शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

पुण्यात बेघर झालेली तरणी पोरं का म्हणतात, शिकायचं नाही, जगायचं आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 16:55 IST

पुणं. या एकाच शहरातलं एक दुसरं जग आहे. एकीकडे पुणं विद्येचं माहेरघर, आयटीचा चकचकाट. दुसरीकडे कालवा फुटल्यानं बेघर झालेली तरणी पोरं. त्यांची शाळा कधीच सुटली होती आता हातचं कामंही सुटलं. पुण्यात कालवा फुटल्यानंतर बेघर झालेल्या तरुण मुलांशी एक संवाद

ठळक मुद्देशिका म्हटलं की तेच सांगतात, शिकू की जगू, तुम्हीच सांगा !

- राहुल गायकवाड

झाडांच्या सान्निध्यात, आल्हाददायक वातावरण असलेल्या तीन मजली, रेखीव, सर्वसुविधांनी युक्त, पार्किगसाठी खास सोय असलेल्या मराठीच्या शब्दकोशातून शोधून काढलेत की काय अशी नावं असलेल्या सदाशिव पेठेतील इमारती. या इमारतीमधील प्रत्येकजण हा कोणी डॉक्टर, इंजिनिअर नाहीतर कोणी चार्टर्ड अकाउण्टण्ट. त्यांच्या मुलांच्याही अशाच काहीशा महत्त्वकांक्षा. या इमारतींच्या समोरच्या रस्त्याच्या पलीकडून वाहणारा सांडपाण्याचा अंबील ओढा. त्याच्या शेजारी दहा बाय दहाच्या खोल्यांची दांडेकर पूल वसाहत. घरात कोणी खोकलं तर त्याचा आवाज शेजारच्या घरात जाईल अशी इथली परिस्थिती. इथलं कोणी महापालिकेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतं तर कोणी कपडय़ाच्या दुकानात काम करतं. त्यांच्या मुलांना कुठे छोटं-मोठं काम मिळावं एवढीच त्यांची महत्त्वकांक्षा..27 सप्टेंबर 2018. हा दिवस या दांडेकर पूल वसाहतीत राहणार्‍या मुलांच्या मनात कायम कोरला गेला आहे. मुठा कालवा फुटून त्याचं पाणी या वसाहतीत शिरलं आणि अनेक घरांचं होत्याचं नव्हतं झालं. शेकडो कुटुंब रस्त्यावर आली. आधीच आयुष्यात अठराविसे दारिद्रय़. त्यात हे ओढवलेलं संकट. इथले तरु ण कुठे कपडय़ांच्या दुकानात नोकरी करत होते तर कोणी मेडिकलची औषधांची डिलिव्हरी करण्याचं काम करत होते. मुठा कालवा फुटून घर वाहून गेल्यानं कामाला आठवडाभर दांडी झाली. एकीकडे घर तर गेलंच दुसरीकडे नोकरीसुद्धा गेली. आता फक्त उजाड घराकडे बघत बसण्याशिवाय कुठला पर्याय त्यांच्याजवळ उरला नाही.इथल्या अनेक तरुणांशी, शाळेत जाणार्‍या मुलांशी बोलायला गेलं की, कळतात अशा अनेक कहाण्या. कालवा दुर्घटनेनंतर त्यांचं आयुष्य बदललं खरं; पण जो बदल झाला तो त्यांच्यासाठी काही नवा नव्हता. आला दिवस पुढे ढकलत फक्त जगत राहायचं एवढंच त्यांना माहीत. त्यांच्या फारशा महत्त्वकांक्षा नाहीत. यातील अनेक तरुण हे त्यांच्या घरातील थोडंफार शिकलेली एकमेव व्यक्ती आहेत. मात्र आता त्यापैकी अनेकांचा शिक्षणावर विश्वास राहिला नाही. शिकून काय होणार आमची परिस्थिती बदलणार थोडीच आहे? असाच एखादा तक्रारसूर बोलता बोलता पुढं येतो, कुठं चार-पाच हजारांची नोकरी करायची अन् कुटुंबाला हातभार लावायचा एवढंच त्यांना महत्त्वाचं वाटतं. मोठय़ा घरात राहायला जायला आवडेल का? असं विचारल्यावर त्यांचं उत्तर हो असतं; पण पुढे जाऊन काय शिकायचं? असं विचारल्यावर शिकायला नाय आवडत असंच ते सांगतात. सर्वशिक्षा अभियान, रात्न शाळा, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजना त्यांना माहीतच नाहीत. शिकल्यानं आपली प्रगती होईल, आपल्याला चांगली नोकरी लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत हे तर अनेकांसाठी एक स्वप्नच आहे.रितेश माने. 16 वर्षाचा त्यानं नववीत शाळा सोडली. त्यानं शाळा सोडल्याचं त्याच्या घरच्यांना फारसं नवलं वाटलं नाही, उलट त्यांच्यासाठी एकप्रकारे बरंच झालं. रितेश डेक्कन येथील एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करतो. त्यानं शाळा का सोडली, हे विचारल्यावर शाळा शिकायला आवडत नाही असं तो म्हणाला. आयुष्यात पुढे काय करणार? असं विचारल्यावर म्हणाला, कुठंतरी एखादी जास्त पगाराची नोकरी मिळवायची एवढंच तो सांगतो. इथलाच संकेत भोसले. दहावीर्पयत शिकलाय. त्याला पुढे जाऊन गणपतीत गाणी वाजवणारा डीजे व्हायचंय. पुढं जाऊन फारसं शिकायची मात्र त्याची इच्छा नाही. अजय चवतमाळ. त्याला पोलीस व्हायचंय त्यासाठी कष्ट घेण्याची त्याची तयारी आहे; परंतु योग्य मार्गदर्शन करणारं कोणी मिळालं नाही तर काय हा प्रश्न त्याला छळतोय. पोलीस होण्यासाठी काय करावं लागतं हेच त्याला माहीत नाही. घरात एकटाच इतका शिकलाय त्यामुळे घरच्यांना शिक्षणातलं काहीच माहीत नाही.

इथला सौरभ गायकवाड सध्या अकरावीला आहे. सौरभ मेडिकलच्या औषधांची डिलिव्हरी करण्याचे काम करायचा. मुठा कालवा दुर्घटनेमुळे जॉबला काही दिवस जाता आलं नाही, त्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आलं. एका रेडिओच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करणार्‍या आकाश कांबळेलासुद्धा याच कारणानं काम सोडावं लागलं. गेला महिनाभर हे तरुण वसाहतीतल्या कट्टय़ावर बसून राहण्यापलीकडे काहीही करत नाहीत. त्यांच्यात काही करण्याची इच्छा नाही किंवा धमक नाही का? तर असं काही नाही. ती आहेच.

पण करायचं काय नि कसं हे सांगणारं कुणी नाही. ज्या वस्तीत राहतात त्या वस्तीत फारसं कोणी शिकलं नाही. त्यामुळे कुठेतरी ऑफिस बॉय, डिलिव्हरी बॉय, कपडय़ांच्या दुकानात काम करायचं इतकंच काय ते यांचं करिअर. त्यातही कालवा फुटल्यासारखी एखादी आपत्ती आल्यानंतर कामावर पाणी सोडणं आलंच. इथल्या प्रत्येक तरुणाचे चेहरे सारखेच वाटतात. निर्विकार ! शहरातल्या काचेच्या इमारती, झगमगाट, मॉल्स ते पाहतात; परंतु त्यांच्यासाठी या गोष्टी म्हणजे एकाच शहरातलं दुसरं जग आहे. ज्या जगात त्यांना प्रवेश नाही. ज्या जगात राहण्याची त्यांची ऐपत नाही. ओढय़ाच्या पलीकडच्या पेठांमध्ये आठवडय़ाला करिअर काउन्सिलिंगचे सेमिनार होत असतात, तर ओढय़ाच्या या बाजूला करिअर म्हणजे नेमकं  काय? हाच प्रश्न पडलेला असतो. पुण्यातल्या अनेक नाक्यांवर पाहिलं तर या तरुणांसारखे शेकडो तरु ण उभे असतात. दुष्काळ आणि गरिबी पाचवीला पुजलेली असताना करिअरचा विचार तो कोण करणार? छोट छोटय़ा गावांमधील, वस्त्यांमधील तरुणांची पावलं शहरामध्ये मजुरीच्या शोधात फिरत असतात.  शिक्षणावरील विश्वास उडालेले अनेक रितेश शहरांमध्ये फिरतायेत. त्यांच्यासाठी करिअरपेक्षा जिवंत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आमच्याकडे शिक्षण आहे; पण ते शिक्षण का घ्यायचं याचं उत्तर नाही. ही पोरं म्हणतात, शिक्षणापेक्षा जिवंत राहणं महत्त्वाचं.त्यावेळी काय समजवणार त्यांना?