शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

टॅट्ट - Tired all the time

By admin | Updated: March 11, 2016 12:11 IST

कायम थकवा. सतत अंगदुखी. डोकेदुखी. काही करून पाहण्याचा उत्साह वाटत नाही, कामात मन रमत नाही, उदास वाटतं, मूड जातो. हे सारं कशामुळे होतंय? अनेकांना नेमकं परीक्षेच्या काळातच कसा गाठतो हा प्रचंड थकवा?

ऊन वाढायला लागण्याचा हा काळ. त्यात परीक्षांचा मोसम.

डोक्याला ताप आणि उन्हानं वाढणारा ताप या दोन्ही गोष्टींनी मनावरचा ताण वाढलेला असतो. एक प्रकारचा थकवा जाणवतो. कुणाकुणाचं डोकं दुखतं, कुणाला बॉडी पेन जाणवतो. कुणाला एक प्रकारचा फटीग असतो. आपल्याला बरं नाहीये असं वाटत राहतं. होत तसं काही नसतं, पण उत्साह वाटत नाही. मनावर एक औदासिन्याचा तवंग धरतो. झडझडून काही करावंसंही वाटत नाही.
पण करावं तर लागतंच, कारण कुणाला परीक्षांचा ताण, कुणाला मार्च एण्डचा ताण, तर कुणाला आपल्या धावत्या जीवनशैलीचा ताण आलेला असतो!
मनावरच नाही तर शरीरावरही या थकव्याची पुटं चढतच असतात. आपण कुरकुर करतो की, हल्ली बरंच वाटत नाही. पूर्वी कसा एकदम उत्साह असायचा. आता असं वाटतं की काही करूच नये. पण ऐन परीक्षांच्या काळात आपल्याला असं गळपटायला काय झालंय, नेमकं इतकं थकल्यासारखं का वाटतं आहे आणि ते सतत का वाटतं आहे, याचं उत्तर काही सापडत नाही.
मग घरचे किंवा आपण स्वत:ची समजूत घालतो की, स्ट्रेस वाढलाय, ऊन वाढलंय म्हणून होतं असं कधीकधी! थकल्यासारखं वाटतं, मनावर ताण येतो, दुपारी डुलकी लागते, कितीही झोपलं तरी झोप पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, थकवा जात नाही. 
वाटेल बरं!
दोन चार दिवस कधीमधी असं अति थकल्यासारखं वाटत असेल तर त्यात काळजी करावी असं काही नाही.
पण कायम सतत, चोवीस तास, अनेक दिवस, काही महिने हीच भावना असेल, तर गोष्ट जरा गंभीर आहे, असं म्हणायला हरकत नाही.
जगभरातले अनेक लोक विशेषत: सध्या तरुण-तरुणी या सिण्ड्रोमनं ग्रासलेले आहेत.
ज्याचं नाव आहे, ‘टॅट्ट’! म्हणजे Tired all the time (tatt)
अटलांटा विद्यापीठानं तरुण मुलांसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या विविध सिण्ड्रोममध्ये सध्या जगभरातल्या तरुणांना ग्रासलेला हा एक विचित्र सिण्ड्रोम अर्थात आजाराचं लक्षण आहे. काहीही कष्ट न करता, कुठलाही मोठा दु:खाघात न होता, कुठल्याही गंभीर आजारानं आजारी नसतानाही 20 ते 32 या वयोगटातील अनेक मुलामुलींमध्ये सध्या हे लक्षण आढळतं. या अभ्यासानुसार शंभरात सुमारे 62 जण आपल्याला सतत थकवा येत असल्याची, आळस वाटण्याची, बॉडी फटीग असल्याची, अंगदुखीची तक्रार वारंवार करत असतात. त्यांच्या शरीरावर आणि मनावर थकव्याचे तवंग कायम असतात. त्यामुळे त्यांना झडझडून काही काम करण्याचा उत्साह वाटत नाही. मात्र तरीही ते काम करतात, त्यांचं रुटीन चालू असतं, त्यामुळे आपल्याला आपल्या लाइफस्टाइलचाच स्ट्रेस आहे असं म्हणत ते स्वत:चा स्ट्रेस आणखी वाढवतात. एकाच चक्रात कायम फिरतात.
आणि मग हा सिण्ड्रोम वाढत राहतो आणि मनातली थकव्याची भावना वाढत राहते.
‘टायर्ड ऑल द टाइम’ असं म्हणत छंद, हौशी, भटकंती, प्रवास, इनिशिटिव्ह या गोष्टी मागे पडू लागतात आणि शक्यतो बसल्याजागी काम असं अनेकांचं सुरू होतं.
डॉक्टरांच्या मते, हा आजार लाइफस्टाइलचा तर आहेच, पण लाइफस्टाइल बदलूनही जर या लक्षणात काही फरक दिसत नसेल तर मग तब्येतीत अंतर्गत काही बिघाड झालेला आहे का? आणि त्या आजाराची लक्षणं म्हणून हा कायमस्वरूपीचा थकवा जाणवतो आहे का हे तपासून पाहायला हवं!
मात्र ते करण्यापूर्वी आपली लाइफस्टाइल कशी आहे, आणि त्यातून थकवा शरीरात भिनतो आहे का, हे पाहून निदान सलग दोन आठवडे तरी आपली जीवनशैली बदलून शरीराला उत्साहाचं टॉनिक पाजायला हवं. आणि ते करूनही जर थकवा गेला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा!
जीवनशैली, आजार आणि थकवा याचा एकमेकांशी संबंध असतो.
काही जीवनशैलीविषयक गोष्टी स्वत:शी तपासून पाहिल्या तर सततच्या थकव्याची कारणं लक्षात येऊ शकतात.
 
 
झोपेचं त्रांगडं OSA
 
आपण किती झोपतो आणि किती शांत झोपतो याचा आपल्या तब्येतीशी संबंध आहे, याचा आपण सहसा विचार करत नाही.
रात्र रात्र जागणं, रोज उशिरा झोपणं, उशिरा उठणं याचा आपल्या शरीरचक्रावर परिणाम होतोच; त्यातून झोप बिघडली तर ते चक्र अजूनच बिघडतं.
या लक्षणाला म्हणतात obstructive sleep apnoea. बिघडलेल्या झोपेची आणि त्यामुळे बिघडलेल्या तब्येतीची ही काही लक्षणं सांगता येतात. अर्थात ही लक्षणं तशी कॉमन आहेत. त्यामुळे आपली झोपेची तक्रार असेल तर वैद्यकीय सल्लाच घेतलेला बरा.
 
1) घोरणं. अनेकजण झोपेत घोरायला लागतात आणि आपण घोरतो हे ते मान्य करत नाहीत.
2) रात्री लघवीला लागणं आणि एकदोनदा उठावं लागणं.
3) सकाळी जाग आल्यावर ताजतवानं न वाटता उदास, अंग जड झाल्यासारखं वाटणं.
4) दुपारीच कशाला कधीही खूप झोप आल्यासारखं वाटणं, जांभया येणं, डुलकी लागणं.
5) कामात लक्ष नसणं, अभ्यासात लक्ष नसणं, लक्षात कमी राहणं.
6) सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखणं.
7) सतत मूड स्विंग्ज होणं.
8) उदास वाटणं, सतत मूड जाणं.
9) धाप लागणं, श्वास फुलणं.
 
थकवा आलाय, लाइफस्टाइल कशी आहे तुमची?
 
1) उशिरा उठता?
रोज सकाळी सूर्योदयानंतरच उठता तुम्ही? आठ-नऊ-दहा वाजता उठता? त्यानंतर चहा पिता? मग कधीतरी जेवता? उशिरा उठल्यानं खाणंपिणं-झोप यांचं चक्रच बदलतं, आणि ते सतत बदलत गेल्यानंही सतत थकवा जाणवतो. त्यात दिवसभराची कामं तुबंतात, उशीर होतो, त्यानं स्ट्रेस वाढतो. काहीजण रात्री अभ्यास करून सकाळी उशिरा उठतात, त्यानंही थकवा जाणवतो.
रोज सूर्योदयापूर्वी उठणं हा एक नियम करून पाहायला हवा.
 
2) व्यायाम नाहीच?
उशिरा उठता त्यामुळे सकाळी व्यायामाचा प्रश्नच नाही. दिवसभरातही तो कधी करत नाही.
त्यामुळेही थकवा जात नाही. जड होतं सगळं शरीर. त्यामुळे निदान रोज वीस मिनिटं व्यायाम, सूर्यनमस्कार, सायकलिंग, ब्रिस्क वॉकिंग, जॉगिंग एवढं तरी करायला हवंच!
 
3) वाढलेलं वजन
वजन वाढणं हेदेखील थकल्यासारखं वाटण्याचं एक कारण आहे. वजन सतत वाढत असेल तर डाएट, व्यायाम या दोन गोष्टी तातडीनं करायला हव्यात.
 
4) कमी पाणी पिणं
गोष्ट तशी क्षुल्लक वाटते वरकरणी, पण महत्त्वाची आहे. कमी पाणी प्याल्यानं शरीर डिडायड्रेट होतं. शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. रक्त कमी पातळ होतं, त्यानंही सगळ्या अवयवयांना होणा:या रक्तपुरवठय़ावर परिणाम होतो. शरीराला थकवा जाणवतो.
त्यामुळे पाणी भरपूर प्या. काहीजण पाणी प्यायचंच विसरून जातात. त्यांनी चक्क स्मार्टफोनवर पाणी पिण्याची आठवण करणारे रिमाइण्डर लावणं योग्य.
 
5) डोळ्यासमोर सतत स्क्रीन
डोळ्यासमोर सतत कुठला ना कुठला स्क्रीन असणं, चोवीस तास ऑनलाइन, झोपतानाही डोळ्यासमोर मोबाइलचा स्क्रीन यामुळेही शरीर आणि मनाचा थकवा वाढतो. मेंदूवर आपण सतत कसला ना कसला भडिमार करत राहतो. त्यानं मनाचा आणि पर्यायानं शरीराचाही फटीग वाढतो. टॅट्टनी पछाडलेले अनेकजण या स्क्रीनचे बळी असतात, असं अनेक अभ्यासक सांगत आहेत.
निदान झोपण्यापूर्वी किमान दोन तास तरी आपल्या डोळ्यासमोर कुठलाही स्क्रीन असता कामा नये. त्याऐवजी गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं असे पर्याय शोधता येऊ शकतात.
 
सतत थकवा, आपण आजारी तर नाही?
 
‘चेहरा का असा थकल्यासारखा दिसतोय, आजारी आहेस का?’
- असा प्रश्न विचारला की, अनेकजण सांगतात, काही नाही रे, जरा थकवा आलाय, धावपळ आहे इतकंच. आजारबिजार काही नाही. चांगला ठणठणीत आहे.
मात्र चोवीस तास, कायम थकवा जाणवत असेल तर खरंच आपण आजारी नाही ना, याची एकदा खात्री करून घ्यायला हवी.
कारण हा थकवा कुठल्या ना कुठल्या आजाराचं, कमतरतेचंही लक्षण असू शकतो.
 
1) अॅनिमिया
भारतीय उपखंडातच मुली आणि महिलांमध्ये हा आजार मोठय़ा प्रमाणात आढळतो. अॅनिमिया. रक्तात लोहाचं प्रमाण कमी असणं, हिमोग्लोबिन कमी असणं ही कमतरता आपल्याकडे अनेक मुलींना जाणवते. त्याचा थेट संबंध आपल्या खाण्यापिण्याशी आहेच. त्यामुळे अनेक जणींना अॅनिमियाचा, अशक्तपणाचा त्रस होत असतो. अगदी वरकरणी धष्टपुष्ट दिसणा:या मुलीही अॅनिमिक असू शकतात.
त्यामुळे आपल्यात लोहाची कमतरता तर नाही ना, हे तपासून पाहायला हवं.
 
2) डिप्रेशन
शरीराचे आजारच जिथं आपल्याकडे लवकर मान्य केले जात नाहीत, त्यावर पटकन उपचार केले जात नाहीत तिथं मनाच्या आजारांकडे कोण लक्ष देणार?
मात्र स्ट्रेस, डिप्रेशन, शरीरात विविध व्हिटॅमिन्सची कमतरता याचा परस्पर संबंध असतो. ज्यांना डिप्रेशनचा आजार आहे, मनावर औदासिन्याचं मळभ आहे, त्यातून स्वत:चं स्वत:ला बाहेर पडता येत नाहीये अशा सगळ्यांना सतत अतीव थकवा जाणवतो. आपल्याला डिप्रेशन आहे हे ते मान्यच करत नाहीत, हा भाग वेगळा. त्यामुळे आपल्याला मनातल्या मनात काही खातंय का? कसला त्रस आहे का हे तपासून पाहिलं पाहिजे. डिप्रेशनचा आजार असेल तर त्यावर योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. त्यात कसलाही कमीपणा नाही, हेदेखील स्वत:ला सांगायला हवं! डिप्रेशन यशाच्या कालखंडातसुद्धा येऊ शकतं, हे अलीकडेच दीपिका पदुकोनने पण जगजाहीर सांगितलं आहेच.
 
3) मधुमेह
अत्यंत तरुणपणातच बीपी आणि मधुमेहाचा त्रस सुरू होणं हे जीवनशैलीचे आजार आपल्याहीकडे आता अनेकांना पंचविशीतच गाठत आहेत. त्यामुळे नियमित आपली शुगर तपासून घेण्यात काही तोटा नाही. त्याकडे लक्ष ठेवायला हवं. मुख्य म्हणजे शुगरचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणून ते फेकून न देता, जपून ठेवायला हवेत. म्हणजे पाच वर्षात त्यात काही बदल आहे का हे पुढे तपासून पाहता येतं. त्यामुळे मधुमेहाची चाचणी महत्त्वाची!
 
4) हाडांची झीज
व्हिटॅमिन डीची कमतरता हा आणखी एक नवीन आजार आता तारुण्यातच वाटय़ाला येत आहे. त्यामुळे बी 12, व्हिटॅमिन डीच्या चाचण्या, सांधेदुखीची चाचणी, आर्थरायटिसची चाचणी हे सारं डॉक्टरांच्या सल्ल्यानं करायला हवं. आपल्या अंगदुखीची कारणंही शोधायला हवीत.
 
5) झोपेचे विकार
सततच्या थकव्याचं कारण बदललेली झोप हेदेखील असू शकतं. म्हणजे काय तर अनेकांना रात्री लवकर झोपच लागत नाही किंवा अजिबातच झोप लागत नाही. एकदा जाग आली की पुन्हा झोप येत नाही. कितीही झोपलं तरी झोप लागली होती असं वाटत नाही. डोकेदुखी, मसल्स आणि सांध्याचं दुखणं, अशक्तपणा, पायात पेटके येणं, कामात लक्षच न लागणं हे सगळं या झोपेच्या विकाराशी संबंधित असू शकतं. त्यामुळे आपल्या झोपेकडेही लक्ष ठेवून त्यासंदर्भातही वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा!