शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

तंबाखू सोडलेलं गाव

By admin | Updated: June 3, 2016 12:18 IST

शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तंबाखूच्या व्यसनात अडकलेले. सा:यांनी एक दिवस ठरवलं, हे व्यसन सोडायचं.

चंद्रपुरातील कोरपाणी तालुक्यातील थुट्रा हे गाव. महाराष्ट्रातील पहिलं ‘तंबाखूमुक्त’ गाव म्हणून तीन वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं. ग्रामपंचायतीनं एकत्र येऊन घेतलेल्या सकारात्मक निर्णयानं गावात आता एकही तंबाखू विक्रेता नाही. या गावाचा आदर्श घेऊन शेजारच्या राजुटा तालुक्यातील खैरगुडा आणि मंगीबुजुर्ग तसेच जिवती तालुक्यातील महांगुडा, लोलदे या गावांनीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला. 
त्या थुट्रा गावची ही आजवरची गोष्ट. साधारण 75क् लोकसंख्या असलेलं 183 घरांचं गाव. तांदळाची शेती हा प्रमुख व्यवसाय. गाव तसं इतर गावांप्रमाणोच. पण 2क्क्9 साली सलाम बॉम्बे संस्थेनं राज्यातील पहिलं तंबाखूमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानंतर गावाला प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला पुरस्कृत करण्यात आलं. गाव तंबाखूमुक्त होण्याच्या प्रक्रियेला चार ते पाच वर्षे गेली. याआधी गावातील स्त्रिया, शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंबाखू आणि खर्रा खाणा:यांचं प्रमाण जास्त होतं.
 पण एका घटनेने गावाचा तंबाखूजन्य पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2क्क्7 च्या दरम्यान अरुण तानाजी जाधव हा गावकरी कॅन्सरने दगावला. तंबाखूच्या अतिसेवनाने तोंडाच्या कॅन्सरचा त्रस गावक:यांनी जवळून बघितला. दरम्यान, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि अंबुजा सीमेंट फाउंडेशन यांनी तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी आक्रमक पाऊलं उचलली.
 गावचे सरपंच वामन भिवपुरे यांनी स्वत:चं तंबाखूचं दुकान बंद करत चळवळीत पुढाकार घेतला. गाव तंबाखूमुक्त होण्याची गरज ओळखून ग्रामसभा बोलवत प्रत्येक गावक:यार्पयत हा विषय पोहोचवला. सरपंच भिवपुरे यांनी स्वत:पासून सुरुवात केल्यानं गावक:यांनाही प्रेरणा मिळाली. शाळांमधून तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती सुरू झाली. विद्याथ्र्याद्वारे तंबाखूमुक्ततेचा संदेश हळूहळू प्रत्येक घरात पोहोचत होता. तंबाखूमुक्तच्या घोषणांचे फलक शाळांप्रमाणोच घरांवरही लागले. गावक:यांनी सेवाभावी संस्था आणि पोलिसांच्या मदतीनं दुकानातील तंबाखूविक्री थांबविली. क ाही तंबाखूविक्रेत्यांनी जेव्हा तंबाखूविक्रीचा प्रयत्न केला तेव्हा गावक:यांनी पोलीस आणि एफडीएच्या मदतीने दुकानांवर कारवाई करवली. तंबाखूजन्य पदार्थमुक्तीच्या ‘कोप्टा 2क्क्3‘ या कायद्याबद्दल गावात जनजागृती होत होती. आरोग्यसखी संकल्पनेअंतर्गत पुष्पाताई चुनारकर यांनी घराघरात जाऊन महिलांची मते जाणून घेतली. महिलांची एक फळी या लढय़ात अग्रस्थानी होती. 
थुट्रातील शाळा तंबाखूमुक्त झाली. तंबाखूविक्रेत्यांनी कमाईचे इतर पर्याय शोधले. तरुणांनीही आपल्या तोंडावर ताबा मिळवत तंबाखू, गुटखा यांना नकार दिला. 
गावचे सरपंच वामन भिवपुरे सांगतात, ‘आता पुढच्या पिढीला आम्ही अभिमानानं सांगू की, एक मोठं व्यसन आम्ही कायमचं सोडलं. एकटय़ादुकटय़ानं नाही, तर सा:या गावानंच तंबाखू सोडली हे मोठं यश आहे.’ 
 सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ग्रामीणचे सहायक व्यवस्थापक दीपक पाटील, अंबुजा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी कल्पना भेंडे, शिक्षक ए. एस. शिवकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
 शाळकरी वयातल्या मुलांसह तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येत सोडलेल्या या तंबाखूची गोष्ट प्रेरणादायी आहे, हे नक्की !
 
- प्रवीण दाभोलकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)