शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
3
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
4
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
5
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
6
अर्जुन तेंडुुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
7
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!
8
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
9
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
10
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
12
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
13
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
14
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
15
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
17
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
18
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
19
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
20
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी

प्रेशर आणि अपेक्षा यांचा मेळ जमायला हवा!

By admin | Updated: January 14, 2016 21:34 IST

आजवर किती गुणी मुलांचं कोचिंग मी करतो आहे.. मुलं हुशार असतात, त्यांना ‘गेम’ समजतो, ते मेहनतही घेतात

 - गोपाळ कोळी

सुप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक
३० वर्षांहून अधिक काळ क्रिकेट कोचिंग, आईएस, 
व्ही. एन. सुळे गुरुजी शाळा, मुंबई
 
आजवर किती गुणी मुलांचं कोचिंग मी करतो आहे..
मुलं हुशार असतात, त्यांना ‘गेम’ समजतो, ते मेहनतही घेतात. पण म्हणून शालेय स्तरावर चमकलेले सगळेच काही देशाच्या संघात किंवा अगदी रणजी सामन्यातही स्थान मिळवू शकत नाहीत, असं का होतं?
जरा यश मिळालं की या मुलांचा फोकस हलतो असं म्हणत त्यांना दोष देणं सोपं आहे. पण हेच एकमेव सत्य नाही.
त्यासाठी आपण काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात.
शालेय स्तरावर क्रिकेट खेळणारी मुलं ‘फक्त क्रिकेट’ खेळत नसतात. त्यांना इतर मुलांसारखा अभ्यास असतो, परीक्षा असतात. त्यातही जी मुलं क्रिकेटही उत्तम खेळतात आणि अभ्यासातही हुशार असतात ती दहावीनंतर सायन्सला जातात. करिअरची एक वाट निवडतात. कारण फक्त क्रिकेट खेळणं, त्यासाठी शिक्षण सोडणं हे अनेक पालकांनाही मान्य नसतं, मुलांनाही आणि ते प्रॅक्टिकलही नसतं.
त्यामुळे जी हुशार मुलं असतात ती सायन्सला जातात. तिथं प्रचंड अभ्यास असतो. त्यानंतर बारावी, तो अभ्यास, त्याच्यापुढच्या प्रवेश परीक्षा, त्यासाठीची तयारी या साऱ्यात ते क्रिकेटमधे ब्रेक घेतात किंवा क्रिकेट मागे पडतं. त्यामुळे शालेय स्तरावर खूप रन्स केलेत, पण पुढे तसा तो मुलगा खेळला नाही तर त्याचा दोष लगेच त्याला देता येत नाही.
दुसरीकडे आईवडील. काहीजण प्रोत्साहन देतात. खेळ म्हणतात क्रिकेट. पण नुस्तं प्रोत्साहन देऊन खेळण्याचा आनंद घेऊ देणारे पालकही कमी असतात. काहींना वाटतं, आपल्या मुलानं लगेच पुढच्या टप्प्यात जावं. स्पर्धा, वय, या साऱ्यात ते सगळ्याच मुलांना चटकन कसं जमणार?
काही आईवडील मात्र एकदम त्याउलट. ते म्हणतात, आता पुरे. बंद कर क्रिकेट. करिअरवर लक्ष दे, अभ्यास कर! त्यामुळेही अनेक गुणी मुलांचं क्रिकेट बंद होतं.
मुख्य म्हणजे या साऱ्याचा परिणाम त्या मुलांवर होतो. त्यांच्यावर प्रेशर, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा यांचा दबाव वाढतो. आणि वय वाढत असतं तशा संधी कमी होताना दिसतात, त्याचंही मग टेन्शन येतं!
त्यामुळे शालेय स्तरावर उत्तम खेळला, मोठा विक्रमही केला, सतत शतकं ठोकली तरी पालकांसह इतरांनीही त्या मुलाकडून अती आणि अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत.
प्रत्येक लेव्हलचं क्रिकेट वेगळं असतं. शालेय स्तरावरचं वेगळं आणि व्यावसायिक स्तरावरचंही. आपला खेळ पुढच्या टप्प्यात नेता येणं हे सोपं नसतं. त्यासाठी प्रयत्न आणि परिश्रम अनेक मुलं करतात पण तरीही ते सोपं नसतं.
ज्यांना ते करणं जमतं ते पुढे सरकतात, बाकीचे अडकतात त्याच टप्प्यात!
आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी, गुणवान मुलांना मिळणारं मीडिया अटेन्शन. ते चांगलंही असतं. त्यातून या मुलांना सुविधा मिळतात, नाव झाल्यानं आत्मविश्वास बळावतो.
पण अतीच झालं कौतुक किंवा इतका अतिरेक करतात अनेकदा माध्यमं, की ते सारं कौतुक, ती प्रसिद्धी आणि त्यातून येणारं प्रेशरही अनेक मुलं हॅण्डल करू शकत नाहीत. त्यामुळेही अनेकांचा फोकस हलतो. खेळ मागे सरकतो. आणि आधी कमावलेल्या यशाचंही ओझंच होतं.
तेव्हा लक्षात हे ठेवायला हवं की, अनेक गोष्टी पूरक आणि मारक ठरतात. प्रत्येक टप्प्यावर परीक्षा वेगळ्या असतात आणि गेमही!
ज्यांना आपलं ध्येय गाठायचं, त्यांनी या साऱ्या परीक्षांवर स्वत:ला सिद्ध करत पुढे जाणं आणि आपला खेळ जपणं, ही या काळाची अपरिहार्यता आहे.
 
कोणाच्या विरुद्ध किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये धावा केल्या हे महत्त्वाचे नसून किती वेळ एकाग्रतेने धावा केल्या हे महत्त्वाचं असतं. आणि एकदा किती धावा केल्या यापेक्षाही महत्त्वाचं असतं की, त्या कामगिरीत पुढे कशाप्रकारे सातत्य राखलं. प्रत्येक वेळी शतक किंवा द्विशतकाची अपेक्षा कुणाही खेळाडूकडून करणं चूकच. मात्र या अशा प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपल्या खेळावर पूर्ण लक्ष एकवटणं हे खरं तर या मुलांपुढचं आव्हान असतं. आपण खूप चांगलं खेळतो किंवा एखादा विक्रम केला हे विसरून नव्यानं आपली सुरुवात केली पाहिजे. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शनदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. हे सारं ज्यांना जमतं किंवा मिळतं, ते मुलं क्रिकेट खेळत राहतात, आपला खेळ अधिक उंचावण्याचा प्रयत्न करतात.
 
- राजू पाठक
रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेचे प्रशिक्षक
गेल्या काही वर्षांत ज्या मुलांनी रेकॉर्ड केले, 
त्या अरमान, पृथ्वी यांचे ते प्रशिक्षक आहेत.
क्रिके टर म्हणून बँकेत नोकरी मिळाली. लहानपणापासून क्रि केट खेळाविषयी आस्था तर आहेच; पण त्या खेळात मिळवलेलं कौशल्य मुलांना द्यावं म्हणून मी गेली २५ वर्षे प्रशिक्षणाचं काम करतो आहे. आतापर्यंत १६ आणि १९ वर्षांखालील अनेक रणजी खेळाडू शिकत-शिकवत पुढे गेले. मात्र माझ्याही २५ वर्षांच्या मेहनतीचं सार्थक प्रणवच्या विक्रमानं झालं. आजच्या घडीला प्रणवसारखे असे अनेक होतकरू खेळाडू आपले नशीब आजमावत आहेत; परंतु सोयी-सुविधांअभावी त्यांची जी परवड होतेय त्याबाबत खंत वाटते. गुणी मुलांना सर्वदूर उत्तम सुविधा, मार्गदर्शन मिळालं तर त्यांच्यातूनही चांगले खेळाडू घडतील, असा मला विश्वास वाटतो. 
- मोबिन शेख
विक्रमवीर प्रणव धनावडेचे प्रशिक्षक