शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
4
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
5
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
6
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
7
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
8
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
9
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
10
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
11
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
12
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
13
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
14
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
15
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
16
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
17
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
18
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
19
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
20
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना

तुम्हाला गोड बोलता येत नाही? - मग करिअर खल्लास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:17 IST

आपलं काम हसतमुख चेहर्‍यानं, प्रेमानं करणं हे स्किल आहे, दुसर्‍याच्या भावना समजणं हे तर उत्तम कौशल्यच. ते नसेल तर नुस्त्या हुशारीला काय अर्थ?

ठळक मुद्देआयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!

डॉ. भुषण केळकर 

प्रॉजेक्ट ऑक्सिजन आणि नंतर प्रॉजेक्ट अ‍ॅरिस्टॉटलमध्ये आपण बघितलं की मानवी भावभावना समजणं आणि समवेदना (एम्पथी) असणं ही अत्यंत महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स आहेत. कालच त्याची तोंडओळख झाली इकडे लंडनला आल्यावर!अमेरिका दौरा आटपून भारतात परतण्यापूर्वी काल लंडनला काही कामानिमित्त उतरलो आणि तेथील सुप्रसिद्ध टय़ूब म्हणजे अण्डरग्राउण्ड रेल्वेमधून 2 जड बॅग्ज घेऊन जायच्या होत्या. एका माणसाला अवघड होतं; पण माझ्याबरोबरच्या असणार्‍या एका मित्राला तिकीट नसताना प्लॅटफॉर्मर्पयत तिथल्या सुरक्षारक्षकाने येऊ दिलं आणि त्याला थँक्स म्हटल्यावर त्याचं उत्तर होतं की ‘त्यात काय विशेष, माझं कामच तुमचा प्रवास सुकर करण्याचं आहे’!गोष्ट छोटी आहे, पण मला वाटून गेलं की आपल्या देशाच्या इतिहासातला दुर्दैवी परकीय सत्तेचा कालखंड असला तरीही, ‘गोरा साहेब’ भारतावरच नाही तर जगावर राज्य करून गेला कारण बहुदा युद्ध साहित्याच्या हार्ड स्किल्सबरोबर, जाऊ तिथल्या जनतेची नस ओळखून त्याची बलस्थान अन् कमतरता ओळखून बरोबर सॉफ्ट स्किल्स वापरू शकला! आपल्याला असल्या कुठल्याही कृष्णकृत्यासाठी नको असली तरीही सॉफ्ट स्किल्स मात्र हवी आहेत, बरं का! असो!पुढे लेस्टर या गावी गेलो होतो. माझी एक मैत्रीण तिथे डॉक्टर आहे. तिनं सांगितलं की, 10-15 वर्षापूर्वी तेथील हॉस्पिटल्समध्ये दरवर्षी एकूण 20 मॉडय़ूल शिकवली जायची. त्यात 17 मॉडय़ूल ही वैद्यकीय ज्ञानाची आणि 3 ही सॉफ्ट स्किल्सची असायची. आता मात्र 15 सॉफ्ट स्किल्स आणि 5 ही वैद्यकीय ज्ञानाची आहेत!! त्यापुढे जाऊन तिनं जे सांगितलं त्यानं मी थक्क झालो.ती म्हणाली की नवीन डॉक्टर्स घेतले जाताना तेथील एनएचएस (नॅशनल हेल्थ सव्र्हिस) म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय सेवा या देशपातळीवरील व्यवस्थेत, तुमचे वैद्यकीय ज्ञान उत्तमच लागतं; परंतु जर नवीन डॉक्टरकडे इम्पॅथी नसेल वा कमी असेल तर त्यांना 1 वर्ष प्रोबेशनवर ठेवलं जातं.हे अमेरिका, इंग्लंडमध्ये घडतंय असं समजू नका! काही महिन्यांपूर्वी मी वाचलं होतं की ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल इंडिया’ थेट एमडी मधुसूदन गोपालन यांनी सांगितलं होतं की, विशेषतर्‍ कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यांना एम्पथी व इक्यू (भावनांक) कमी असेल तर त्यांचे मत ग्राह्य धरले जात नाही!या एम्पॅथी (समवेदना) व भावनांक या दोन गोष्टींबरोबरच, इंडियन हॉटेल्स, कंपनीमध्ये विनम्रता, मानवी मूल्यांची जाणीव असणे ही दोन सॉफ्ट स्किल्स पण महत्त्वाची आहेत, असं नमूद करण्यात आलंय.पूर्वी जे जीवघेणी स्पर्धा, एकमेकांच्यावर कुरघोडी करून सत्तासोपान चढण्याची अहमहमिका व इतरांना कमी लेखून जिंकण्याची ईर्षा हे अत्यंत आवश्यक समजलं जायचं; तिथंच आता सहकार्य याला अधिक महत्त्व येतय!ज्या गोष्टीला पूर्वी रुक्ष कॉर्पोरेट जगतात स्थान नगण्य होतं त्या म्हणजेच विनोदबुद्धी असण्याचंही महत्त्व वाढतं आहे!!2018-19 या वर्षात काही ज्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये 110 लीडर्स निवडून गेले त्यात 70 टक्केमध्ये विनोदबुद्धी असणे, विनम्रता असणे आणि भावनांक चांगला असणे हे अत्यावश्यक होते, असा एक अहवाल सांगतो!या सगळ्यावरून हे नक्की सांगता येतं की आयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!