शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

टीव्ही डे साजरा केला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:11 IST

टीव्हीच्या प्रचारासाठी जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा होतो; पण मग तरी टीव्ही पाहणं बंद करा, असा प्रचारही सुरूच असतो. ते का?

ठळक मुद्देअनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.

- अनन्या भारद्वाज

टीव्हीच्या प्रचारासाठी एकेकाळी जगभर जागतिक टेलिव्हिजन डे साजरा करणं सुरू झालं, यावर आज आपण विश्वास ठेवू का?पण तो एकेकाळही काही फार लांब नाही. 1996 साली संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा करण्याचं ठरवलं. सुरुवातीला 21 आणि 22 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत तो विभागून साजरा व्हायचा, आता 21 नोव्हेंबर रोजी साजरा होतो. त्याकाळी माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण, सरकारी योजनांचा प्रचार यासह लोकसंवाद आणि जनजागृतीसाठी टीव्ही वापरला जावा, अशी जगभर अपेक्षा होती. त्यातून हा दिवस आकारास आला.आता काळ इतका बदलला की, टीव्ही केवळ मनोरंजनापुरता उरला आणि एकेकाळी टीव्ही पहा असा प्रचार होत होता आता टीव्ही कमी पहा, त्यातून अनेक आजार बळावतात. तासन्तास टीव्ही पाहिल्यानं कोच पोटॅटो अर्थात वजन वाढून बटाटे झालेले गोळे आणि डोळ्यांना चष्मे आलेली माणसं वाढली तेव्हा टीव्ही कमी पहा, बाहेर पडा असा प्रचार होऊ लागला. काळ किती झपाटय़ानं बदलला याचं हे उदाहरण..आपल्याकडेही एकेकाळी रामायण महाभारत टीव्हीवर सुरू होतं त्याकाळात रस्ते ओस पडत. पुढं अनेक चॅनल आले आणि आताही टीव्ही सिरीअल्सचा रतीब घरोघर सुरूच आहे. तरुण मुलं आताशा कमी टीव्ही पाहू लागली आहेत, अशी जगभर चर्चा आहे. मात्र तो वेळ सोशल मीडिया आणि यू टय़ूबवर जाऊ लागला याचीही चिंता आहेत.जगभरातले टेलिव्हिजन वर्तनाचे म्हणजेच टीव्हीमुळं झालेल्या माणसांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.त्या या 7 गोष्टी.1. वेळ वाया जातो, काय सकस पाहिलं टीव्हीवर याचं उत्तर जगभरात आज कुणाकडेही नाही.2. टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या, चर्चा यातून सकारात्मकता लाभण्यापेक्षा नकारात्मकता वाढीस लागते, असाही एक आक्षेप आहेच.3. आपली विचारपद्धती, धारणा आणि चांगुलपणावरची श्रद्धाही टीव्हीवरच्या सतत नकारात्मकतेमुळे बदलते.4. आपल्या जगण्याकडून, समाजाकडून आणि स्वतर्‍कडूनही अवास्तव अपेक्षा वाढीस लागतात.5. जाहिरातींच्या मार्‍यानं आपण अकारण गरजा निर्माण करतो, त्या वाढवतो.6. शिस्त आणि स्वतर्‍वरचं नियंत्रण या गोष्टी सुटतात, पाहण्याचं व्यसन लागतं.7. रिलॅक्स होत नाहीच. मेंदू शांत होत नाही. त्यामुळे त्या वेळातून आपल्याला विश्रांतीही मिळत नाही.