शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

भिजल्या प्राजक्ताची शपथ.!

By admin | Updated: August 1, 2014 11:41 IST

मी प्रत्येक पावसाळ्यात तुझी वाट पाहतो. जूनच्या काठावर बसून राहतो. मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारतो अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठी भांडत राहतो.

 
मी प्रत्येक पावसाळ्यात तुझी वाट पाहतो. जूनच्या काठावर बसून राहतो. मी सगळ्या ढगांना तुझं नाव विचारतो अन् सगळ्या विजांशी तुझ्यासाठी भांडत राहतो. मागतो तुझ्या ओल्याचिंब हातांतल्या हिरव्या काकणांचं थोडं हिरवंपण माझ्यासाठी. पण मला दिसतं तुझ्या पूल ओलांडणार्‍या पावलांना मंदिराची ओढ; तुझं नदीच्या पाण्यासारखं खोल मन;  मी काय आणि कसा गाठणार तुला? दुथडी भरून वाहणार्‍या नदीत हेलकावणार्‍या ओंडक्यासारखा मी अन् पहाडावर उगवलेल्या नाजूक पिवळ्या फुलासारखी तू, आणि आता तर आपण एकमेकांचे कोणीच नसतानाही, तो आहेच, जो पूर्वी आपल्यात होता.आपला पाऊस!
कधी तरी दुपारीच काळोखून येते. रानभर नुस्ती कालवाकालव होते अन् जांभळीच्या झाडावर पुन्हा तुझं नाव उमटून जातं. कधी कधी सकाळीच मी नदीकाठच्या करवंदीच्या बेटात; करवंदीचे काटे टोचतात बोटांना अन् रक्तातून तुझी कविता वाहून जाते. एखादा दिवस एवढा उदास का उगवतो याचं उत्तर न विचारताही मिळृून जातं मला! तू मला भर पावसात दिलेल्या प्राजक्ताच्या फुलांची शपथ, मी फुलांचा गंध आणि तुझा सुगंध अजूनही काळजात जपून ठेवला आहे.
आता तुझ्याशिवाय पाऊस. मी डोळे पुसतो माझे अन् खिडकीतून त्याला पाहत राहतो. जुना पाऊस कधी कधी मलाही खूप आठवतो. भर पावसात आपण स्टेशनवर प्यालेला चहा. तुझ्या केसातून ओघळणारं पाणी. आता त्याच आठवणींच्या भरवशावर मी हा पाऊस पाहतोय. तू कुठं का असेना, सुखात आहेस एवढीच गोष्ट पुरेशी आहे मला जगण्यासाठी; पण यापुढचे पावसाळे सोबत जगता येणार नाही हे समजायला वेळ लागतोय मला.
उगाचच कधी कधी खूप पाऊस पडतो आणि उगाचच कधी कधी रडू येते. तू पावसाच्या बरसण्याचं आणि माझ्या रडण्याचं कारण नको विचारूस. तू पावसाच्या वाहण्याला अन् माझ्या रितं होत जाण्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर जमल्यास. तू दुरस्थ झाल्यानंतर आणखी जवळ आलेला पाऊस, आता माझ्यापासून दुरावू नये अशी प्रार्थना मी करतो. तुझ्या बोटांचे ठसे उमटलेल्या छत्रीला तळघरात नेऊन ठेवतो आणि मुसळधार पावसात रस्त्यावर न जाता तळघरालाच तुझी कविता ऐकवतो.!
पुन्हा पुन्हा भेटत राहणारा पाऊस, पुन्हा पुन्हा येणारा तुझ्या आठवांचा पूर; पुन्हा दु:खाच्या होड्या आठवांच्या नदीत, पुन्हा भिजून चिंब होणारे किनारे, मनाच्या काठावरची वाहून जाणारी वाळू, कोसळणारे धीरांचे कडे, पुरांमुळे वाकून गेलेल्या नदीच्या बाभळीसारखे माझे दिवस, पुन्हा जगण्याचा खडक निसरडा, शेवाळलेला! आयुष्याचा तळ उखडलेला, गढुळलेला..! पुन्हा पावसाचं काळजात उतरणं, रक्तात मिसळणं, धमण्यांतून वाहणं. पुन्हा मला गावाबाहेरच्या पुलावर घेऊन जाणं. पुन्हा तुझ्या ओल्या पावलांची मंदिराच्या पायर्‍यांजवळ वाट पाहणं..!
 आपले पावसाळे असं एकमेकांशी अनोळखे होतील असं तुला कधी वाटलं होतं का? पण फक्त एकच सांग, एकदा कोसळायला लागल्यावर न थांबणारा पाऊस, एकदा वाहायला लागल्यावर कुणालाच न जुमानणारी नदी आणि एकदा निरोप दिल्यानंतर एकदाही पाठीमागे वळून न पाहणारी तू..
यापैकी सगळ्यात जास्त काय खरं होतं..!
- अरुण सीताराम तीनगोटे, 
ढाकेफळ, ता. पैठण (औरंगाबाद)