शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

इथं संघर्ष अटळ आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:56 IST

पुण्यात आलो. फसलो, फसवलो गेलो, पण मागे हटलो नाही.

ठळक मुद्देनवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.

- महेश रणमाळे

मी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोर्‍हाळे या छोटय़ाशा गावचा. परिस्थिती खूपच हालाखीची. जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आईबाबांसोबत गहू विकायला जायचो, नाशिकला. रस्त्यावर उभं राहून गहू विकायचो, रात्री तिथंच झोपायचो. अशा परिस्थितीत शिकलो. दहावी झालो.वडिलांना वाटायचं, मुलगा मोठा झाला. हाताशी आला. पण आईला वाटायचं मुलानं शिकावं. आपल्यासारखी वेळ त्याच्यावर यायला नको. तिनं मला अहमदनगरला मामाकडे शिकायला पाठवलं. मामाच्या गावी, हॉस्टेलवर राहून डिप्लोमा पूर्ण केला. तिथं आजीनं व मोठय़ा मामानं मला फार जीव लावला. नंतर मी लोणीला जाऊन इंजिनिअरिंग केलं. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झालो. इकडे बहिणीच्या लग्नासाठी वडिलांना होतं ते शेतही विकावं लागलं.इंजिनिअर झाल्यावर मी पुण्यात आलो नोकरीच्या शोधात. 2008 साल. सगळीकडे जागतिक मंदीची चर्चा. खूप प्रयत्न करून एक जॉब मिळाला. पुढं लग्न झालं. बरं चाललं होतं. त्याच काळात एका मित्रानं सांगितलं तुला विदेशात नोकरी मिळवून देतो. खूप आशेला लावलं. इण्टरव्ह्यूपण अरेंज करून दिला. निवड झाली. मी हातातला जॉब सोडला. आणि मग कळलं की, तो मित्रच खोटा होता. त्यानं मला फसवलं होतं. फार वाईट वाटलं; पण पुन्हा नोकरीच्या शोधात प्रयत्न केले. वाईट दिवस असे अनुभव देऊन गेले. आता मी एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत उत्तम पदावर काम करतो. कामानिमित्त विदेश दौरापण करून आलो. आता पुण्यात स्थिरावलोय. पुण्यासारख्या शहरात आपलं घर व्हावं हे स्वप्न मनात आहे. पूर्वी एकटा होतो आता या संघर्षात माझी पत्नी अर्चना उत्तम साथ देते आहे.मी हा लेख लिहिला कारण माझा अनुभव म्हणतो की, नवीन जागा, नवीन शहर, नवीन माणसं आपल्याला भेटतात. चांगलं-वाईट कळतं, दिसतं, अनुभवायला येतं.  आपल्याला भेटणारे सगळेच लोक चांगले असतात असं नाही. त्यात आपण एका छोटय़ा खेडय़ातून आलेलो असतो. साधे असतो. त्याचा लोक फायदा घेतात. कुठलाही निर्णय घेणं ही परीक्षा आहे. आता मी एकच सांगतो, कुठलाही निर्णय मोठय़ा शहरात विचारपूर्वक घ्या. मोठय़ा शहरात कोण फसवणूक करेल सांगता येत नाही. आणि तसं झालं तरी आपण आपला संघर्ष आणि मेहनत सोडायची नाही.