शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

तुम्हाला गोड बोलता येत नाही? - मग करिअर खल्लास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:17 IST

आपलं काम हसतमुख चेहर्‍यानं, प्रेमानं करणं हे स्किल आहे, दुसर्‍याच्या भावना समजणं हे तर उत्तम कौशल्यच. ते नसेल तर नुस्त्या हुशारीला काय अर्थ?

ठळक मुद्देआयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!

डॉ. भुषण केळकर 

प्रॉजेक्ट ऑक्सिजन आणि नंतर प्रॉजेक्ट अ‍ॅरिस्टॉटलमध्ये आपण बघितलं की मानवी भावभावना समजणं आणि समवेदना (एम्पथी) असणं ही अत्यंत महत्त्वाची सॉफ्ट स्किल्स आहेत. कालच त्याची तोंडओळख झाली इकडे लंडनला आल्यावर!अमेरिका दौरा आटपून भारतात परतण्यापूर्वी काल लंडनला काही कामानिमित्त उतरलो आणि तेथील सुप्रसिद्ध टय़ूब म्हणजे अण्डरग्राउण्ड रेल्वेमधून 2 जड बॅग्ज घेऊन जायच्या होत्या. एका माणसाला अवघड होतं; पण माझ्याबरोबरच्या असणार्‍या एका मित्राला तिकीट नसताना प्लॅटफॉर्मर्पयत तिथल्या सुरक्षारक्षकाने येऊ दिलं आणि त्याला थँक्स म्हटल्यावर त्याचं उत्तर होतं की ‘त्यात काय विशेष, माझं कामच तुमचा प्रवास सुकर करण्याचं आहे’!गोष्ट छोटी आहे, पण मला वाटून गेलं की आपल्या देशाच्या इतिहासातला दुर्दैवी परकीय सत्तेचा कालखंड असला तरीही, ‘गोरा साहेब’ भारतावरच नाही तर जगावर राज्य करून गेला कारण बहुदा युद्ध साहित्याच्या हार्ड स्किल्सबरोबर, जाऊ तिथल्या जनतेची नस ओळखून त्याची बलस्थान अन् कमतरता ओळखून बरोबर सॉफ्ट स्किल्स वापरू शकला! आपल्याला असल्या कुठल्याही कृष्णकृत्यासाठी नको असली तरीही सॉफ्ट स्किल्स मात्र हवी आहेत, बरं का! असो!पुढे लेस्टर या गावी गेलो होतो. माझी एक मैत्रीण तिथे डॉक्टर आहे. तिनं सांगितलं की, 10-15 वर्षापूर्वी तेथील हॉस्पिटल्समध्ये दरवर्षी एकूण 20 मॉडय़ूल शिकवली जायची. त्यात 17 मॉडय़ूल ही वैद्यकीय ज्ञानाची आणि 3 ही सॉफ्ट स्किल्सची असायची. आता मात्र 15 सॉफ्ट स्किल्स आणि 5 ही वैद्यकीय ज्ञानाची आहेत!! त्यापुढे जाऊन तिनं जे सांगितलं त्यानं मी थक्क झालो.ती म्हणाली की नवीन डॉक्टर्स घेतले जाताना तेथील एनएचएस (नॅशनल हेल्थ सव्र्हिस) म्हणजे राष्ट्रीय वैद्यकीय सेवा या देशपातळीवरील व्यवस्थेत, तुमचे वैद्यकीय ज्ञान उत्तमच लागतं; परंतु जर नवीन डॉक्टरकडे इम्पॅथी नसेल वा कमी असेल तर त्यांना 1 वर्ष प्रोबेशनवर ठेवलं जातं.हे अमेरिका, इंग्लंडमध्ये घडतंय असं समजू नका! काही महिन्यांपूर्वी मी वाचलं होतं की ‘प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल इंडिया’ थेट एमडी मधुसूदन गोपालन यांनी सांगितलं होतं की, विशेषतर्‍ कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत ज्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो त्यांना एम्पथी व इक्यू (भावनांक) कमी असेल तर त्यांचे मत ग्राह्य धरले जात नाही!या एम्पॅथी (समवेदना) व भावनांक या दोन गोष्टींबरोबरच, इंडियन हॉटेल्स, कंपनीमध्ये विनम्रता, मानवी मूल्यांची जाणीव असणे ही दोन सॉफ्ट स्किल्स पण महत्त्वाची आहेत, असं नमूद करण्यात आलंय.पूर्वी जे जीवघेणी स्पर्धा, एकमेकांच्यावर कुरघोडी करून सत्तासोपान चढण्याची अहमहमिका व इतरांना कमी लेखून जिंकण्याची ईर्षा हे अत्यंत आवश्यक समजलं जायचं; तिथंच आता सहकार्य याला अधिक महत्त्व येतय!ज्या गोष्टीला पूर्वी रुक्ष कॉर्पोरेट जगतात स्थान नगण्य होतं त्या म्हणजेच विनोदबुद्धी असण्याचंही महत्त्व वाढतं आहे!!2018-19 या वर्षात काही ज्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये 110 लीडर्स निवडून गेले त्यात 70 टक्केमध्ये विनोदबुद्धी असणे, विनम्रता असणे आणि भावनांक चांगला असणे हे अत्यावश्यक होते, असा एक अहवाल सांगतो!या सगळ्यावरून हे नक्की सांगता येतं की आयक्यूपेक्षा इक्यू मोजणं अवघड असेल, पण इक्यूचं महत्त्व वाढत आहे हे मोजणं अवघड नाही!!