शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

तंबाखू सोडलेलं गाव

By admin | Updated: June 3, 2016 12:18 IST

शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तंबाखूच्या व्यसनात अडकलेले. सा:यांनी एक दिवस ठरवलं, हे व्यसन सोडायचं.

चंद्रपुरातील कोरपाणी तालुक्यातील थुट्रा हे गाव. महाराष्ट्रातील पहिलं ‘तंबाखूमुक्त’ गाव म्हणून तीन वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं. ग्रामपंचायतीनं एकत्र येऊन घेतलेल्या सकारात्मक निर्णयानं गावात आता एकही तंबाखू विक्रेता नाही. या गावाचा आदर्श घेऊन शेजारच्या राजुटा तालुक्यातील खैरगुडा आणि मंगीबुजुर्ग तसेच जिवती तालुक्यातील महांगुडा, लोलदे या गावांनीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला. 
त्या थुट्रा गावची ही आजवरची गोष्ट. साधारण 75क् लोकसंख्या असलेलं 183 घरांचं गाव. तांदळाची शेती हा प्रमुख व्यवसाय. गाव तसं इतर गावांप्रमाणोच. पण 2क्क्9 साली सलाम बॉम्बे संस्थेनं राज्यातील पहिलं तंबाखूमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानंतर गावाला प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला पुरस्कृत करण्यात आलं. गाव तंबाखूमुक्त होण्याच्या प्रक्रियेला चार ते पाच वर्षे गेली. याआधी गावातील स्त्रिया, शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंबाखू आणि खर्रा खाणा:यांचं प्रमाण जास्त होतं.
 पण एका घटनेने गावाचा तंबाखूजन्य पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2क्क्7 च्या दरम्यान अरुण तानाजी जाधव हा गावकरी कॅन्सरने दगावला. तंबाखूच्या अतिसेवनाने तोंडाच्या कॅन्सरचा त्रस गावक:यांनी जवळून बघितला. दरम्यान, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि अंबुजा सीमेंट फाउंडेशन यांनी तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी आक्रमक पाऊलं उचलली.
 गावचे सरपंच वामन भिवपुरे यांनी स्वत:चं तंबाखूचं दुकान बंद करत चळवळीत पुढाकार घेतला. गाव तंबाखूमुक्त होण्याची गरज ओळखून ग्रामसभा बोलवत प्रत्येक गावक:यार्पयत हा विषय पोहोचवला. सरपंच भिवपुरे यांनी स्वत:पासून सुरुवात केल्यानं गावक:यांनाही प्रेरणा मिळाली. शाळांमधून तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती सुरू झाली. विद्याथ्र्याद्वारे तंबाखूमुक्ततेचा संदेश हळूहळू प्रत्येक घरात पोहोचत होता. तंबाखूमुक्तच्या घोषणांचे फलक शाळांप्रमाणोच घरांवरही लागले. गावक:यांनी सेवाभावी संस्था आणि पोलिसांच्या मदतीनं दुकानातील तंबाखूविक्री थांबविली. क ाही तंबाखूविक्रेत्यांनी जेव्हा तंबाखूविक्रीचा प्रयत्न केला तेव्हा गावक:यांनी पोलीस आणि एफडीएच्या मदतीने दुकानांवर कारवाई करवली. तंबाखूजन्य पदार्थमुक्तीच्या ‘कोप्टा 2क्क्3‘ या कायद्याबद्दल गावात जनजागृती होत होती. आरोग्यसखी संकल्पनेअंतर्गत पुष्पाताई चुनारकर यांनी घराघरात जाऊन महिलांची मते जाणून घेतली. महिलांची एक फळी या लढय़ात अग्रस्थानी होती. 
थुट्रातील शाळा तंबाखूमुक्त झाली. तंबाखूविक्रेत्यांनी कमाईचे इतर पर्याय शोधले. तरुणांनीही आपल्या तोंडावर ताबा मिळवत तंबाखू, गुटखा यांना नकार दिला. 
गावचे सरपंच वामन भिवपुरे सांगतात, ‘आता पुढच्या पिढीला आम्ही अभिमानानं सांगू की, एक मोठं व्यसन आम्ही कायमचं सोडलं. एकटय़ादुकटय़ानं नाही, तर सा:या गावानंच तंबाखू सोडली हे मोठं यश आहे.’ 
 सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ग्रामीणचे सहायक व्यवस्थापक दीपक पाटील, अंबुजा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी कल्पना भेंडे, शिक्षक ए. एस. शिवकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
 शाळकरी वयातल्या मुलांसह तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येत सोडलेल्या या तंबाखूची गोष्ट प्रेरणादायी आहे, हे नक्की !
 
- प्रवीण दाभोलकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)