शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समलिंगी व्यक्तींना लग्नाचा हक्क का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:25 IST

लग्नाशिवाय एकत्र राहाणं अनैतिक असं समजणार्‍या समाजात जर एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्‍या समलिंगी व्यक्तींनी लग्न करायचं ठरवलं, तर त्यात चूक काय?

- सूरज राऊत    

‘दोन व्यक्तींचं लग्न होण्यासाठी प्राथमिक अट कोणती?’-  मी नववीला असताना नागरिकशास्नच्या तासाला सरांनी वर्गाला हा प्रश्न एकदा केला होता. त्यावर मी अतिउत्साहाने हात वर करून उत्तर द्यायला सरसावलो. ‘त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असायला हवं. त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं’. असं मी म्हणालो. सरांनी मला शांतपणे खाली बसायला सांगितलं. ‘त्या दोन व्यक्ती स्री आणि पुरु ष असायला हवेत. ’ सरांनी ‘योग्य’ उत्तर सांगितलं. वर्गात एकच हशा पिकला आणि मीदेखील हे इतकं साधं-सोपं उत्तर आपल्याला कसं आलं नाही म्हणून वरमून गुमान खाली बसलो. आज अनेक वर्षांनी कळतंय की ते उत्तर इतकं साधं आणि सोपं, योग्य आणि अयोग्य या बायनरीमध्ये मोडणारं नव्हतंच मुळी. ही घटना आज आठवायचं कारण म्हणजे सोमवारच्या सायंकाळी येऊन धडकलेली एक बातमी. हिंदू समलैंगिक विवाह कायदेशीर नोंदविले जावेत या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेवर केंद्र सरकारने अपेक्षेप्रमाणेच आपली कर्मठ, होमोफोबिक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. ‘भारतीय हिंदू संस्कृती, विवाहविषयक कायदे आणि सामाजिक मूल्ये अशा लग्नांना  मान्यता देत नाहीत.’ असं त्यांचं मत.कोण ठरवतं मूल्य, संस्कृती आणि सामाजिकतेच्या या व्याख्या? या व्याख्यांचं स्वरूप हे नेहमीच समलिंगी व्यक्तींच्या हक्कांची गळचेपी करणारंच का असतं? 

लग्न हा संविधानाने या देशातल्या नागरिकांना दिलेला मूलभूत अधिकार आहे. हा मूलभूत हक्कच एका मोठय़ा समाजघटकाला पूर्णतर्‍ नाकारला जातोय. आपण खरोखरच जगातल्या सर्वात मोठय़ा लोकशाही असलेल्या देशाचे  नागरिक आहोत का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. ज्या हिंदू पुराणाचे दाखले देऊन आम्हाला लग्नाचा हक्क नाकारला जातोय त्याच हिंदू पुराणात अशी अनेक उदाहरणं सहज सापडतील. साधारण वीस-बावीस वर्षांच्या अथक, खडतर लढय़ानंतर सर्वोच्च न्यायलयाने एलजीबीटी समुदायाची गळचेपी करणार्‍या 377 कलमात सुधारणा केली खरी; पण आमची लढाई इथेच थांबलेली नाही. समलिंगी संबंधांना कायद्याचं अनुष्ठान मिळालं; पण व्यापक, सर्वसमावेशक सामाजिक अनुष्ठान कधी मिळणार?  मुख्य समाजप्रवाहात समाविष्ट होण्याच्या प्रक्रियेतला लग्न हा एक अविभाज्य घटक आहे.  मग हे लग्न आम्हाला का नाकारलं जातंय? लग्नाचं अंतिम साध्य हे मुलं जन्माला घालून वंशावळ अखंड सुरू ठेवणं या पुरतंच मर्यादित आहे का? एकमेकांवर नितांत प्रेम करणारे दोन जीव एकमेकांसोबत अवघं आयुष्य व्यतीत करू इच्छित असतील तर रूढार्थाने ‘वैध’  समाजमान्य चौकटीत त्यांना मोकळा श्वास का घेता येऊ नये? त्यांना स्वतर्‍चं मूल होणार नाही निव्वळ म्हणून? शिवाय याच समाजाने नाकारलेल्या कित्येक अनाथ बाळांना समलिंगी जोडपी दत्तक घेऊन एक सुरक्षित कुटुंब देऊ करत असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आहेतच. विवाहसंस्थेचं सद्यर्‍स्वरूप सदोष असेलही. प्रेम करण्यासाठी आणि निभावण्यासाठी लग्नाची गरज काय, हा प्रश्नदेखील अलाहिदा. मात्र ज्या समलिंगी जोडप्यांना लग्नाच्या चौकटीत सुरक्षित वाटतं. आपल्या कुटुंबाशी, समाजाशी त्यातून जोडले जाऊ असं वाटतं त्यांना लग्न करण्याचा हक्क असला पाहिजे इतका साधा, सरळ मुद्दा आहे. लग्नाशिवाय एकत्र राहाणं, शरीरसंबंध ठेवणं म्हणजे ‘अनैतिक’ संबंध होत हे समीकरण भारतीय समाजमनात इतकं खोलवर रु तून बसलंय  की त्यामुळे अनेक समलिंगी जोडपी ही या अनैतिक ठपक्याच्या भीतीपोटी, तथाकथित प्रतिष्ठा आणि पोकळ इभ्रतीच्या संकल्पना, कुटुंबीयांचा दबावाला बळी पडून भिन्नलिंगी व्यक्तीशी इच्छेविरुद्ध  लग्नाला तयार होतात. मनाविरुद्ध लावून दिलेल्या या लग्नांमधूनच विवाहबाह्य संबंध निर्माण होतात आणि असे संबंध ठेवले की समाज पुन्हा आमच्यावर अनैतिकतेचा शिक्का मारून मोकळा होतो. पारंपरिक हेटेरोसेक्शुअल विवाहसंस्था स्वीकारली तरी आणि नाकारली तरी हा अनैतिकतेचा शिक्का आमच्या माथ्यावरून पुसला जात नाही.

 इकडे आड, तिकडे विहीर अशी ही परिस्थिती आहे.

* केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील कोर्टात म्हणाले, की समलैंगिक लग्नांना मान्यता द्यायची झाली तर त्यातली स्री कोण आणि  पुरुष कोण हे ठरवणं क्र मप्राप्त ठरेल. * पण म्हणजे पाहा, ही मानसिकताच या लग्नांमधला मोठा अडसर आहे. लग्नाच्या आड येणारे जात, धर्म, प्रांत, भाषा हे अडसर हळूहळू आपण बाजूला सारू पाहतो आहोत तर मग लिंग आणि लैंगिकता हेही घटक बाजूला सारू.*  लग्न हे निव्वळ स्री आणि पुरुष यांच्यातच होऊ शकतं हे वर्षानुवर्षे आपल्यावर बिंबवण्यात आलेलं कंडिशनिंग थोडं अनलर्न करायचा प्रयत्न करू.  हीच शिकवण आपल्यावर थोपवू पाहणार्‍या शाळेतल्या सरांना, आपल्यावर हसणार्‍या  वर्गमित्रांना आत्मविश्वासाने सामोरं जाऊ.* त्यांना जाणीव करून देऊ की लग्न हे एकमेकांवर प्रेम करणार्‍या कुठल्याही, अगदी कुठल्याही दोन सज्ञान व्यक्तींमध्ये शक्य आहे. * कायद्याचे दरवाजे आमच्यासाठी उघडत आहेतच; पण संस्कृती आणि (गैर)समजुतींनी टाळेबंद असलेल्या मनाची दारं पण किलकिली करू.  एलजिबिटी समुदायाच्या सर्वसमावेशक सामाजिक स्वीकार्यतेकडे जाणारं ते पहिलं पाऊल आहे.

(MIST ही संस्था एलजिबिटी समुदायाच्या हक्कांसाठी, जनजागृती करते, त्या संस्थेत सूरज ऑपरेशन्स हेड म्हणून कार्यरत आहे.)