शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखू सोडलेलं गाव

By admin | Updated: June 3, 2016 12:18 IST

शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकही तंबाखूच्या व्यसनात अडकलेले. सा:यांनी एक दिवस ठरवलं, हे व्यसन सोडायचं.

चंद्रपुरातील कोरपाणी तालुक्यातील थुट्रा हे गाव. महाराष्ट्रातील पहिलं ‘तंबाखूमुक्त’ गाव म्हणून तीन वर्षापूर्वी घोषित करण्यात आलं. ग्रामपंचायतीनं एकत्र येऊन घेतलेल्या सकारात्मक निर्णयानं गावात आता एकही तंबाखू विक्रेता नाही. या गावाचा आदर्श घेऊन शेजारच्या राजुटा तालुक्यातील खैरगुडा आणि मंगीबुजुर्ग तसेच जिवती तालुक्यातील महांगुडा, लोलदे या गावांनीही तंबाखूमुक्त होण्याचा निर्णय घेतला. 
त्या थुट्रा गावची ही आजवरची गोष्ट. साधारण 75क् लोकसंख्या असलेलं 183 घरांचं गाव. तांदळाची शेती हा प्रमुख व्यवसाय. गाव तसं इतर गावांप्रमाणोच. पण 2क्क्9 साली सलाम बॉम्बे संस्थेनं राज्यातील पहिलं तंबाखूमुक्त गाव म्हणून घोषित केल्यानंतर गावाला प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गावाला पुरस्कृत करण्यात आलं. गाव तंबाखूमुक्त होण्याच्या प्रक्रियेला चार ते पाच वर्षे गेली. याआधी गावातील स्त्रिया, शाळकरी विद्यार्थी, तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांमध्ये तंबाखू आणि खर्रा खाणा:यांचं प्रमाण जास्त होतं.
 पण एका घटनेने गावाचा तंबाखूजन्य पदार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. 2क्क्7 च्या दरम्यान अरुण तानाजी जाधव हा गावकरी कॅन्सरने दगावला. तंबाखूच्या अतिसेवनाने तोंडाच्या कॅन्सरचा त्रस गावक:यांनी जवळून बघितला. दरम्यान, सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि अंबुजा सीमेंट फाउंडेशन यांनी तंबाखूमुक्त गाव करण्यासाठी आक्रमक पाऊलं उचलली.
 गावचे सरपंच वामन भिवपुरे यांनी स्वत:चं तंबाखूचं दुकान बंद करत चळवळीत पुढाकार घेतला. गाव तंबाखूमुक्त होण्याची गरज ओळखून ग्रामसभा बोलवत प्रत्येक गावक:यार्पयत हा विषय पोहोचवला. सरपंच भिवपुरे यांनी स्वत:पासून सुरुवात केल्यानं गावक:यांनाही प्रेरणा मिळाली. शाळांमधून तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती सुरू झाली. विद्याथ्र्याद्वारे तंबाखूमुक्ततेचा संदेश हळूहळू प्रत्येक घरात पोहोचत होता. तंबाखूमुक्तच्या घोषणांचे फलक शाळांप्रमाणोच घरांवरही लागले. गावक:यांनी सेवाभावी संस्था आणि पोलिसांच्या मदतीनं दुकानातील तंबाखूविक्री थांबविली. क ाही तंबाखूविक्रेत्यांनी जेव्हा तंबाखूविक्रीचा प्रयत्न केला तेव्हा गावक:यांनी पोलीस आणि एफडीएच्या मदतीने दुकानांवर कारवाई करवली. तंबाखूजन्य पदार्थमुक्तीच्या ‘कोप्टा 2क्क्3‘ या कायद्याबद्दल गावात जनजागृती होत होती. आरोग्यसखी संकल्पनेअंतर्गत पुष्पाताई चुनारकर यांनी घराघरात जाऊन महिलांची मते जाणून घेतली. महिलांची एक फळी या लढय़ात अग्रस्थानी होती. 
थुट्रातील शाळा तंबाखूमुक्त झाली. तंबाखूविक्रेत्यांनी कमाईचे इतर पर्याय शोधले. तरुणांनीही आपल्या तोंडावर ताबा मिळवत तंबाखू, गुटखा यांना नकार दिला. 
गावचे सरपंच वामन भिवपुरे सांगतात, ‘आता पुढच्या पिढीला आम्ही अभिमानानं सांगू की, एक मोठं व्यसन आम्ही कायमचं सोडलं. एकटय़ादुकटय़ानं नाही, तर सा:या गावानंच तंबाखू सोडली हे मोठं यश आहे.’ 
 सलाम बॉम्बे फाउंडेशनचे ग्रामीणचे सहायक व्यवस्थापक दीपक पाटील, अंबुजा फाउंडेशनच्या प्रकल्प अधिकारी कल्पना भेंडे, शिक्षक ए. एस. शिवकर यांनी याकामी पुढाकार घेतला.
 शाळकरी वयातल्या मुलांसह तरुण आणि ज्येष्ठांनी एकत्र येत सोडलेल्या या तंबाखूची गोष्ट प्रेरणादायी आहे, हे नक्की !
 
- प्रवीण दाभोलकर
(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)