शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

सातपुडय़ातले अस्वस्थ बाल-पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 16:49 IST

सातपुडय़ाच्या रांगात, आदिवासी पाडय़ात बालविवाह तर मोठय़ा प्रमाणात होतातच, पाळणाही दरवर्षी हलतो आणि अल्पवयीन मातांच्या समस्या वाढतात.

ठळक मुद्देबालविवाह आणि लहान वयात जास्त अपत्य ही समस्या आजही सातपुडय़ात मोठी आहे. 

-रमाकांत पाटील,

कुपोषण हा शब्द पाठ सोडत नाही आणि दरवर्षीच छळतो, तो सातपुडय़ात. सातपुडय़ाच्या रांगांमध्ये शेकडो आदिवासी पाडे आहेत. जगापासून, विकासापासून, नव्या जगापासून दूर. नव्या जगाशी ते काय कनेक्ट सांगणार, या पाडय़ांर्पयत  पोहोचण्यासाठी अद्यापही रस्तेच नाहीत. मग विकासाच्या वाटेवर सुसाट चालणारी गाडी इथं कशी पोहचणार? ती पोहचत नाही त्यामुळे साहजिकच अज्ञान आणि दारिद्रय़ यांचं प्रमाण मोठं आहे.पिढय़ान्पिढय़ा हे असंच चाललेलं असलं तरी आजचं तारुण्यही त्यापायी आपल्यापुढे जगण्याचे अनेक प्रश्न घेऊन उभं आहे.या भागात बालविवाहाचा प्रमाण आजही जास्त आहे. विवाह लवकर होतात आणि संतती नियमनाची काही माहितीच पोहचत नाही त्यामुळे संततीचे प्रमाणही जास्त आहे. कुपोषणाचा प्रश्न या भागात जास्त दिसतो कारण अल्पवयीन माता, त्यांचे नियमित हलणारे पाळणे, अपत्य संख्या जास्त आणि त्या बाळांना योग्य पोषण न मिळणं हा येथील मुख्य प्रश्न आहे.आजही या भागात विवाहाची 100 टक्के नोंदणी होत नाही. मात्र तरीही एका सव्रेक्षणानुसार येथे बालविवाहाचे प्रमाण 26 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्याचप्रमाणे पाचपेक्षा अधिक अपत्य असणार्‍या मातांची संख्या जवळपास 35 टक्के आहे. एवढेच नव्हे तर या भागात फिरताना 15 पेक्षा अधिक अपत्य असणार्‍या माताही भेटतात. जन्माला आलेली सर्वच अपत्य पाच वर्षापेक्षा अधिक आयुष्य जगतात असं नाही. त्यामुळे बालमृत्यूचं प्रमाणही जास्त आहे.म्हणजे एकीकडे बालविवाह,  वयाची 18 वर्षेही पूर्ण न झालेल्या दोन-तीन मुलांच्या माता यांची संख्या येथे जास्त आहे. आरोग्यशास्ननुसार बाळाला जन्म देण्यासाठी आईचे किमान वय  20 तरी असावे पण इथं प्रत्यक्षात 18 पेक्षा कमीच वयात मुली बाळंतीण होतात. त्यांचं पोषण होत नाही, त्यामुळे बाळंही कमी वजनाची जन्माला येतात. त्यांना अनेक आजारांची लागणही होते. साहजिकच अशा स्थितीत बाळ दगावण्याची शक्यता जास्त असते किंवा ते कायमस्वरूपी कुपोषित राहण्याची शक्यताही असते. दुसरी बाब म्हणजे अपत्य संख्या जास्त असल्याने तरुण माता आपल्या बाळाच्या योग्य पद्धतीने सांभाळ करू शकत नाही. अशा मातांमध्ये दोन अपत्यातील अंतरही कमी असते. परिणामी कमी वजनाची व पुरेसे पोषण न झालेले बाळ जन्माला येत राहतात. बालविवाह आणि लहान वयात जास्त अपत्य ही समस्या आजही सातपुडय़ात मोठी आहे. (लेखक लोकमतचे नंदुरबारचे प्रतिनिधी आहेत.)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा