शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

टाइम मॅनेजमेण्ट घिसापिटा पचका

By admin | Updated: February 26, 2015 21:09 IST

आपल्या वेळा न पाळण्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, नवीन कामं देत नाहीत आणि उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल येऊन चिकटतं!

 आपल्या वेळा न पाळण्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, नवीन कामं देत नाहीत 

आणि उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल येऊन चिकटतं!
करिअर मार खातं ते इथंच!
 
 
खरं तर आजच्या कार्पोरेट जगात ‘टाइम मॅनेजमेण्ट’ या शब्दाइतका रटाळ आणि घिसापिटा विषय दुसरा कुठलाच नाही. प्रत्येकजण या विषयावर बोलतो, तर दुस:याला लेक्चर देतो. अनेकांच्या तर अॅप्रायझलवर पण लिहिलं जातं की, टाइम मॅनजमेण्ट हा विषय कच्चा आहे. 
पण जगभरातला सॉफ्ट स्किलचा अभ्यास सांगतो की, टाइम मॅनजमेण्ट नावाचं सॉफ्ट स्किल्स शंभर टक्के जमलं, उत्तम जमलं. एकदम एक्सलण्ट, अशी माणसं फार दुर्मीळ आहेत. कारण हे स्किलच असं आहे की, कितीही शिका, त्यात चुका होतातच. अपडेट करावंच लागतं.
खरंतर अनेक बाकीच्या गोष्टी उत्तम जमूनही केवळ वेळ व्यवस्थापन जमत नाही म्हणून अनेक माणसं मागे पडतात. त्यांचा परफॉर्मन्स घसरतो. कामांचा बोजा एकदम त्यांच्या मानगुटीवर येऊन बसतो. आणि कामं तुंबली की आपली कशी फजिती होते, किती खोटं बोलावं लागतं, किती लबाडय़ा कराव्या लागतात याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलेला असतोच.
हे जेव्हा आपल्यापुरतं असतं तेव्हा निभावलं जातं, पण आपल्या वेळा न पाळण्यामुळे आपली इमेज हळूहळू घसरायला लागते. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला कामं देत नाहीत आणि आपण उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल लागतं!
जे चटकन जात नाही आणि त्यातून अनेकांना चांगल्या कामाच्या संधी गमवाव्या लागतात. कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत, साचतात, लोकांशी खोटं बोलावं लागतं यातून अनेकजण डिप्रेशनमधे जातात.
असं डिप्रेशन टाळायचं आणि ‘आपलंही असंच होतं’ असं न म्हणता, आपण हे आपल्याठायी नसलेलं स्किल शिकण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. तरच कदाचित आपल्याला वेळा पाळणं आणि वेळा गाठणं जमू शकेल!
 
1) तुम्हाला प्रायॉरिटी ठरवता येते का?
म्हणजे विचारा स्वत:ला की, याक्षणी महत्त्वाचं काय? कुठलं काम तातडीचं, कुठलं कमी तातडीचं, कुठलं शेवटी करता येईल, अजिबात सेण्टी न होता, कोण काय म्हणोल याचा विचार न करता, आपलं काम सोडून इतरांच्या मदतीला न धावता आधी आपल्या कामाची प्रायॉरिटी अर्थात प्राधान्यक्रम ठरवा.
2) आपल्याला मारे वर्ल्डकप जिंकायचा असेल, आपलं लक्ष्य तेच असेल, पण आजची मॅच तर जिंकावी लागेल. म्हणजे आजचा विचार करायला पाहिजे. त्यातही एकूण मॅचचं ओझं डोक्यावर ने घेता, आहे ती ओव्हर, आहे त्या चेंडूवर स्कोअर एवढं तरी आपण ठरवू शकतोच. तसंच तुमच्या कामांचही. म्हणजे काय तर  तुमचे अल्पकालीन ध्येय ठरवा. ती राहू द्या डोक्यात. पण तरीही रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपली आजची कामं काय काय हे कागदावर लिहून काढा आणि त्याची प्रायॉरिटी ठरवा. 
3) हे असं केलं तर कामं डोळ्यासमोर राहतात, विसरलो असं म्हणता येत नाही आणि किती काम झालं हे लक्षात येतं. एकदा ही एका दिवसाची सवय झाली की मग आठवडय़ाचं, महिन्याचं नियोजन करा. करून पहा, तुमची कामं हळूहळू वेळेत पूर्ण व्हायला लागतील.
 4) पण या नियोजनात दोन आपले महत्त्वाचे शत्रू. एक म्हणजे इमेल-इंटरनेट आणि आपला मोबाइल फोन. आपण मारे कामं ठरवतो पण एकदा ऑनलाइन गेलो, एखादा फोन आला की त्यात किती वेळ जातो याचं आपल्याला भानही उरत नाही. त्यावर सोपा उपाय, कामाला सुरुवात करतानाच पाच मिण्टं ईमेल चेक करायच्या, महत्त्वाच्या ईमेल्सना चटकन उत्तर द्यायचं आणि तत्क्षणी लॉगआऊट करायचं. तेच फोनचंही. सायलेण्टवर करून ठेवायचा. दर दोन तासांनी एक मोबाइल ब्रेक घेऊन काही आवश्यक नाही ना, हे तपासता येतं. आलेली प्रत्येक ईमेल आपण लगेच वाचलीच पाहिजे, प्रत्येक एसएमएस, प्रत्येक व्हॉट्स अॅपला लगेच रिप्लाय दिलाच पाहिजे असा काही नियम नाही. तुमचा असेल तर तो तुम्हीच मोडून टका.
5) अनेकजण टाइमटेबलच असं आखतात, इतकं स्वत:ला बांधून घेतात की ऐनवेळची कामं, कामातल्या अडचणी यांना जागाच ठेवत नाहीत आणि असं झालं की सगळं वेळापत्रक कोलमडतं. तसं न करता, दिवसाला ङोपतील तेवढीच कामं अंगावर घ्या.
6)  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मान्य करा की, आपण बोलतो फार पण टाइम मॅनेजमेण्ट आपल्याला जमत नाहीच हे मान्य करून एकेका कामाची वेळ पाळणं, ठरलेली कामं पूर्ण करणं हीच शिकण्याची पहिली पायरी! आपण ती एक पायरी तरी आधी चढूच..