅन्सरने दगावला. तंबाखूच्या अतिसेवनाने तोंडाच्या कॅन्सरचा त्रस गावक:यांनी जवळून बघितला. दरम्यान, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि अंबुजा सीमेंट फाउंडेशन यांनी तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी आक्रमक पाऊलं उचलली.
 गावचे सरपंच वामन भिवपुरे यांनी स्वत:चं तंबाखूचं दुकान बंद करत चळवळीत पुढाकार घेतला. गाव तंबाखूमुक्त होण्याची गरज ओळखून ग्रामसभा बोलवत प्रत्येक गावक:यार्पयत हा विषय पोहोचवला. सरपंच भिवपुरे यांनी स्वत:पासून सुरुवात केल्यानं गावक:यांनाही प्रेरणा मिळाली. शाळांमधून तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती सुरू झाली. विद्याथ्र्याद्वारे तंबाखूमुक्ततेचा संदेश हळूहळू प्रत्येक घरात पोहोचत होता. तंबाखूमुक्तच्या घोषणांचे फलक शाळांप्रमाणोच घरांवरही लागले. गावक:यांनी सेवाभावी संस्था आणि पोलिसांच्या मदतीनं दुकानातील तंबाखूविक्री थांबविली. क ाही तंबाखूविक्रेत्यांनी जेव्हा तंबाखूविक्रीचा प्रयत्न केला तेव्हा गावक:यांनी पोलीस आणि एफडीएच्या मदतीने दुकानांवर कारवाई करवली. तंबाखूजन्य पदार्थमुक्तीच्या ‘कोप्टा 2क्क्3‘ या कायद्याबद्दल गावात जनजागृती होत होती. आरोग्यसखी संकल्पनेअंतर्गत पुष्पाताई चुनारकर यांनी घराघरात जाऊन महिलांची मते जाणून घेतली. महिलांची एक फळी या लढय़ात अग्रस्थानी होती. 
थुट्रातील शाळा तंबाखूमुक्त झाली. तंबाखूविक्रेत्यांनी कमाईचे इतर पर्याय शोधले. तरुणांनीही आपल्या तोंडावर ताबा मिळवत तंबाखू, गुटखा यांना नकार दिला. 
गावचे सरपंच वामन भिवपुरे सांगतात, ‘आता पुढच्या पिढीला आम्ही अभिमानानं सांगू की, एक मोठं व्यसन आम्ही कायमचं सोडलं. एकटय़ादुकटय़ानं नाही, तर सा:या गावानंच तंबाखू सोडली हे मोठं यश आहे.’ 
 सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ग्रामीणचे सहायक व्यवस्थापक दीपक पाटील, अंबुजा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी कल्पना भेंडे, शिक्षक ए. एस. शिवकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
 शाळकरी वयातल्या मुलांसह तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येत सोडलेल्या या तंबाखूची गोष्ट प्रेरणादायी आहे, हे नक्की !
 
- प्रवीण दाभोलकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)