शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाचा उपवास करायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:00 IST

नवरात्रात मी उपवास केला. सोशल मीडियाचा. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक सगळं बंद आणि चमत्कारच झाला.

ठळक मुद्देमी केला तसा प्रयोग जमल्यास करून पाहा.

- विकास बांबल 

माझ्यासाठी वर्षभरातील कालचा दिवस सर्वात मोठा दिवस होता. हो कालचाच.पण विज्ञान तर सांगते की 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.मग कालचा म्हणजे 6 ऑक्टोबर हा दिवस सर्वात मोठा कसा काय?त्याचं कारणही तसंच आहे.काल वर्षातून एखादा उपवास म्हणून अष्टमीच्या निमित्तानं मौनव्रत केलं. त्यासोबत अतिरेक होत असलेल्या गोष्टींचा, जसं की सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक बंद ठेवून उपवास केला.आधी दिवस सोशल मीडिया, फोनवर बोलण्यात कसा निघून जायचा काही कळत नव्हतं. सतत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि फोनवर बोलणं.पण काल मौन असल्यानं कुणाशी बोलणं नाही. फेसबुक नाही, व्हॉट्सअ‍ॅप नाही. त्यामुळे वेळ निघता निघत नव्हता. जणू दिवस मोठा असल्याची जाणीव मला होत होती.वास्तविक पाहता कालचा दिवस सामान्यच होता. अगदी नेहमीप्रमाणे 24  तासांचा; पण मोठा असल्याची जाणीव मला होत होती. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि मग नंतर आपण वेळच मिळत नाही म्हणून दोष देत बसतो.वेळ हा जास्त किंवा कमी नसतोच. तो जेवढा आहे तेवढाच असतो. मी जन्माला यायच्या अगोदरपासून तो तेवढाच होता आणि पुढेही राहणार. आपलं वेळेचं नियोजन कुठेतरी चुकतं किंवा कमी पडतं हे त्यामागचं खरं कारण आहे.पेपर सोडवून आलेल्या परीक्षार्थीला जर आपण विचारले, तर तो सांगतो की वेळ थोडा कमी पडला. पण वेळ हा आधीपासून पूर्वनिर्धारित 3  तासांचा असतो. ज्याची पूर्वकल्पना परिक्षार्थीला आधीच दिलेली असते. म्हणजे वेळ कमी पडला नाही, तर परीक्षार्थीचं नियोजन कमी पडलं.मीसुद्धा नेहमी वेळ मिळत नाही म्हणून आणलेली पुस्तकं वाचली नाहीत; पण काल तर वेळच वेळ होता. नेहमी वेळ मिळत नाही म्हणून सांगणारा मी, काल वेळ कुठे घालवायचा यावर विचार करत होतो.मग काय दोन महिन्यांपासून आणलेली पुस्तकं वाचून घेतली, सायकलिंग केली, फोटोग्राफी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीतेतून सांगतात,कमावणे नव्हे श्रीमंतीबचत करणे हीच संपत्ती.आपण खूप पैसा कमावत असलो तरी श्रीमंत होत नाही जोवर आपण बचत वाढवत नाही. संपत्ती त्यांचीच तयार होते जो बचत करतो. जशी पैशांची बचत तशीच वेळेची बचत. आणि  वेळ खर्ची पाडण्यात सध्या सोशल मीडियाचा मोठा आणि वायफळ वाटा आहे तो आपल्याला कमी करता आला पाहिजे. ज्या गोष्टींचा अतिरेक होत आहे त्यांना नियंत्रित करता आलं पाहिजे. मी बरेच असे महाभाग पाहिले जे आधी गोष्टी शौक म्हणून करतात, पण सतत केल्याने त्या गोष्टींचा अतिरेक होऊन व्यसनं जडतात.उपवास म्हणजे मनेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची क्रि या.आता तर मनुष्य मोबाइल वापरतो की मोबाइल मनुष्याला वापरतो काही कळतच नाही.सध्या सोशल मीडियाचा अतिरेक वाढत आहे म्हणून हा अतिरेक टाळण्यासाठी, माझा पबजी होऊ नये म्हणून मौनव्रताबरोबर सोशल मीडियाचादेखील उपवास केला.ज्यामुळे काल वेळच वेळ उपलब्ध झाला आणि ज्याला वेळेची बचत करता आली त्याच्याकरता प्रत्येक दिवस मोठा, पुरेसा ठरतो ही अनुभूतीपण आली.मी केला तसा प्रयोग जमल्यास करून पाहा.