शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ना उम्र की सीमा हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

प्रियांका आणि निकचं लग्न ठरलं. तो तिच्यापेक्षा 11 वर्षे लहान. त्यावरून बरीच टीका झाली, पण वयातलं अंतर हा खरंच मोठा इश्यू होऊ शकतो.

ठळक मुद्देसंसार सुखी होण्यासाठी एकमेकांच्या मतांचा, परिस्थितीचा, कुटुंबाचा, विचारांचा, आवडी-निवडींचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणं महत्त्वाचं.

- सारिका पूरकर-गुजराथी

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा गेल्या आठवडय़ात ‘रोका’ समारंभ अर्थात साखरपुडा झाला. विदेशी निक जोनास बरोबर तिनं लग्न ठरवलं.  या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा  रंगात होत्याच, मात्न भारतीय पारंपरिक पद्धतीने प्रियांकाने साखरपुडा उरकल्यावर नेटकर्‍यांना आयता विषयच मिळाला. मते-मतांतरं, ट्रोल करणं आणि खिल्ली उडवणं सुरू झालं. कारण काय तर दोघांच्या वयातील अंतर. निक प्रियांकापेक्षा अकरा वर्षानी लहान आहे. न उम्र की सीमा हो. न जन्म का हो बंधन. हे निक-प्रियांकाने प्रत्यक्षात करून दाखवलं. पण टीका झालीच, एवढी काय घाई होती प्रियांकाला, थोडे दिवस थांबून करिनाच्या तैमुरशीच केलं असतं की लग्न ही शेरेबाजीही काहींनी पातळी सोडून केली. लग्न करताना मुलगा मुलीपेक्षा मोठाच असला पाहिजे हा आपल्याकडचा पायंडा. यापूर्वीही बॉलिवूडमध्ये प्रियांका-निकसारखी अनेक जोडपी विवाहबद्ध झाली आहेत, सैफ-अमृता, ऐश्वर्या-अभिषेक, मेहेर-अर्जुन. यातील दोन लग्न जरी मोडली असली तरी त्यामागची कारणं मुलगा मुलीपेक्षा लहान होता, हे नक्कीच नव्हतं. मुलगी मुलापेक्षा मोठी असली तरी प्रॉब्लेम आणि मुलगा मुलीपेक्षा दुपटीने मोठा असेल तरीही. मिलिंद सोमणचं उदाहरण आहेच की ताजं. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी त्यानं लग्न केलं. पूर्वीही अशी लग्न होतं. दिलीप कुमार व सायरा बानो यांच्यातही अंतर होतंच. दिलीप कुमार तेव्हा 44  वर्षाचे होते व सायरा जेमतेम 22. पण आजही त्यांचा संसार उत्तम चाललाय. बॉलिवूड जाऊ द्या. आपल्या आवतीभोवती अल्पसंख्येने का होईना पण अशी लग्नं झाली आहेत, होत आहेत.म्हणूनच पीसीच्या या निर्णयाला पाठिंबा देतानाच या चौकटीबाहेरच्या लग्नांचं यश किंवा अपयश वयांवर अवलंबून नसतं, एवढं तरी लक्षात ठेवलेलं बरं.दुसरा मुद्दा म्हणजे लग्न करताना मुलगाच मोठा पाहिजे या भूमिकेमागे नेमकी कोणती मानसिकता आहे आपल्या समाजाची? तर मुलगा लहान असेल तर अशी लग्न टिकत नाहीत, दोघांमध्ये ताळमेळ राहत नाही. दोघांचे विचार जुळत नाहीत. सर्वात मुख्य म्हणजे विवाहसौख्य (अर्थात शारीरिक सुख) मिळत नाही, अशा कल्पना आहेत. मात्र लग्न ही इतकी व्यक्तिगत गोष्ट आहे की ते नातं टिकतं किंवा तुटतं ते त्या दोघांमुळेच. समाजाच्या कल्पित नियमांमुळे नव्हे.खरं तर कोणत्याही लग्नात शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती जरूरीच असते. मात्न चौकटीबाहेरचे लग्न करताना त्याचा खरा कस लागत असतो. वयाची बंधनं झुगारणारे लग्न  प्रेमविवाह व जर आंतरजातीय असेल तर (अर्थात अशी लग्न प्रेमविवाहच असतात)  ही तंदुरूस्ती महत्त्वपूर्ण ठरते. दोघांच्या विचारांची जडणघडण, कौटुंबिक पाश्र्वभूमी भिन्न असल्यामुळे परिवारांतील मतभेदांचे रूपांतर मनभेदात होऊ शकतं. अशावेळी ही तंदुरुस्तीच तुम्हाला संयमी भूमिका घेण्यासाठी मदतीस धावून येते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोघांमधील संवाद. लग्न करण्याच्या निर्णयार्पयत येतानाच मुला-मुलीतील संवादाची दोरी मजबूत व्हायला हवी असते. एका पिढीचे अंतर जरी दोघांमध्ये असले तरी त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रि येत ते अंतर नसेल तर मग संवादात अडथळे येतच नाहीत. उदाहरण द्यायचे झालं तर प्रियांकाने निकला समजा उद्या असे सांगितले, की निक हे बघ, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, मला याबाबतीत जास्त माहिती आहे. तर या गोष्टीचा इगो धरून न ठेवता (ही स्वतर्‍ला जास्त शहाणी समजते असे न मानता) निकने त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली तर वाद अथवा मतभेदाची ठिणगी पडण्याची शक्यता कमी होते. तसेच प्रियांकानेही निक लहान म्हणून  याला काहीच समजत नाही, बाळच आहे अजून असं लावून धरलं तर ते योग्य ठरणार नाही.  संसार सुखी होण्यासाठी एकमेकांच्या मतांचा, परिस्थितीचा, कुटुंबाचा, विचारांचा, आवडी-निवडींचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणं महत्त्वाचं.ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचा कानमंत्न जर कायम लक्षात ठेवला तर चौकटीबाहेरचे व चौकटीतील लग्नंही यशस्वी होऊ शकतात. ते सांगतात, आपल्यातील असा अवगुण, वाईट सवय जी आपल्या जोडीदाराला आवडत नसते, त्याच्यासाठी ती त्नासदायक ठरत असेल तर ती आपण त्यागली पाहिजे. सुनंदा आणि मी आमच्या लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त हा प्रयोग करत असू. दरवर्षी एक वाईट सवय सोडत असू.  (तो अवगुण, सवय दोघांच्याही दृष्टीने वाईट असायला हवी हे मात्न नक्की.)