शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सोशल मीडियाचा उपवास करायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 07:00 IST

नवरात्रात मी उपवास केला. सोशल मीडियाचा. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक सगळं बंद आणि चमत्कारच झाला.

ठळक मुद्देमी केला तसा प्रयोग जमल्यास करून पाहा.

- विकास बांबल 

माझ्यासाठी वर्षभरातील कालचा दिवस सर्वात मोठा दिवस होता. हो कालचाच.पण विज्ञान तर सांगते की 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.मग कालचा म्हणजे 6 ऑक्टोबर हा दिवस सर्वात मोठा कसा काय?त्याचं कारणही तसंच आहे.काल वर्षातून एखादा उपवास म्हणून अष्टमीच्या निमित्तानं मौनव्रत केलं. त्यासोबत अतिरेक होत असलेल्या गोष्टींचा, जसं की सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक बंद ठेवून उपवास केला.आधी दिवस सोशल मीडिया, फोनवर बोलण्यात कसा निघून जायचा काही कळत नव्हतं. सतत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि फोनवर बोलणं.पण काल मौन असल्यानं कुणाशी बोलणं नाही. फेसबुक नाही, व्हॉट्सअ‍ॅप नाही. त्यामुळे वेळ निघता निघत नव्हता. जणू दिवस मोठा असल्याची जाणीव मला होत होती.वास्तविक पाहता कालचा दिवस सामान्यच होता. अगदी नेहमीप्रमाणे 24  तासांचा; पण मोठा असल्याची जाणीव मला होत होती. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, फोनवर वेळ कसा निघून जातो कळत नाही आणि मग नंतर आपण वेळच मिळत नाही म्हणून दोष देत बसतो.वेळ हा जास्त किंवा कमी नसतोच. तो जेवढा आहे तेवढाच असतो. मी जन्माला यायच्या अगोदरपासून तो तेवढाच होता आणि पुढेही राहणार. आपलं वेळेचं नियोजन कुठेतरी चुकतं किंवा कमी पडतं हे त्यामागचं खरं कारण आहे.पेपर सोडवून आलेल्या परीक्षार्थीला जर आपण विचारले, तर तो सांगतो की वेळ थोडा कमी पडला. पण वेळ हा आधीपासून पूर्वनिर्धारित 3  तासांचा असतो. ज्याची पूर्वकल्पना परिक्षार्थीला आधीच दिलेली असते. म्हणजे वेळ कमी पडला नाही, तर परीक्षार्थीचं नियोजन कमी पडलं.मीसुद्धा नेहमी वेळ मिळत नाही म्हणून आणलेली पुस्तकं वाचली नाहीत; पण काल तर वेळच वेळ होता. नेहमी वेळ मिळत नाही म्हणून सांगणारा मी, काल वेळ कुठे घालवायचा यावर विचार करत होतो.मग काय दोन महिन्यांपासून आणलेली पुस्तकं वाचून घेतली, सायकलिंग केली, फोटोग्राफी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ग्रामगीतेतून सांगतात,कमावणे नव्हे श्रीमंतीबचत करणे हीच संपत्ती.आपण खूप पैसा कमावत असलो तरी श्रीमंत होत नाही जोवर आपण बचत वाढवत नाही. संपत्ती त्यांचीच तयार होते जो बचत करतो. जशी पैशांची बचत तशीच वेळेची बचत. आणि  वेळ खर्ची पाडण्यात सध्या सोशल मीडियाचा मोठा आणि वायफळ वाटा आहे तो आपल्याला कमी करता आला पाहिजे. ज्या गोष्टींचा अतिरेक होत आहे त्यांना नियंत्रित करता आलं पाहिजे. मी बरेच असे महाभाग पाहिले जे आधी गोष्टी शौक म्हणून करतात, पण सतत केल्याने त्या गोष्टींचा अतिरेक होऊन व्यसनं जडतात.उपवास म्हणजे मनेंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची क्रि या.आता तर मनुष्य मोबाइल वापरतो की मोबाइल मनुष्याला वापरतो काही कळतच नाही.सध्या सोशल मीडियाचा अतिरेक वाढत आहे म्हणून हा अतिरेक टाळण्यासाठी, माझा पबजी होऊ नये म्हणून मौनव्रताबरोबर सोशल मीडियाचादेखील उपवास केला.ज्यामुळे काल वेळच वेळ उपलब्ध झाला आणि ज्याला वेळेची बचत करता आली त्याच्याकरता प्रत्येक दिवस मोठा, पुरेसा ठरतो ही अनुभूतीपण आली.मी केला तसा प्रयोग जमल्यास करून पाहा.