शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

वाटलं ते केलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 08:51 IST

विराटच्या लग्नाचे फोटो आणि जोक्स फॉरवर्ड करताय; पण त्याच्या यशाचा मंत्रही ऐकून घेतलेला बरा !

एवढा मोठा बॅट्समन तू, कितीजण तुला आदर्श मानतात, तुझा खेळ इन्स्पायर करतो त्यांना. तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना तू काय सांगशील?- नव्या मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं या प्रश्नाचा एक उत्तम यॉर्कर विराटला अलीकडेच एका कार्यक्रमात टाकला.विराटनं मात्र त्याच्यावरही सिक्सर ठोकला. तो जे म्हणाला ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे.‘तुम्ही जे करता, जेव्हा केव्हा करता, खेळता, परफॉर्म करता ते मनापासून करायला हवं. इतरांना दाखवायला, काही सिद्ध करायला काही करू नये. आपण जेन्यूइन असावं. जे वाटलं ते करून मोकळं व्हावं. तसं केलं नाही तर मग तुम्ही जे प्रिटेण्ड करता, त्यासाठी इतर लोकही कनेक्ट करू शकत नाहीत. आणि तुम्ही स्वत:ही स्वत:सारखं जगू शकत नाही. मी कधीच कुणाला कॉपी करत नाही. मी जसा आहे, तसा आहे. जे वाटलं ते करतो. पूर्वी लोकांना फार प्रॉब्लेम होते. लोक तक्रार करायचे, मी असाच वागतो, तसाच बोलतो वगैरे. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. जे मनात आलं, ते केलं. मी स्वत:ला बदलायच्या भानगडीत पडलो नाही.मग मी स्वत:त बदल केले नाहीत का?

तर केले. पण जेव्हा मला वाटलं की, अमुक गोष्ट मी बदलायची गरज आहे, तेव्हाच मी ती बदलली. दुसºया कुणासाठी किंवा कुणी म्हणतोय, आपली टिंगल होतेय किंवा टीका होतेय म्हणून स्वत:ला बदललं नाही.सगळ्यांना या प्रक्रियेतून जावं लागतं. आयुष्यात मॅच्युअर होताना, मोठं होताना, वाढताना हे सारं घडतंच. घडावंच लागतं. पण ते करताना कायम हे लक्षातच ठेवायला हवं की स्वत:ला बदलण्याच्या प्रक्रियेत स्वत:ची ओळखच पुसून टाकू नये. कारण तुम्ही कुणा दुसºयासारखं व्हायचा प्रयत्न केला, तसं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला तर कधीच यश मिळत नाही. आणि इतरांना तुमच्यापासून प्रेरणा वगैरे मिळण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.

या एका गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे की, जे आपल्याला वाटतं ते करून मोकळं व्हावं. त्यासाठी ढोर मेहनत करावी. आणि आपण जे करू ते प्रामाणिकपणे मन लावून करावं. मग यश कुठं जाईल !’-विराटचं लग्न, त्याचे ते सारे फोटो, जोक्स हे सारं व्हायरल करताना विराट हे जे म्हणतोय ते सक्सेस मंत्रही नजरेखालून घातलेले बरे !