शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

टंगळमंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 04:10 IST

आपली कामं आपण कुणाच्या तरी धक्क्याला पार्क करून ठेवतो. वेळ काढतो, दोष देतो, कारणं सांगतो. पण कामं करत नाही.

- प्राची पाठक

आपली कामं आपण कुणाच्या तरीधक्क्याला पार्क करून ठेवतो.वेळ काढतो, दोष देतो,कारणं सांगतो.पण कामं करत नाही.का?आणि मग आपल्यालाकाय झेपणार नाही,हे आपणच ठरवूनकामांची ढकलगाडी करतो.‘हो, हो... करेन. जरा लक्ष द्यावे लागेल... पण करेन’..असं काही कामांबाबत आपल्याला वाटत असतं. कधी खरोखर ते काम करायला वेळ नसतो. कधी प्रायोरिटी वेगळी असते. कधी वाटतं, ते काम स्पेशल आहे. जरा नीट वेळ देऊन, नीट लक्ष देऊन केलं पाहिजे. ज्या कामाला आपण स्पेशल दर्जा देऊन टाकतो, तेच काम मग लांबणीवर पडत जातं. होईल- करू- बघू चक्र सुरू होतं. त्या कामाला एकतर आपल्याला अजून थोडं समजून घ्यायचं असतं किंवा काहीतरी गाळलेली जागा भरायची असते आणि मग ते होणार असतं. किंवा आपल्या हातात थेट नसलेल्या अजून एखाद्या गोष्टीवर ते अवलंबून असतं. कधीही करू, आपल्याच हातात आहे, असाही काही कामांबाबत अति आत्मविश्वास असतो. असे वेगवेगळे कॉम्बो एकत्र काम करतात आणि ते काम नाही तर नाहीच होत.दरवेळी अशीच परिस्थिती असते, असं नाही. अनेकदा अनेक गोष्टी आपण टाळतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला करता येणार नाहीत, असंही आत कुठेतरी वाटत असतं. आपल्याला काय झेपेल आणि काय झेपणार नाही, याचे पक्के ग्रह होऊन गेलेले असतात. ‘नकोच बाबा ते’, अशी पक्की हाक मनाने दिलेली असते. कधी आपल्या आजूबाजूच्या वातावरणानंदेखील हे आपलं काम नाही, असे आपल्यावर बिंबवलेलं असतं. ‘एवढे मोठे झालात, तरी हे कळत नाही’, असं वाक्य कुठूनही अंगावर येऊन आदळू शकतं. त्यामुळे, इतके मोठे झालो, तरी एखादी बेसिक गोष्ट आपल्याला कळलेली नाहीये, हे विचारायची सोयच राहात नाही. जणू काही अमुक वय झालं की तमुक गोष्टी आपोआप डोक्याच्या हार्ड डिस्कमध्ये इन्स्टॉल होऊन अ‍ॅक्टिव्हेट होतात. एखादी गोष्ट नीट माहीत करून घ्यायची सोय राहिली नाही की नेटवर आपण काहीतरी शोधतो. तिथली माहिती त्या-त्या गोष्टींचे सर्व पैलू मांडेलच, आपल्या संदर्भात ती माहिती लागू होईलच, असं नसतं. काय आपल्याला लागू होतं आणि काय लागू होत नाही, हेही माहीत नसतं. फार खोलात कोण जाणार? मग त्यापेक्षा ते काम टाळलेलं उत्तम, असा शॉर्टकट मनात घेतला जातो. मनालादेखील त्याची ऊर्जा वाचवायची असते.एक विचार करू.चालत अर्धा किलोमीटर जाऊन चार फेºया करून एखादी गोष्ट आणणं हे काम आहे.सायकलवर अर्धा किलोमीटर जाऊन चार फेºया करून एखादी गोष्ट आणणं असंही ते होऊ शकतं.स्कूटीवर अर्धा किलोमीटर जाऊन दोन फेºयांमध्ये एक काम करणं आणि आपल्याकडे गाडी आहे यार, एकदम आणून टाकू ती गोष्ट, चार फेºया करायची आपल्याला गरज नाही, असं मनाला सांगत राहणं.हे टप्पे इमॅजिन करा.यात आपण चालायची क्षमता, सायकल, स्कूटी, कार या सर्वांची उपलब्धता गृहीत धरली आहे. आपण गेलो आणि ती गोष्ट मिळाली, हेदेखील गृहीत धरलं आहे. तिथे आपण कुणाला पाठवणार नसून आपणच जाणार आहोत, हेही लक्षात घेतलेलं आहे. आपण तिथं सुखरूप जाणार आहोत, निवडलेल्या पर्यायाने नीटच पोहोचणार आहोत, वाटेत काहीही अडचणी येणार नाहीत, हेही सगळं गृहीत धरलेलं आहे. आपल्याला अमुक गोष्ट अर्ध्या किलोमीटरवरून आणण्याची गरज आहे, हे पक्कं केलेलं आहे.इथेच आता सायकल कुणाकडे मागून ते काम होणार आहे, हा टप्पा गृहीत धरा. मग आपण मनात त्याचंच गणित मांडून बसतो. त्यानं आपल्याला सायकल दिली, तर ते काम होईल. ‘आपलं काम का होत नाही, तर ते करायला सायकल लागते. ती सायकल तो अमुक-ढमुक आपल्याला देत नाही.’सगळं एकदम सोपं होतं मग. सगळा फोकस त्याच्यावर. त्याच्या आयुष्यात काय बरं वाईट आहे, त्यातून काय मिळवलं थोडा वेळ का होईना, तर आपलं काम होईल, हे मन शोधत राहतं. ते तसंच पूर्ण होत नाही, तोवर ते काम लटकून राहतं. हे काम आपलं आपण करू शकतो, ही शक्यताच आपण गृहीत धरत नाही. आपण अजून काही आयडिया लढवून ही जी चार फेºया मारायची मेहनत होणार आहे, ती कमी करू शकू का यावर विचार होणं तर दूरच राहते. ‘करू-करू’च्या चक्र ात ते काम अडकून पडतं. या-या गोष्टी नसतील, तर अमुक काम होणारच नाही, असंही आपल्या मनात घट्ट बसतं अनेकदा. म्हणून पण आपण ते काम करायला धजावत नाही. आपल्याला कोणीतरी रस्ता दाखवला, तरच आपण ते करू शकू, नाहीतर आपल्याकडून ते काम होणं नाही असा ग्रह होतो. नुसता रस्ता दाखवून भागत नसतं. आपल्याला त्या रस्त्याने जातानादेखील समोरच्याने साथ दिलेली, गाणी म्हटलेली, त्या रस्त्यात खड्डे नाहीत ना याची सोय करून दिलेली हवी असते. इतके परावलंबित्व आलं की ते काम करायचं थ्रिलच निघून जातं. काम करण्यापेक्षा ते किती खुबीने टाळलं, हे आपल्याला महत्त्वाचं होऊन जातं. मग अगदीच हातातोंडाशी आल्याशिवाय आणि तशी गरज असल्याशिवाय आपण ते काम करत नाही.आपल्या कुवतीचे कुंपण पुरेशी जाण नसताना स्वत:भोवती आखून घेतलं की तेच कुंपण आपल्याला स्वत:हून काही करण्यापासून रोखतं. ‘हो, हो करेन’ वर ते गाडं अडतं मग.हे टप्पे समजून घेणं हीच आपली काम मार्गी लागायची पहिली पायरी असते!करूयात यादी, आपल्या अडलेल्या कामांची. शोधू जरा की कोणाकोणाच्या धक्क्याला आपण ती कामं नेऊन पार्क करून ठेवली आहेत. मगच ती कामं मार्गी लावायचा रस्ता दिसू लागेल.