शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

टीव्ही डे साजरा केला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 15:11 IST

टीव्हीच्या प्रचारासाठी जागतिक टेलिव्हिजन दिन साजरा होतो; पण मग तरी टीव्ही पाहणं बंद करा, असा प्रचारही सुरूच असतो. ते का?

ठळक मुद्देअनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.

- अनन्या भारद्वाज

टीव्हीच्या प्रचारासाठी एकेकाळी जगभर जागतिक टेलिव्हिजन डे साजरा करणं सुरू झालं, यावर आज आपण विश्वास ठेवू का?पण तो एकेकाळही काही फार लांब नाही. 1996 साली संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक टेलिव्हिजन दिवस साजरा करण्याचं ठरवलं. सुरुवातीला 21 आणि 22 नोव्हेंबर अशा दोन दिवसांत तो विभागून साजरा व्हायचा, आता 21 नोव्हेंबर रोजी साजरा होतो. त्याकाळी माहिती, मनोरंजन, लोकशिक्षण, सरकारी योजनांचा प्रचार यासह लोकसंवाद आणि जनजागृतीसाठी टीव्ही वापरला जावा, अशी जगभर अपेक्षा होती. त्यातून हा दिवस आकारास आला.आता काळ इतका बदलला की, टीव्ही केवळ मनोरंजनापुरता उरला आणि एकेकाळी टीव्ही पहा असा प्रचार होत होता आता टीव्ही कमी पहा, त्यातून अनेक आजार बळावतात. तासन्तास टीव्ही पाहिल्यानं कोच पोटॅटो अर्थात वजन वाढून बटाटे झालेले गोळे आणि डोळ्यांना चष्मे आलेली माणसं वाढली तेव्हा टीव्ही कमी पहा, बाहेर पडा असा प्रचार होऊ लागला. काळ किती झपाटय़ानं बदलला याचं हे उदाहरण..आपल्याकडेही एकेकाळी रामायण महाभारत टीव्हीवर सुरू होतं त्याकाळात रस्ते ओस पडत. पुढं अनेक चॅनल आले आणि आताही टीव्ही सिरीअल्सचा रतीब घरोघर सुरूच आहे. तरुण मुलं आताशा कमी टीव्ही पाहू लागली आहेत, अशी जगभर चर्चा आहे. मात्र तो वेळ सोशल मीडिया आणि यू टय़ूबवर जाऊ लागला याचीही चिंता आहेत.जगभरातले टेलिव्हिजन वर्तनाचे म्हणजेच टीव्हीमुळं झालेल्या माणसांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक सांगतात की, 7 गोष्टी आहेत, ज्यासाठी तुम्ही टीव्ही कमी पहावा किंवा खरं तर अजिबात पाहू नये.त्या या 7 गोष्टी.1. वेळ वाया जातो, काय सकस पाहिलं टीव्हीवर याचं उत्तर जगभरात आज कुणाकडेही नाही.2. टीव्हीवरचे कार्यक्रम, बातम्या, चर्चा यातून सकारात्मकता लाभण्यापेक्षा नकारात्मकता वाढीस लागते, असाही एक आक्षेप आहेच.3. आपली विचारपद्धती, धारणा आणि चांगुलपणावरची श्रद्धाही टीव्हीवरच्या सतत नकारात्मकतेमुळे बदलते.4. आपल्या जगण्याकडून, समाजाकडून आणि स्वतर्‍कडूनही अवास्तव अपेक्षा वाढीस लागतात.5. जाहिरातींच्या मार्‍यानं आपण अकारण गरजा निर्माण करतो, त्या वाढवतो.6. शिस्त आणि स्वतर्‍वरचं नियंत्रण या गोष्टी सुटतात, पाहण्याचं व्यसन लागतं.7. रिलॅक्स होत नाहीच. मेंदू शांत होत नाही. त्यामुळे त्या वेळातून आपल्याला विश्रांतीही मिळत नाही.